शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

गोवा विधानसभा अधिवेशनात विरोधकांसोबतच सरकारचीही कसोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 14:26 IST

पणजी- गोवा विधानसभा अधिवेशनाला बुधवार 13 रोजी आरंभ होत आहे. या अधिवेशनात विरोधी काँग्रेस पक्षासह मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकारचीही कसोटी लागणार आहे. कारण गोव्यात सध्या कोळसा हाताळणी, नद्यांचे राष्ट्रीयीकरण, ग्रामसभांचे खच्चीकरण, असे वाद गाजत आहेत. एनजीओंच्या मदतीने विरोधक या विषयावरून आक्रमक बनू लागले आहेत.विधानसभा अधिवेशनाची पूर्वतयारी म्हणून काँग्रेसच्या ...

पणजी- गोवा विधानसभा अधिवेशनाला बुधवार 13 रोजी आरंभ होत आहे. या अधिवेशनात विरोधी काँग्रेस पक्षासह मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकारचीही कसोटी लागणार आहे. कारण गोव्यात सध्या कोळसा हाताळणी, नद्यांचे राष्ट्रीयीकरण, ग्रामसभांचे खच्चीकरण, असे वाद गाजत आहेत. एनजीओंच्या मदतीने विरोधक या विषयावरून आक्रमक बनू लागले आहेत.विधानसभा अधिवेशनाची पूर्वतयारी म्हणून काँग्रेसच्या आमदारांची बैठक पार पडली. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री पर्रीकर यांनीही भाजपच्या सर्व आमदारांची व मंत्र्यांची बैठक घेऊन त्यांना अधिवेशनानिमित्ताने मार्गदर्शन केले आहे. मंत्र्यांनी अभ्यास करूनच विधानसभेत यावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीवेळी भाजपच्या मंत्र्यांना केली तसेच शेवटच्या दिवसापर्यंत रोज भाजपचे सगळे आमदार सभागृहात उपस्थित रहायला हवे, अशीही सूचना पर्रीकर यांनी केली आहे.

विधानसभेत मांडण्यासाठी आमदारांनी एकूण सातशे प्रश्न सादर केले आहेत. यात काँग्रेसच्या सोळा आमदारांचे बहुतांश प्रश्न आहेत. गोव्यात प्रादेशिक आराखड्याचे काम रखडले आहे. सरकार नवा आराखडा तयार न करता नव्या पीडीएंची निर्मिती करत आहे. गोव्यातील नवे भाग पीडीएंमध्ये समाविष्ट केले जात आहेत. यामुळे लोकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. गोव्यातील सहा नद्यांचा समावेश केंद्र सरकारने राष्ट्रीय जलमार्ग कायद्यात केल्यानंतर गोव्यात वाद निर्माण झाला आहे. केरळ सरकारने ज्याप्रमाणो राष्ट्रीय जलमार्ग कायद्यातून केरळच्या काही नद्या बाहेर काढण्यास केंद्र सरकारला भाग पाडले, त्याचप्रमाणो गोवा सरकारनेही केंद्राला पत्र लिहून गोव्यातील नद्या कायद्यातून वगळण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. नद्यांच्या राष्ट्रीयीकरणामुळे गोव्यातील मच्छीमार समाजामध्ये अस्वथता आहे. येत्या अधिवेशनात आम्ही वास्कोतील कोळसा हाताळणी, प्रदूषण व नद्यांचे राष्ट्रीयीकरण या विषयावर पर्रीकर सरकारला जाब विचारू, असे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी जाहीर केले आहे.

मुख्यमंत्री पर्रीकर यांची कार्यशैली एरव्ही आक्रमक आहे. ते विरोधकांना उत्तरे देण्यामध्ये कमी पडत नाहीत पण यावेळी विविध वादांची झळ सरकारला बसू लागली आहे. गोव्यात अदानी, जिंदाल, वेदांता अशा कंपन्यांना जास्त प्रमाणात कोळसा हाताळणी व वाहतूक करता यावी म्हणूनच सरकार गोव्यातील नद्यांमधील गाळ उसपून त्या रुंद करू पाहत आहे, अशा प्रकारची टीका विरोधी काँग्रेस पक्षाचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांच्यासह काही एनजीओही करू लागल्यामुळे सरकार थोडे बॅक फुटवर गेले आहे. विरोधकांच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी करून पाहिला पण त्यात यश आलेलेले नाही. विधानसभा अधिवेशनामध्ये वादांचे पडसाद उमटणार आहेत. गोव्यात यापूर्वी क्रॉस मोडतोड प्रकरणात पोलिसांनी ज्या व्यक्तीला अटक केली होती, ती व्यक्ती अशा चार प्रकरणांमध्ये न्यायालयात निदरेष सुटल्यामुळेही सरकारवरील दबाव वाढला आहे. दिवसाढवळ्य़ाबंदुकीचा धाक दाखवून बँक लुटण्याचा प्रयत्न काही दरोडेखोरांनी नुकताच काणका- पर्रा भागामध्ये केला. यावरून कायदा सुव्यवस्था बिघडलेली असल्याची टीका विरोधकांनी चालवली आहे. राज्याची आर्थिक स्थिती नीट नसल्यानेही सरकारच्या कार्यक्षमतेवर मर्यादा येत आहे. विरोधी काँग्रेस पक्ष हे सगळे विषय किती प्रभावीपणो विधानसभेत मांडील याकडे लोकांचेही लक्ष लागून आहे.