शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

गोव्यात मद्यपींचं बुरे दिन; कायमस्वरुपी गुन्हेगारांच्या यादीत नाव जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 21:48 IST

दारुच्या नशेत वाहने चालविणाऱ्यांनी सवय मोडली नाही, तर काय होऊ शकते याची कल्पना बहुतेकांना नाही.

पणजी: दारुच्या नशेत वाहने चालविणाऱ्यांनी सवय मोडली नाही, तर काय होऊ शकते याची कल्पना बहुतेकांना नाही. अशा चालकांना केवळ दंड ठोठावून व चालक परवाने निलंबित करून पोलीस थांबणार नाहीत, तर अशा व्यक्तीला कायमचेच गुन्हेगारांच्या यादीत टाकले जाणार आहे. त्यामुळे भविष्याच चारित्र्याचा दाखला मिळणार नाही व कधी पासपोर्टही बनविता येणार नाही. पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांच्याशी झालेल्या गप्पादरम्यान त्यांनी मद्यपी चालकांवर येत्या काळात केल्या जाणाऱ्या कारवाईची माहिती दिली.वाहतूक नियम मोडणाऱ्यांना पासपोर्ट मिळणार नाही हे कसे काय असे मुक्तेश चंदर यांना विचारले तेव्हा ते म्हणाले, पासपोर्ट पोलीस खात्याकडून दिला जात नाही. त्यामुळे हे विधान मी थेट करू शकत नाही, परंतु अर्थ मात्र तसाच होत आहे. वाहतूक नियमभंगाचे खूप प्रकार आहेत. सर्वात मोठा गुन्हा तेव्हाच ठरतो, जेव्हा वाहन चालक शुद्धीत नसताना किंवा अर्ध्या शुद्धीत असताना वाहन चालवितो. कारण अशी माणसे कुणाला कधी कशी धडक देऊन मारून टाकतील काही सांगता येत नाही. त्यामुळे पोलीस अशा लोकांच्या बाबतीत कठोर वागतील. कायद्यानुसार त्याला  शिक्षाही होईल. त्याची नोंदही ठेवली जाणार आहे. भविष्यात हा माणूस एखादा महत्त्वपूर्ण दाखला वगैरे मागायला अला त्यावेळी त्याला त्रास होईल. पासपोर्टसंबंधीच्या अर्जावरच कधी दोषी सिद्ध होवून न्यायालयात गेलाय काय असा प्रश्न असतो. त्यावर ही अशी माणसे काय लिहिणार? शिवाय अशा माणसाच्या बाबतीत पासपोर्टसाठी पोलीस अहवाल मागितला जाईल. त्यातही त्याच्या तुरुंगवासाचा उल्लेख असणार. म्हणजे त्याला पासपोर्ट कसा मिळणार?’ असा प्रश्न त्यांनी केला.  अजूनही मोठ्या प्रमाणावर नशेत वाहने चालविण्याचे प्रकार घडत असल्याचे ते सांगतात. पहिल्याच मोहिमेत पोलिसांना ३१५ जण मद्यपी चालक सापडले. ही मोहीम दोन दिवसांपूर्वी जाहीर करून सुरू केली होती. त्यानंतर जाहीर न करता अचानक रात्रीच्यावेळी हाती घेतलेल्या मोहिमेतही मोठ्या प्रमाणावर तसे चालक मिळाले. यापुढे आकस्मिकपणे मोहिमा हाती घेतल्या जातील. मद्यपी चालकांच्या विरोधात वारंवार कारवाई केली जाईल आणि ती ही आकस्मिकपणे, अशी माहिती त्यांनी दिली. पोलीस कारवाईत ढिसाळपणा आहे असे म्हणता येणार नाही. मद्यपी चालकांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. त्यांच्यावर लवकरच कारवाई होईल. स्वत: पोलिसांनी तर या बाबतीत खूप सतर्क राहावे असे आवाहन त्यांनी केले. नशेत असताना ड्रायव्हिंगवर लक्ष लागत नाही. उलट शुद्ध हरपल्यामुळे चालक अनेक चुका करून बसतो. त्यामुळे केव्हाही पोलीस आल्कोमिटर घेऊन रस्त्यावर राहू शकतात असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिसpassportपासपोर्ट