शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
4
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
5
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
6
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
7
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
8
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
9
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
10
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
11
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
12
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
13
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
14
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
15
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
16
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
17
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
18
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
19
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
20
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग

गोवा पोलिसांना मिळाले तपासाचे नवीन तंत्र, पहिलाच प्रयोग यशस्वी सिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 21:33 IST

महिलेवर बलात्कार करून खून करण्याच्या  जुने गोवा येथील अघोरी गुन्ह्याचा यशस्वी तपास करून गोवा पोलिसांनी आपले कौशल्य पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

- वासुदेव पागी 

पणजी - महिलेवर बलात्कार करून खून करण्याच्या  जुने गोवा येथील अघोरी गुन्ह्याचा यशस्वी तपास करून गोवा पोलिसांनी आपले कौशल्य पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या प्रकरणात पोलीस उपमहानिरीक्षक परमादित्त्य  यांनी  विशेष रस घेताना २८ तपास पथके नियुक्त करून वेगळ््या पद्धतीच़्या तपास तंत्राचा वापर यावेळी केला, आणि हे तंत्र यशस्वी सिद्ध झाले आहे. त्यामुळे यापुढील सर्व महत्त्वाची प्रकरणे याच तपास तंत्राने हाताळली गेली तर गुन्हेगारीवर चाप बसविण्यासाठीही ते प्रभावी सिद्ध होवू शकते. 

महिलेवरील खून प्रकरणात गुन्हा नोंदविला गेल्यापासून गुन्हेगार सापडेपर्यंत जो तपासाचा धडाका लावण्यात आला त्यात शंभराहून अधिक पोलीस कामाला लागले होते. तपास कामाच्या एका नवीन तंत्राची ओळख करून देताना उपमहानिरीक्षकानीं २६ पथके नियुक्त केली. एका पथकाची संख्या दोन वरून चार सदस्यांपर्यंत होती. प्रत्येक पथकाला वेगवेगळी कामे म्हणजेच २८ पथकांना २८ लक्ष्ये देण्यात आली होती. म्हणजेच तपासाची सुरूवातच सर्व शक्यता लक्षात घेऊन त्या अनुशंगाने करण्यात आली होती. गुन्हा जुने गोवा पोलीस स्थानकात नोंद करण्यात आला असला तरी जिल्हा पोलीस अणि गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीसांनाही तपास कामात गुंतविण्यात आले होते. काहींना त्या भागातील इमारतीत असलेल्या सीसीटीव्हींची विशेशत: तेथील रस्त्यावरील वाहतूक टीपणारी  फुटेज तपासण्याचे काम, काही पथकांना केवळ वैद्यकीय बाजू पाहाण्याचे काम, काहींना आजूबाजूच्या दुकांने, मद्यालये, घरे व आस्थापने यांना भेट देऊन युवतीची माहिती घेण्याचे काम देण्यात आले होते. अशा वेगवेगळ््या २८ कामांची सूचीच महानिरीक्षक घेऊन आले होते.   दोन दिवसात मिळून २०० हून अधिक लोकांना पोलिसांनी संशयावरून पोलीस स्थानकात आणले होते. तपासाची चाळण लावता लावता नेमका संशयितही त्यातच सापडला गेला व त्याने गुन्हाही कबूल केला.  

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक कुणी तरी साहेब सांगतो आणि इतर लोक ऐकतात असेही या तपासाच्या बाबतीत घडले नव्हते. अगधी कॉन्स्टेबलचीही सूचना लक्ष्यवेधी वाटली तरी ऐकली जाईल याचा विश्वासही देण्यात आला होता. काही ज्येष्ठ अधिकाºयांच्या हे पचनी पडले नव्हते पण त्याकडे फारसे लक्ष देण्यात आले नाही. ठराविक वेळानंतर सर्व पथकांच्या कामाचा आढावाही घेतला जात होता. यामुळेच केवळ दोन दिवसात खुन्याला पकडण्यास यश मिळाले. 

उपमहानिरीक्षकांच्या या नव्या तंत्राच्या बाबतीत काही एक दोन ज्येष्ठ अधिकारी  अनुकूल नसले तरी काही पोलीस निरीक्षकांनी लोकमतशी बोलताना हे अत्यंत प्रभावी तंत्र असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या. इतर बाबतीत आपण पहातो की तपास अधिकारी बिचारा एक दोन कॉन्स्टेबलना घेऊन काम करीत असतो आणि बाकीच्यांना काहीच देणंघेणं नसते. डीआयजीच्या नवीन तंत्रात मोठे टीमवर्क आहे आणि ते प्रभावीही आहे असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgoaगोवा