शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?
3
'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास
4
ICC ODI Batting Ranking : 'नवा गडी नव राज्य!' रोहित शर्माला मागे टाकत डॅरिल मिचेलनं रचला इतिहास
5
"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
6
Jalgaon Crime: 'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
7
महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन
8
'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
9
जगातील टॉप हाय-स्ट्रीट रँकिंगमध्ये भारताचा दबदबा! ही बाजारपेठ सर्वात महागडी, तर सर्वाधिक भाडे कुठे?
10
आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा
11
सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली
12
Jara Hatke: सिम कार्डचे एक टोक तिरपे का असते? ९९ % लोकांना माहीत नाही कारण!
13
किमान ५ इमारतीच्या गटाचे ‘मिनी क्लस्टर’ लवकरच; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश
14
"मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी..."; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण
15
घरमालक-भाडेकरू वादावर अखेर ब्रेक! 'नवीन भाडे करार २०२५' लागू; 'हा' नियम मोडल्यास ५ हजार दंड!
16
Vastu Tips: घड्याळ दोन-तीन मिनिटं पुढे लावणे शुभ? पाहा वास्तू शास्त्र काय सांगते... 
17
धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं वक्तव्य, पंतप्रधान मोदींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद
18
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
19
छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ATSकडून अटक; 'ब्रेनवॉश' करून ISISमध्ये सुरू होती भरती
20
स्लीपर वंदे भारत अन् बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? अश्विनी वैष्णव यांनी तारखाच सांगितल्या
Daily Top 2Weekly Top 5

भत्तेवाढीसाठी एकजूट, तर ज्वलंतप्रश्नी गप्प का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 11:06 IST

चाळीसी आमदार कधी एकत्रित येणार? : म्हादई, महागाईबाबत मौन

लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : विधानसभेच्या अधिवेशनामध्ये चाळीसही आमदार एकत्र येऊन लोकप्रतिनिधींच्या भत्तेवाढीसाठी आणि खर्चात वाढ करण्याचा निर्णय एकमताने घेतात. मात्र, गोव्यात येणाऱ्या संकटांचा सामना करताना किंवा म्हादई नदी, व्याघ्र प्रकल्प, खाण उद्योग, पर्यटन, गावागावांतील मतदारसंघातील रस्ते, प्रकल्प अशा प्रकल्पांसंदर्भात चाळीसही आमदार कधी एकत्रित आलेले चित्र पाहावयास मिळत नाही. मात्र, आमदारांचे भत्ते वाढावे, यासाठी विरोधी आमदारांनी सत्तारूढ आमदारांना सहकार्य केले व भत्ते वाढवून घेतले. त्याबद्दल लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

गोमंतकियांना भेडसावणाऱ्या समस्या, संकटे, प्रदूषणकारी प्रकल्प, नको असलेले प्रकल्प जनतेवर लादले जात आहेत. गावागावात प्रत्येक मतदारसंघात रस्त्यांची बिकट स्थिती आहे. त्या आणि अशा अनेक महागाईच्या समस्यांचा सामना सर्वसामान्य नागरिकांना करावा लागत आहे. त्यावेळी चाळीसही आमदार एकत्र का येत नाहीत, असा सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहेत.

विधानसभेच्या प्रत्येक दिवसासाठी आमदारांना तीन हजार रुपये भत्ता दिला जातो. विधानसभेतील चर्चेदरम्यान सार्वजनिक समस्यांवर काहीजण आवाज उठवितात, तर काहीजण अपयशी ठरतात. आम्ही निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी समस्यांवर प्रभावीपणे आवाज उठविणे आवश्यक आहे. मात्र, काहीजणांकडून कोणतेही प्रश्न उपस्थित केले जात नाहीत. त्यामुळे अगोदर जनतेचे प्रश्न लोकप्रतिनिधींनी सोडवावेत, अशी मागणी नीलेश कांदोळकर यांनी केली आहे.

समस्या ढिगभर, तरीही...

ज्यावेळी पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरचे भाव वाढले. भाजीपाला, खाण्याचे पदार्थ यांचे भाव वाढत आहेत. ते भाव नियंत्रणात राहावेत, यासाठी ४० ही आमदार का प्रयत्न करीत नाहीत? असाच सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. सर्वसामान्यांना पावलोपावली अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ग्रामीण भागात वीज, रस्ते, पाण्यासाठी वणवण सुरू आहे. विजेचा लपंडाव सुरु आहे. रस्त्यांना पडलेले ठिकठिकाणी खड्डे पडले. वाढती बेरोजगारी ही मोठी समस्या आहे. तरीही चाळीसही आमदार ज्या पद्धतीने भत्ते वाढवून घेतात, त्या पद्धतीने समस्यांसाठी ते एकत्रित का येत नाही? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

आर्थिक उत्पन्न किंवा आधार नसल्यामुळे गृहआधार लाभार्थी आणि इतर सरकारी पेन्शन योजना वेळेवर भरल्या जात नाहीत. पगाराच्या समस्येमुळे शासकीय विभागातील कंत्राटी कामगारांना नियमित केले जात नाहीत. विधानसभेचे सदस्य विशिष्ट मतदारसंघातील लोकांचे प्रतिनिधी म्हणून निवडले जातात. जनतेला भेडसावणाऱ्या समस्या वेळेवर मांडणे व त्या पूर्ण करणे, हे सदस्यांचे कर्तव्य आहे. परंतु, विधानसभेत बहुतांश मुद्द्यांवर नुसतीच चर्चा चर्चा होत असली तरी त्यांची अंमलबजावणी वेळेत होत नाही. - नीलेश कांदोळकर, पेडणे.

 

टॅग्स :goaगोवा