शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

गोवा : खाणप्रश्नी आधी याचिका, मग अध्यादेश - भाजपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2018 20:09 IST

राज्यात खनिज खाणी लवकर सुरू व्हायला हव्यात अशी आमचीही मागणी आहे. त्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत.

पणजी : राज्यात खनिज खाणी लवकर सुरू व्हायला हव्यात अशी आमचीही मागणी आहे. त्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. खनिज खाणप्रश्नी अगोदर सर्वोच्च न्यायालयात गोवा सरकार फेरविचार याचिका सादर करील. त्या याचिकेद्वारे जर न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही तर मग शेवटचा उपाय म्हणून अध्यादेश जारी करण्याचा मार्ग स्वीकारला जाईल, असे उत्तर गोव्याचे खासदार असलेले केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी शनिवारी येथे सांगितले.

पत्रकारांशी बोलताना नाईक म्हणाले, की अध्यादेश काढणारच नाही असे काही नाही पण तो शेवटचा पयार्य आहे. तत्पूर्वी फेरविचार याचिका घेऊन न्यायालयात जाणो गरजेचे आहे. त्यासाठी कायदेशीर बाजू घट्ट करण्याचे काम सुरू आहे. म्हणून याचिका सादर होण्यास थोडा वेळ सरकारने घेतला आहे. फेरविचार याचिका निश्चितच सादर केली जाईल. शेवटी अध्यादेश देखील काढावा लागेल हा मुद्दा आम्ही केंद्र सरकारसमोर मांडला आहे. 2037 सालार्पयत सध्याच्या लिजांवर खनिज व्यवसाय सुरू ठेवता येईल.

फॉरवर्डची डिचोलीस भेट

दरम्यान, डिचोलीत गेले काही दिवस वेदांता खाण कंपनीचे कर्मचारी आंदोलन करत आहेत. या कर्मचा-यांना नोकरीवरून कमी करण्यात आले आहे. मंत्री विजय सरदेसाई यांच्या सूचनेवरून दुर्गादास कामत व संतोषकुमार सावंत यांनी शनिवारी डिचोलीला भेट दिली व या कर्मचा:यांना पाठींबा जाहीर केला. त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन गोवा फॉरवर्ड तुमच्या प्रश्नाबाबत आवाज उठवील, अशी ग्वाही कामत व सावंत यांनी कर्मचा:यांना दिली. खनिज खाण व्यवसाय शक्य तेवढय़ा लवकर सुरू व्हावा म्हणून मंत्री सरदेसाई हे सरकारवर दबाव कायम ठेवतील, अशीही ग्वाही कर्मचा-यांना देण्यात आली.

आम्हाला नोकरीवरून काढल्याबाबत विभागीय मजुर आयुक्तांसमोर आमचा विषय मांडा, अशी विनंती कर्मचा:यांनी केली. आमची थकबाकीही कंपनीने दिलेली नाही, असे कर्मचा-यांनी सांगितले. हा विषय सरदेसाई यांच्याकडून येत्या आठवडय़ात आयुक्तांसमोर मांडला जाईल, अशी ग्वाही गोवा फॉरवर्डच्या पदाधिका-यांनी कर्मचा-यांना दिली. यावेळी चौगुले युनियनचे नेते संदीप घाटवळ हेही उपस्थित होते.