शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

खाकी नैराश्यात; ३ वर्षांत ५ जणांनी संपवले जीवन, तर ३८ पोलिसांनी सोडली नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 14:12 IST

विधानसभेत लेखी उत्तरातून माहिती समोर

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'शांती.. सेवा.. न्याय' हे ब्रीद घेऊन ऑनड्युटी २४ तास कायदा व सुव्यवस्थेचे पालन करणाऱ्या पोलिसांना ताण-तणावाचाही सामना करावा लागत असल्याचे समोर आले आहे. गेल्या तीन वर्षात पाच पोलिसांनी नैराश्यातून जीवनयात्रा संपवली, तर जवळपास ३८ जणांनी खाकीला रामराम ठोकल्याची धक्कादायक माहिती विधानसभेत लेखी उत्तरातून मिळाली आहे. 

राज्यात पोलिसांवर कामाचा दबाव व ताण वाढत असल्याचे दिसून येत असून एप्रिल २०२२ ते जून २०२५ या तीन वर्षात एकूण ५ पोलिसांनी आत्महत्या केली आहे. त्याचबरोबर १० हजार ७४४ पोलिस कर्मचारी विविध आजारांनी आजारी पडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात लेखी स्वरूपात दिली आहे. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी हा लेखी प्रश्न अधिवेशनात मांडला होता. उत्तरात नमूद केलेल्या माहितीनुसार पाच पोलिस कर्मचाऱ्यांनी कामाच्या दबावामुळे आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तसेच कामाचा ताण सहन होत नसल्याने तर काही जणांनी स्वेच्छेने अशा विविध कारणांमुळे ३८ पोलिस कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली आहे. सरकारकडून पोलिसांची आरोग्य शिबिरामार्फत तपासणी तसेच इतर तपासण्या केल्या जात आहेत.

राज्यात पोलिसांवरील तक्रारीतही वाढ होत आहे. त्यामुळे गेल्या साडेतीन वर्षांत १०७ पोलिसांना निलंबित केले आहे तर १२ जणांना मोठ्या गुन्ह्यामुळे सेवेतून बडतर्फही करण्यात आले आहे. तसेच या १०७ निलंबनातील एकूण ८० पोलिसांना पुन्हा सेवेत घेतले आहे. मागील तीन वर्षांत पोलिसांच्या तक्रारीत वाढ झालेली आहे. अनेक पोलिसही भ्रष्टाचाराचे आरोप तर काही जणांना सेवेत हलगर्जीपण केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

१०,७४४ पोलिस आजारी

राज्यात गेल्या तीन वर्षांत १० हजार ७४४ पोलिस आजारी पडले आहेत. यात उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, छातीत दुखणे, मुळव्याध, यकृताचा आजार, हाडांचा आजार, मुतखडा, सांधेदुखी, उलटी, ताप अशा विविध आजारांची नोंद आहे. या आजारांवर सरकारकडून १ कोटी, ९२ हजार ९१४ रुपये खर्च केले असल्याची माहितीही देण्यात आली आहे. वाढता कामाचा ताण, दबाव अशा विविध कारणांमुळे पोलिस कर्मचाऱ्यांना विविध आजार होताना दिसत आहेत. 

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिसPoliticsराजकारणState Governmentराज्य सरकार