शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

खाकी नैराश्यात; ३ वर्षांत ५ जणांनी संपवले जीवन, तर ३८ पोलिसांनी सोडली नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 14:12 IST

विधानसभेत लेखी उत्तरातून माहिती समोर

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'शांती.. सेवा.. न्याय' हे ब्रीद घेऊन ऑनड्युटी २४ तास कायदा व सुव्यवस्थेचे पालन करणाऱ्या पोलिसांना ताण-तणावाचाही सामना करावा लागत असल्याचे समोर आले आहे. गेल्या तीन वर्षात पाच पोलिसांनी नैराश्यातून जीवनयात्रा संपवली, तर जवळपास ३८ जणांनी खाकीला रामराम ठोकल्याची धक्कादायक माहिती विधानसभेत लेखी उत्तरातून मिळाली आहे. 

राज्यात पोलिसांवर कामाचा दबाव व ताण वाढत असल्याचे दिसून येत असून एप्रिल २०२२ ते जून २०२५ या तीन वर्षात एकूण ५ पोलिसांनी आत्महत्या केली आहे. त्याचबरोबर १० हजार ७४४ पोलिस कर्मचारी विविध आजारांनी आजारी पडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात लेखी स्वरूपात दिली आहे. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी हा लेखी प्रश्न अधिवेशनात मांडला होता. उत्तरात नमूद केलेल्या माहितीनुसार पाच पोलिस कर्मचाऱ्यांनी कामाच्या दबावामुळे आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तसेच कामाचा ताण सहन होत नसल्याने तर काही जणांनी स्वेच्छेने अशा विविध कारणांमुळे ३८ पोलिस कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली आहे. सरकारकडून पोलिसांची आरोग्य शिबिरामार्फत तपासणी तसेच इतर तपासण्या केल्या जात आहेत.

राज्यात पोलिसांवरील तक्रारीतही वाढ होत आहे. त्यामुळे गेल्या साडेतीन वर्षांत १०७ पोलिसांना निलंबित केले आहे तर १२ जणांना मोठ्या गुन्ह्यामुळे सेवेतून बडतर्फही करण्यात आले आहे. तसेच या १०७ निलंबनातील एकूण ८० पोलिसांना पुन्हा सेवेत घेतले आहे. मागील तीन वर्षांत पोलिसांच्या तक्रारीत वाढ झालेली आहे. अनेक पोलिसही भ्रष्टाचाराचे आरोप तर काही जणांना सेवेत हलगर्जीपण केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

१०,७४४ पोलिस आजारी

राज्यात गेल्या तीन वर्षांत १० हजार ७४४ पोलिस आजारी पडले आहेत. यात उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, छातीत दुखणे, मुळव्याध, यकृताचा आजार, हाडांचा आजार, मुतखडा, सांधेदुखी, उलटी, ताप अशा विविध आजारांची नोंद आहे. या आजारांवर सरकारकडून १ कोटी, ९२ हजार ९१४ रुपये खर्च केले असल्याची माहितीही देण्यात आली आहे. वाढता कामाचा ताण, दबाव अशा विविध कारणांमुळे पोलिस कर्मचाऱ्यांना विविध आजार होताना दिसत आहेत. 

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिसPoliticsराजकारणState Governmentराज्य सरकार