शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

गोव्यात मद्यपींचं बुरे दिन; कायमस्वरुपी गुन्हेगारांच्या यादीत नाव जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 21:48 IST

दारुच्या नशेत वाहने चालविणाऱ्यांनी सवय मोडली नाही, तर काय होऊ शकते याची कल्पना बहुतेकांना नाही.

पणजी: दारुच्या नशेत वाहने चालविणाऱ्यांनी सवय मोडली नाही, तर काय होऊ शकते याची कल्पना बहुतेकांना नाही. अशा चालकांना केवळ दंड ठोठावून व चालक परवाने निलंबित करून पोलीस थांबणार नाहीत, तर अशा व्यक्तीला कायमचेच गुन्हेगारांच्या यादीत टाकले जाणार आहे. त्यामुळे भविष्याच चारित्र्याचा दाखला मिळणार नाही व कधी पासपोर्टही बनविता येणार नाही. पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांच्याशी झालेल्या गप्पादरम्यान त्यांनी मद्यपी चालकांवर येत्या काळात केल्या जाणाऱ्या कारवाईची माहिती दिली.वाहतूक नियम मोडणाऱ्यांना पासपोर्ट मिळणार नाही हे कसे काय असे मुक्तेश चंदर यांना विचारले तेव्हा ते म्हणाले, पासपोर्ट पोलीस खात्याकडून दिला जात नाही. त्यामुळे हे विधान मी थेट करू शकत नाही, परंतु अर्थ मात्र तसाच होत आहे. वाहतूक नियमभंगाचे खूप प्रकार आहेत. सर्वात मोठा गुन्हा तेव्हाच ठरतो, जेव्हा वाहन चालक शुद्धीत नसताना किंवा अर्ध्या शुद्धीत असताना वाहन चालवितो. कारण अशी माणसे कुणाला कधी कशी धडक देऊन मारून टाकतील काही सांगता येत नाही. त्यामुळे पोलीस अशा लोकांच्या बाबतीत कठोर वागतील. कायद्यानुसार त्याला  शिक्षाही होईल. त्याची नोंदही ठेवली जाणार आहे. भविष्यात हा माणूस एखादा महत्त्वपूर्ण दाखला वगैरे मागायला अला त्यावेळी त्याला त्रास होईल. पासपोर्टसंबंधीच्या अर्जावरच कधी दोषी सिद्ध होवून न्यायालयात गेलाय काय असा प्रश्न असतो. त्यावर ही अशी माणसे काय लिहिणार? शिवाय अशा माणसाच्या बाबतीत पासपोर्टसाठी पोलीस अहवाल मागितला जाईल. त्यातही त्याच्या तुरुंगवासाचा उल्लेख असणार. म्हणजे त्याला पासपोर्ट कसा मिळणार?’ असा प्रश्न त्यांनी केला.  अजूनही मोठ्या प्रमाणावर नशेत वाहने चालविण्याचे प्रकार घडत असल्याचे ते सांगतात. पहिल्याच मोहिमेत पोलिसांना ३१५ जण मद्यपी चालक सापडले. ही मोहीम दोन दिवसांपूर्वी जाहीर करून सुरू केली होती. त्यानंतर जाहीर न करता अचानक रात्रीच्यावेळी हाती घेतलेल्या मोहिमेतही मोठ्या प्रमाणावर तसे चालक मिळाले. यापुढे आकस्मिकपणे मोहिमा हाती घेतल्या जातील. मद्यपी चालकांच्या विरोधात वारंवार कारवाई केली जाईल आणि ती ही आकस्मिकपणे, अशी माहिती त्यांनी दिली. पोलीस कारवाईत ढिसाळपणा आहे असे म्हणता येणार नाही. मद्यपी चालकांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. त्यांच्यावर लवकरच कारवाई होईल. स्वत: पोलिसांनी तर या बाबतीत खूप सतर्क राहावे असे आवाहन त्यांनी केले. नशेत असताना ड्रायव्हिंगवर लक्ष लागत नाही. उलट शुद्ध हरपल्यामुळे चालक अनेक चुका करून बसतो. त्यामुळे केव्हाही पोलीस आल्कोमिटर घेऊन रस्त्यावर राहू शकतात असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिसpassportपासपोर्ट