शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील ट्रॉलर्स समुद्रात जाण्यामध्ये अजून अडचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 15:02 IST

गोव्यात मासेमारी बंदीचा काळ संपुष्टात आला, तरी देखील ट्रॉलर्स तथा यांत्रिक बोटी समुद्रात मासेमारीसाठी जाण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत.

पणजी : गोव्यात मासेमारी बंदीचा काळ संपुष्टात आला, तरी देखील ट्रॉलर्स तथा यांत्रिक बोटी समुद्रात मासेमारीसाठी जाण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. यामुळे 70 टक्के ट्रॉलर्स अजूनही मासेमारीसाठी जाऊ शकलेल्या नाहीत. पावसाळा सुरू झाल्यानंतर गोव्यात मासेमारी बंदीचा काळ लागू होत असतो. 31 जुलैर्पयत ही बंदी लागू असते. किना-यावर येऊन या काळात मासे अंडी घालतात. त्यामुळे यांत्रिक बोटींद्वारे मासेमारी केल्यास अंडी नष्ट होण्याचा धोका असते. यामुळे ट्रॉलर्सद्वारे मासेमारी बंद ठेवलेली असते. फक्त छोटय़ा होडय़ांद्वारे काही प्रमाणात मासेमारी होत असते. पावसाळ्य़ात समुद्र जेव्हा रौद्र रुप धारण करतो तेव्हा मच्छीमारांना मासेमारीसाठी जाताही येत नाही.

गोव्यात मासळी उत्पादन वाढलेले आहे. गोव्यात मासेमारी बंदीचा काळ संपुष्टात आल्यानंतर प्रचंड प्रमाणात मासळी बाजारात उपलब्ध होईल अशी अपेक्षा होती पण अजून हवी तेवढय़ा प्रमाणात मासळी आलेली नाही. कारण फक्त 30 टक्केच ट्रॉलर्स मासेमारीसाठी आतार्पयत समुद्रात जाऊ शकले. मासेमारी बंदी संपुष्टात आल्यानंतर आठ दिवसांचा काळ लोटला. ज्यावेळी बंदी लागू असते तेव्हा ट्रॉलर्सवर काम करणारे कामगार आपल्या मूळ घरी गेलेले असतात. ट्रॉलर मालकांकडून ते अगाऊ रक्कम घेऊनच जातात. ओरीसा, झारखंड, तामिळनाडू, केरळ अशा ठिकाणचे मनुष्यबळ गोव्यातील ट्रॉलर्सवर काम करते. गोमंतकीय कामगार केवळ पाच टक्के असतात. आपल्या मूळ गावी गेलेले कामगार अजुनही परतलेले नाहीत असे बहुतेक ट्रॉलर मालकांचे म्हणणे आहे. दोन दिवसांपूर्वी गोव्यातील अनेक ट्रॉलर्सनी समुद्रात जाण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळी जोरदार वारे वाहू लागल्याने हे ट्रॉलर्स रिकाम्या हातानी परत आले. पुढील आठवड्यातच ख-या अर्थाने बहुतांश ट्रॉलर्स समुद्रात जाऊ शकतील.

मच्छीमार खात्याचे मंत्री विनोद पालयेकर यांनी लोकमतला सांगितले, की बहुतेक ट्रॉलर्स अजून समुद्रात न गेल्यामुळे पुरेशा प्रमाणात मासळी आलेली नाही पण परप्रांतांमधून मासळी येत आहे. अन्न व औषध प्रशासन खात्याचे अधिकारी या मासळीची सीमेवर तपासणी करतात व त्यांना ते आत गोव्यात प्रवेश देतात.

दरम्यान, आरोग्य मंत्री विश्वजित राणो यांनी सांगितले की, गोव्याच्या सीमेवर पोळे येथे बुधवारी मध्यरात्री 53 मासेवाहू वाहनांची तपासणी करण्यात आली. ही वाहने कर्नाटकमधून आली होती. तिथे माशांचे नमूने तपासले गेले. पत्रदेवी येथे 77 वाहने तपासली गेली. ही मासळीवाहू वाहने महाराष्ट्रातून आले होते. काही मासे हे गोव्यातील कारखान्यांमध्ये जातात. 

टॅग्स :Fishermanमच्छीमारgoaगोवा