शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
3
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
4
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
5
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
6
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
7
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
8
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
9
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
10
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
11
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
12
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
13
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
14
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
15
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
16
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
17
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
18
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
19
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
20
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?

गोव्यात खाणप्रश्नी सर्वपक्षीय बैठक निष्फळ, स्थिती मांडण्याठी सोमवारी केंद्राकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2018 21:34 IST

राज्यात येत्या दि. 16 पासून लागू होत असलेली खनिज खाण बंदी टाळावी आणि लिजांचा लिलावही केला जाऊ नये अशा प्रकारच्या मागण्या घेऊन गोव्याचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ येत्या सोमवारी दिल्लीला जाणार आहे.

पणजी : राज्यात येत्या दि. 16 पासून लागू होत असलेली खनिज खाण बंदी टाळावी आणि लिजांचा लिलावही केला जाऊ नये अशा प्रकारच्या मागण्या घेऊन गोव्याचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ येत्या सोमवारी दिल्लीला जाणार आहे. केंद्रीय खाण मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांना हे शिष्टमंडळ भेटेल. सर्वपक्षीय शिष्टमंडळाची गुरुवारी मंत्रलयात बैठक झाली तरी, खाण बंदीवर कायदेशीर तोडगा कसा काढता येईल याविषयी बैठकीत काहीच ठरले नाही. त्यादृष्टीने ती निष्फळ ठरली आहे.

खाण बंदी लागू झाल्यास गोव्याची साडेतीन हजार कोटी रुपयांची आर्थिक हानी होईल व लाखभर रोजगार संधी संपुष्टात येतील, अशी भीती सर्वपक्षीय बैठकीत व्यक्त झाली. ज्येष्ठ मंत्री सुदिन ढवळीकर यांनी ही बैठक घेतली. वटहुकूम जारी करून केंद्रीय खनिज विकास व नियमन कायदा (एमएमडीआर) गोव्यासाठी दुरुस्त करता येतो, असा मुद्दा कुडचडेचे आमदार निलेश काब्राल यांनी मांडला. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाडय़ानुसार आणि एमएमडीआर कायद्यानुसारही खनिज लिजांचा लिलाव करावा लागेल असे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आत्माराम नाडकर्णी यांनी यापूर्वी सरकारला सांगितले आहे. मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनीही लिलाव करण्याच्याबाजूनेच कल दाखवला आहे पण आमदार काब्राल तसेच प्रतापसिंग राणो व अन्य काहीजणांना लिजांचा लिलाव झालेला नको आहे. मुख्यमंत्री आजारी असल्याने गुरुवारच्या सर्वपक्षीय बैठकीला येऊ शकले नाहीत. खनिज लिजांचा लिलाव केल्यास गोव्याबाहेरील खाण कंपन्या गोव्यातील खाण धंद्यात शिरकाव करतील असेही मत काहीजणांनी गुरुवारच्या बैठकीत मांडल्याचे कळते.

येत्या सोमवारी शिष्टमंडळ दिल्लीला जाईल व प्रथम केंद्रीय जहाजोद्योग मंत्री नितीन गडकरी यांना भेटणार आहे. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मग केंद्रीय खाण मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांना भेटून त्यांच्यासमोर गोव्यातील स्थिती मांडली जाईल. खाण बंदी झाल्यास गोव्याची मोठी आर्थिक हानी होईल, शिवाय बेरोजगारीची समस्या निर्माण होईल याची कल्पना आम्ही केंद्र सरकारला देणार आहोत, असे मगो पक्षाचे नेते असलेले मंत्री ढवळीकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र लिहू. पंतप्रधानांकडेही भेटीसाठी वेळ मागू. अगोदर सोमवारी आम्ही दोघा केंद्रीय मंत्र्यांना भेटून येऊ, असे ढवळीकर यांनी नमूद केले. 

मंत्री विजय सरदेसाई, विश्वजित राणो, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, खासदार नरेंद्र सावईकर, आमदार डॉ. प्रमोद सावंत, प्रतापसिंग राणो, दिपक प्रभू पाऊसकर, प्रसाद गावकर, भाजपचे खजिनदार संजीव देसाई, वरिष्ठ अधिकारी श्री. कृष्णमूर्ती, खाण खात्याचे संचालक प्रसन्ना आचार्य आदी बैठकीत सहभागी झाले. दिल्लीला जाणा:या सर्वपक्षीय शिष्टमंडळात काही अधिकारीही सहभागी होतील. खाण बंदी रोखण्यासाठी व लिजांचा लिलावही रोखण्यासाठी नेमका कशा प्रकारे उपाय काढता येईल ते बैठकीत स्पष्ट झाले नाही. लिलाव केला नाही म्हणून पुन्हा कुणी तरी न्यायालयात गेले तर काय करावे यादृष्टीनेही काही शंका काहीजणांनी उपस्थित केल्या. छत्तीसगढ वगैरे राज्यांसाठी सरकारने यापूर्वी केंद्रीय खनिज कायदा दुरुस्त केलेला आहे, त्याचप्रमाणो गोव्यासाठीही कायदा दुरुस्त करायला हवा, असा मुद्दा काही जणांनी बैठकीत मांडला. 

खनिज बंदी गोव्याला परवडणार नाही. साठ हजार व्यक्तींना थेट आणि लाखभर लोकांना खाण धंद्याने अप्रत्यक्ष रोजगार संधी दिलेली आहे ही स्थिती आम्ही केंद्रासमोर मांडणार आहोत, असे काही आमदारांनी सांगितले. एक लाखापेक्षा जास्त लोकांना खाणीवर नोकरी मिळालेली आहे, असे राणो म्हणाले. 

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने येत्या दि. 16 पासून खाण बंदी लागू केली आहे. त्यानुसार खाणी बंद ठेवाव्या लागणार याची कल्पना सरकारलाही आहे.

टॅग्स :goaगोवा