शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

भत्तेवाढीसाठी एकजूट, तर ज्वलंतप्रश्नी गप्प का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 11:06 IST

चाळीसी आमदार कधी एकत्रित येणार? : म्हादई, महागाईबाबत मौन

लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : विधानसभेच्या अधिवेशनामध्ये चाळीसही आमदार एकत्र येऊन लोकप्रतिनिधींच्या भत्तेवाढीसाठी आणि खर्चात वाढ करण्याचा निर्णय एकमताने घेतात. मात्र, गोव्यात येणाऱ्या संकटांचा सामना करताना किंवा म्हादई नदी, व्याघ्र प्रकल्प, खाण उद्योग, पर्यटन, गावागावांतील मतदारसंघातील रस्ते, प्रकल्प अशा प्रकल्पांसंदर्भात चाळीसही आमदार कधी एकत्रित आलेले चित्र पाहावयास मिळत नाही. मात्र, आमदारांचे भत्ते वाढावे, यासाठी विरोधी आमदारांनी सत्तारूढ आमदारांना सहकार्य केले व भत्ते वाढवून घेतले. त्याबद्दल लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

गोमंतकियांना भेडसावणाऱ्या समस्या, संकटे, प्रदूषणकारी प्रकल्प, नको असलेले प्रकल्प जनतेवर लादले जात आहेत. गावागावात प्रत्येक मतदारसंघात रस्त्यांची बिकट स्थिती आहे. त्या आणि अशा अनेक महागाईच्या समस्यांचा सामना सर्वसामान्य नागरिकांना करावा लागत आहे. त्यावेळी चाळीसही आमदार एकत्र का येत नाहीत, असा सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहेत.

विधानसभेच्या प्रत्येक दिवसासाठी आमदारांना तीन हजार रुपये भत्ता दिला जातो. विधानसभेतील चर्चेदरम्यान सार्वजनिक समस्यांवर काहीजण आवाज उठवितात, तर काहीजण अपयशी ठरतात. आम्ही निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी समस्यांवर प्रभावीपणे आवाज उठविणे आवश्यक आहे. मात्र, काहीजणांकडून कोणतेही प्रश्न उपस्थित केले जात नाहीत. त्यामुळे अगोदर जनतेचे प्रश्न लोकप्रतिनिधींनी सोडवावेत, अशी मागणी नीलेश कांदोळकर यांनी केली आहे.

समस्या ढिगभर, तरीही...

ज्यावेळी पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरचे भाव वाढले. भाजीपाला, खाण्याचे पदार्थ यांचे भाव वाढत आहेत. ते भाव नियंत्रणात राहावेत, यासाठी ४० ही आमदार का प्रयत्न करीत नाहीत? असाच सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. सर्वसामान्यांना पावलोपावली अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ग्रामीण भागात वीज, रस्ते, पाण्यासाठी वणवण सुरू आहे. विजेचा लपंडाव सुरु आहे. रस्त्यांना पडलेले ठिकठिकाणी खड्डे पडले. वाढती बेरोजगारी ही मोठी समस्या आहे. तरीही चाळीसही आमदार ज्या पद्धतीने भत्ते वाढवून घेतात, त्या पद्धतीने समस्यांसाठी ते एकत्रित का येत नाही? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

आर्थिक उत्पन्न किंवा आधार नसल्यामुळे गृहआधार लाभार्थी आणि इतर सरकारी पेन्शन योजना वेळेवर भरल्या जात नाहीत. पगाराच्या समस्येमुळे शासकीय विभागातील कंत्राटी कामगारांना नियमित केले जात नाहीत. विधानसभेचे सदस्य विशिष्ट मतदारसंघातील लोकांचे प्रतिनिधी म्हणून निवडले जातात. जनतेला भेडसावणाऱ्या समस्या वेळेवर मांडणे व त्या पूर्ण करणे, हे सदस्यांचे कर्तव्य आहे. परंतु, विधानसभेत बहुतांश मुद्द्यांवर नुसतीच चर्चा चर्चा होत असली तरी त्यांची अंमलबजावणी वेळेत होत नाही. - नीलेश कांदोळकर, पेडणे.

 

टॅग्स :goaगोवा