शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

गोवा: वाहन परवाने निलंबनाची कारवाई स्थगित झाल्याने पर्यटकांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2018 19:36 IST

गोव्यात सध्या सुट्टी निमित्ताने लाखो पर्यटक वाहने घेऊन येत आहेत. वाहतूक खात्याने स्थानिक व परप्रांतीय वाहन चालक अशा दोन्ही घटकांविरुद्ध कारवाई मोहीम हाती  घेतली आहे.

पणजी : गोव्यात सध्या सुट्टी निमित्ताने लाखो पर्यटक वाहने घेऊन येत आहेत. वाहतूक खात्याने स्थानिक व परप्रांतीय वाहन चालक अशा दोन्ही घटकांविरुद्ध कारवाई मोहीम हाती  घेतली आहे. वाहतूक नियमांचा भंग करून जे वाहने चालवतात, त्यांच्याविरोधात कारवाई केली जात आहे. मात्र दंड ठोठावल्यानंतर वाहन चालकाचा परवानाही तीन महिन्यांसाठी निलंबित करावा अशा प्रकारचा निर्णय वाहतूक अधिकारी व पोलिसांच्या वाहतूक विभागाने घेतल्यानंतर गोंधळ उडाला होता. या गोंधळाची दखल घेऊन वाहतूक खात्याने आता परवाना निलंबनाची कारवाई स्थगित ठेवावी असे ठरवल्याने ब:याच पर्यटकांनाही दिलासा मिळाला आहे.

गोव्यात वाहन अपघात खूप घडत आहेत. रस्ते रुंद झाले तरी, सुसाट वेगाने वाहने हाकली जातात. दुचाकीस्वार तर गर्दीच्या ठिकाणीही वाहनाचा वेग कमी करत नाहीत. वाहतूक खात्याने आणि पोलिसांच्या वाहतूक विभागाने नियम भंग करणाऱ्या चालकांविरुद्ध कारवाई सुरू केली. अवघ्या एक-दोन महिन्यांत एकूण सहा हजार वाहन चालकांचे परवाने निलंबित करावेत अशा प्रकारची शिफारस आरटीओ आणि पोलिसांकडून वाहतूक खात्याचे संचालक निखिल देसाई यांच्याकडे आली. हजारो वाहन चालकांना शासकीय यंत्रणेने दंड ठोठावला. सरकारी तिजोरीत बराच महसूल जमा केला गेला. मात्र त्याचबरोबर काही हजार वाहन चालकांचे परवानेही कारवाई करणा:या यंत्रणोने ताब्यात घेतले. हे परवाने निलंबित करायचे आहेत अशी भूमिका वाहतूक खात्याने घेतली होती. मात्र जे पर्यटक टॅक्सी चालवतात, अशा चालकांना परवान्याशिवाय मग पर्यटकांची वाहतूक करता येत नसल्याने सगळीच गैरसोय होते. शिवाय जे रोज वाहन घेऊन नोकरी किंवा कामाधंद्यानिमित्त जात असतात, त्यांचाही वाहन परवाना निलंबित झाल्याने त्यांच्यासमोरही मोठी अडचण येते. गोव्यातील अनेक चालकांनी काही आमदार व मंत्र्यांसमोर समस्या मांडली. यामुळे सरकारवर दबाव येऊ लागला.

वाहतूक खात्याने या सगळ्य़ा पाश्र्वभूमीवर परवाना निलंबित करण्याच्या निर्णयाची तूर्त अंमलबजावणी करायची नाही असे ठरवले आहे. संचालक देसाई यांनी तसा आदेश जारी केला आहे. एकदा चालकाने दंड भरल्यानंतर पुन्हा त्याचा परवानाही तीन महिन्यांसाठी निलंबित करणे म्हणजे गुन्हा कम्पाऊण्ड केल्यानंतरही पुन्हा शिक्षा दिल्यासारखे होत असल्याचा मुद्दा वाहतूक खात्याने विचारात घेतला आहे. या मुद्द्याबाबत कायदेशीर सल्ला घेतला जाईल व मग पुढील आदेश जारी केला जाईल आणि पुढील आदेश येण्यापूर्वी कुणाचाही वाहतूक परवाना निलंबित केला जाणार नाही हे वाहतूक खात्याने आता जाहीर करून चालकांना व पर्यटकांनाही  दिलासा दिला आहे. अनेक पर्यटकांकडे परराज्यातील वाहन परवाना असला तरी, त्यांचेही लायसन्स गोव्यातील शासकीय यंत्रणोने ताब्यात घेतले होते