शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

शिक्षण सुविधांमध्ये गोवा अग्रेसर; स्वच्छतेत मात्र मागासच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 19:34 IST

स्वच्छतेत 28 राज्यात 18 वा क्रमांक

-सुशांत कुंकळयेकर

मडगाव: शिक्षित, विकसित आणि देशातील इतर राज्यांच्या तुलनेत पुढारलेले राज्य असा दावा गोव्यातर्फे सतत केला जात असला, तरी मागच्या दोन दिवसात केंद्र सरकारने जारी केलेल्या दोन वेगवेगळ्या अहवालांतून गोव्यातील एकूणच परिस्थिती एकमेकांशी कशी विसंगत आहे यावर स्वच्छ उजेड पडला आहे. मानव संसाधन विकास मंत्रलयाच्या अहवालात गोवा हे शैक्षणिक सुविधांच्या बाबतीत दुस:या क्रमाकांवर असले तरी स्वच्छ सव्र्हेक्षणाच्या बाबतीत मात्र गोव्याचा क्रमांक एकूण 28 राज्यांच्या तुलनेत 18 वा आहे.

मानव संसाधन विकास मंत्रलयाने जो अहवाल जारी केला आहे त्यात शैक्षणिक साधन सुविधांच्या बाबतीत गोव्याला देशात दुसरा क्रमांक प्राप्त झाला आहे. पहिल्या क्रमाकांवर असलेले पंजाब हे राज्य गोव्यापेक्षा केवळ एका गुणाने पुढे आहे. पंजाबला 150 पैकी 139 गुण प्राप्त झाले आहेत तर गोव्याला 138 गुण प्राप्त झाले. केंद्र सरकारने परफॉर्मन्स ग्रेडींग इंडेक्सवर आधारित हा 2017-18 चा अहवाल जारी केला आहे. शाळांत असलेल्या विज्ञान व संगणक प्रयोग शाळा, माध्यान्ह आहार, पिण्याच्या पाण्याची सोय, गणवेष, पुस्तके आणि इतर गरजेच्या सुविधा या सव्र्हेक्षणात लक्षात घेतल्या आहेत.

एकूणच शिक्षणाच्या बाबतीत एक हजारापैकी 738 गुण प्राप्त झालेल्या गोव्याला तिसरी ग्रेड प्राप्त झाली असून गुणात्मक शिक्षण विभागात गोव्याला 21 वा, शालेय प्रवेशाच्या बाबतीत सातवा, प्रशासकीय पद्धती बाबतीत 26 वा तर समानतेच्या बाबतीत 13 वा क्रमांक प्राप्त झाला आहे. शिक्षण सुविधांच्या बाबतीत अशी दिलासादायक स्थिती असली तरी स्वच्छतेच्या बाबतीत मात्र गोव्यातील स्थिती अगदीच उदासीन अशी असून 2019 च्या स्वच्छ सव्र्हेक्षणात गोव्याचा क्रमांक तळातील दहा राज्यात समाविष्ट असून गोव्याची राजधानी असलेल्या पणजीचाही क्रमांक 445 शहरांपैकी 337 वा आहे. 2016 मध्ये स्वच्छतेच्या बाबतीत पणजीचा क्रमांक 16 वा होता. 2017 मध्ये त्यात घसरण होऊन तो 90 वर पोहोचला. 2018 साली पणजीला 115 वे स्थान मिळाले होते तर आता या शहराचा क्रमांक 337 वर पोहोचला आहे.

गोव्यातील इतर शहरांची स्थिती तर त्यापेक्षाही हलाखीची असून सर्व शहरे 800 पेक्षा खालच्या क्रमाकांवर आहेत. गोव्यात पहिल्या क्रमाकांवर असलेली कुंकळ्ळी नगरपालिका राष्ट्रीय स्तरावर 829 व्या क्रमांकावर तर साखळी नगरपालिका 1000 क्रमांकावर आहे. यातील दिलासा देणारी एकच गोष्ट म्हणजे राजधानीच्या पणजी शहराला नवीन संकल्पना राबविण्याच्या बाबतीत मात्र पहिला क्रमांक प्राप्त झाला आहे.

प्रभावीरित्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यात येत असलेले अपयश आणि उघडय़ावरील शौचाचे प्रकार पूर्णपणो बंद करण्यास आलेले अपयश या घसरणीला मुख्य कारण असल्याचे सांगितले जाते. गोवा बाकीच्या बाबतीत जरी पुढारलेले राज्य असले तरी स्वच्छतेच्या बाबतीत इतर मागास राज्यांच्या तुलनेतही बरेच मागे असल्याचे स्पष्ट झाले असून राजकीय इच्छाशक्तीचा अभाव त्यामागे मुख्य कारण आहे. त्याशिवाय कचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्प उभारण्याबाबत स्थानिकांकडून होत असलेला विरोध हेही त्याचे मुख्य कारण आहे. एवढेच नव्हे तर गोवा हे पर्यटन राज्य असल्याने आणि त्यामुळे या क्षेत्रत ब:याच मोठय़ा प्रमाणावर इतर राज्यातील कामगार वर्ग गोव्यात आल्याने गोव्यातील एकूणच साधनसुविधांवरील ताण वाढलेला असून त्याचाच परिणाम राज्याच्या स्वच्छतेच्या बाबतीत झालेला दिसून येत आहे. 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानgoaगोवाEducationशिक्षण