शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

'एमएमडीआर कायद्यात दुरुस्ती करुनच गोव्यातील खाण अवलंबितांना न्याय द्या'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 15:09 IST

खाणींच्या बाबतीत वटहुकूम न काढता केंद्र सरकारने थेट एमएमडीआर कायद्यात दुरुस्ती करुनच गोव्यातील खाण अवलंबितांना न्याय द्यावा, अशी मागणी गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटचे अध्यक्ष पुती गावकर यांनी केली आहे.

ठळक मुद्देएमएमडीआर कायद्यात दुरुस्ती करुनच गोव्यातील खाण अवलंबितांना न्याय द्याबंद असलेल्या खाणी पूर्ववत् सुरु करण्याच्याबाबतीत वटहूकूम काढण्यास केंद्र सरकार अनुकूल नसल्याने त्याचे तीव्र पडसाद खाण अवलंबितांमध्ये उमटले खाणी पूर्ववत सुरू व्हाव्यात यासाठी केंद्राला राजी करणार की नाही याबाबत भाजपाच्या तिन्ही खासदारांनी स्पष्टीकरण द्यावे

पणजी : संसदेचे हिवाळी अधिवेशन येत्या महिन्यात होत आहे. त्यामुळे आता अगदीच कमी अवधी उरल्याने खाणींच्या बाबतीत वटहुकूम न काढता केंद्र सरकारने थेट एमएमडीआर कायद्यात दुरुस्ती करुनच गोव्यातील खाण अवलंबितांना न्याय द्यावा, अशी मागणी गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटचे अध्यक्ष पुती गावकर यांनी केली आहे. खाणींच्या बाबतीत गोव्यातील स्थिती अन्य राज्यांमधील खाणींच्या तुलनेत वेगळी आहे. येथे खाण व्यवसायाकरिता खाजगी जमिनी मालकी तत्त्वावर दिल्या गेलेल्या आहेत. लीज नव्हे, तर पोर्तुगीज कन्सेशनवर जमिनी दिलेल्या आहेत, असा दावाही ते करतात. 

बंद असलेल्या खाणी पूर्ववत् सुरु करण्याच्याबाबतीत वटहूकूम काढण्यास केंद्र सरकार अनुकूल नसल्याने त्याचे तीव्र पडसाद खाण अवलंबितांमध्ये उमटले आहेत. खाणी बंद झाल्याने बेकार झालेले कामगार, ट्रकवाले, बार्जवाले तसेच अन्य अवलंबितांचे प्रतिनिधीत्त्व करणारे पुती गावकर यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला असता त्यांनी वरील मागणी केली. 

खाणी पूर्ववत सुरू व्हाव्यात यासाठी केंद्राला राजी करणार की नाही याबाबत भाजपाच्या तिन्ही खासदारांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रश्नावर सभापती प्रमोद सावंत यांची भेट घेतली तसेच नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई, बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले. 

गावकर म्हणाले की, ‘खाणबंदीमुळे  ३ लाख लोकांचा उदरनिर्वाह गेला आहे. कामगारांबरोबरच ट्रकमालक, बार्जमालकांना झळ पोचलीच. त्याचबरोबर खाणपट्टयातील गॅरेजवाले, चहाची हॉटेल्स, खानावळी यांनाही फटका बसला. एकूण अर्थव्यवस्थाच कोलमडली.खाणी कधी सुरु होणार हे निश्चित नाही. मुख्यमंत्री पर्रीकर अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेतात परंतु आम्ही या व्यवसायातील घटक असूनही आम्हाला डावलले जाते, असा आरोप करुन सरकारला काय लपवायचे आहे?, असा सवाल त्यांनी केला. सरकारने खाण अवलंबितांचा विश्वासघात केला आहे, असा आरोप त्यांनी केला. 

आमदार, मंत्र्यांनी पुन: या प्रश्नावर केंद्राकडे पाठपुरावा करायला हवा, अशी मागणी त्यांनी केली. राज्य सरकारात घटक असलेल्या मगोप तसेच गोवा फॉरवर्ड पक्षानेही या विषयावर पाठपुरावा करावा, सरकारवर दबाव आणावा आणि खाणी सरु करण्यास सरकार अपयशी ठरल्यास पाठिंबा काढावा, अशी मागणी आम्ही या पक्षाच्या नेत्यांची भेट घेऊन करणार आहोत, असे गावकर यांनी सांगितले.  

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर