शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

Goa: त्या रेंट ए कारचा परवाना रद्द करणार, एजन्सीलाही कारणे दाखवा नोटीस - वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 15:24 IST

Goa: गुरुवारी मांडवी पुलावर झालेल्या अपघातास रेंट कारचा पर्यटक चालक पूर्णपणे जबाबदार असून त्या रेंट ए कारचा परवाना रद्द केला जाणार तसेच जबाबदार रेंट ए कार एजन्सीलाही कारणे दाखवा नोटीस पाठवून स्पष्टीकरण घेतले जाणार, असे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी पत्रकारांना सांगितले.

- नारायण गावसपणजी - गुरुवारी मांडवी पुलावर झालेल्या अपघातास रेंट कारचा पर्यटक चालक पूर्णपणे जबाबदार असून त्या रेंट ए कारचा परवाना रद्द केला जाणार तसेच जबाबदार रेंट ए कार एजन्सीलाही कारणे दाखवा नोटीस पाठवून स्पष्टीकरण घेतले जाणार, असे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी पत्रकारांना सांगितले. आम्ही त्या पर्यटक चालकाचा त्यांच्या राज्यातही वाहन चालविण्याचा परवाना रद्द करण्याची मागणी करणार आहोत. तसेच यापुढे रेंट ए कार एजन्सीसाठी कडक नियम लागू केले जाणार, असे मंत्री म्हणाले.

गेल्या महिन्याभरात राज्यात रेंट ए कार पर्यटक चालकांकडून अपघात वाढले असून यात निष्पाप लाेकांचा बळी गेला आहे. त्यामुळे रेंट ए कार देताना एजन्सीने पर्यटकांची पूर्ण तपासणी करावी. त्यांना राज्यातील रस्त्यांचे योग्य मार्गदर्शन करावे. रेंट ए कार देताना त्या चालकाचा परवाना तसेच जर ताे दारुडा तसेच इतर काही त्रुटी असल्यास वाहने त्यांना देऊ नये. यापुढे रेंट ए कारवाल्यासाठी कडक नियमावली लागू केली जाणार आहे. जर नियमांचे पालन केले जात नसेल तर परवाना रद्द केला जाणार असल्याचा इशारा वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिला आहे.

मंत्री माविन गुदिन्हो म्हणाले, पर्यटक वाढत असल्याने रेंट ए कार परवान्यासाठी वाहतूक खात्याकडे अनेक अर्ज येत आहेत. पण आम्ही गेल्या तीन वर्षांपासून रेंट ए कारचा परवाना बंद केला आहे. तसेच ज्या रेंट ए कार आहेत. त्यांना पाच वर्षानंतर परवाना नुतनीकरण करावा लागतो. त्यावेळी त्यांची पूर्ण तपासणी केली जाते. रेंट ए कारवाल्यांकडे स्वताची पार्किंग जागाही नसते त्यामुळे आपल्याला हवी तिथे कार लावतात. तसेच पर्यटकांकडे गाडी देताना त्याची याेग्य तपासणी करत नसल्याचे समोर आले आहे. या एकूण सर्व प्रकाराची तपासणी हाेणार आहे.

वाहतूक खात्यातर्फे नुकतीच जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या सदस्यांसोबत बैठक झाली आहे. यावेळी राज्यात १२ अपघात प्रवणक्षेत्र शोधले असून त्याची दुरुस्ती केली जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याला तसे आदेशही दिले आहेत. वाहनचालकांनीही वाहतूक नियमांचे पालन करावे. वेगाने गाडी चालवू नये. दारु पिऊन गाडी चालवू नये, असे मंत्री गुदिन्हो म्हणाले.

टॅग्स :goaगोवाGovernmentसरकार