शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

गोवा-कर्नाटकच्या सीमेवर वाघ संवर्धनास अनुकूलता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 20:45 IST

केंद्रीय व्याघ्र संवर्धन समितीने गोव्याच्या म्हादई अभयारण्य क्षेत्रात वाघांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आल्यामुळेच त्या अभयारण्याचे व्याघ्र क्षेत्रात रूपांतर करण्याची सूचना केली आहे. जी राज्य सरकारला अजून पचनी पडलेली नाही.

- राजू नायककेंद्रीय व्याघ्र संवर्धन समितीने गोव्याच्या म्हादई अभयारण्य क्षेत्रात वाघांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आल्यामुळेच त्या अभयारण्याचे व्याघ्र क्षेत्रात रूपांतर करण्याची सूचना केली आहे. जी राज्य सरकारला अजून पचनी पडलेली नाही.व्याघ्र संवर्धन समितीने नुकतीच गोव्याला भेट दिली. या भेटीत त्यांनी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांपासून म्हादईचे वनरक्षक, पर्यावरणवादी व स्थानिकांच्या गाठीभेटी घेतल्या. तेथे त्यांची खात्री पटली, देशात वाघांची संख्या वाढू शकते, अशी जी मोजकी अभयारण्ये आहेत, त्यात एक म्हादई आहे. त्यामुळे त्यांनी व्याघ्र क्षेत्राबरोबरच इतरही काही सूचना केल्या आहेत, ज्यांच्या अंमलबजावणीबाबत राज्य सरकार उदासीन होते. म्हादई अभयारण्याला विशेष दर्जा मिळूनही गेली २० वर्षे त्याची सीमा अद्याप निश्चित झालेली नाही.- राज्य सरकारच्या टाळाटाळीमुळे हा प्रकार घडलेला आहे.दुर्दैवाने समितीच्या सूचनेकडे राज्य सरकारने दुर्लक्षच करायचे ठरविले आहे असे दिसते. या भागाचे आमदार व मंत्री विश्वजित राणे यांनी यापूर्वीच ‘‘मी लोकांचा सेवक आहे. त्यामुळे माझ्या मतदारसंघातील लोकांच्या मर्जीनुसार मी भूमिका घेईन,’’ असे सांगत सत्तरीच्या लोकांचा विरोध या प्रकल्पाला आहे व त्यामुळे माझाही विरोध राहील, हे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तर वरताण भाष्य केले. ते म्हणाले, व्याघ्र समितीच्या मनात आले म्हणून म्हादई व्याघ्र क्षेत्र बनणार नाही. आम्हाला विविध घटकांशी चर्चा करूनच त्याबाबत काय ती भूमिका निश्चित करावी लागेल.या भागातील पर्यावरणप्रेमी राज्याच्या या उदासीन भूमिकेबद्दल नाराज आहेत. गेली २० वर्षे राज्य सरकार व्याघ्र क्षेत्र जाहीर करण्याबाबत टाळाटाळ करीत आहे. १९९९ मध्ये तत्कालीन पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी व्याघ्र प्रकल्पाची सूचना केली होती. परंतु राज्याने त्याबाबत निर्णय घ्यायचा होता. राज्य सरकारने त्याबाबत केवळ टोलवाटोलवी चालविली आहे.देशात सध्या तीन हजार वाघ आहेत. त्यांची संख्या धिम्या गतीने का होईना वाढते आहे. परंतु दु:खद गोेष्टीही घडतात. म्हादईत गेल्या महिन्यात चार वाघांची हत्या झाल्यानंतर व्याघ्र प्रकल्पाला हादरा बसला. तज्ज्ञांच्या मते सध्या मध्य प्रदेशात सर्वाधिक वाघ असले तरी कर्नाटक व गोवा सीमेवरील पश्चिम घाट क्षेत्रात वाघांची संख्या वाढण्यास अनुकूल वातावरण आहे. मध्य प्रदेशला सध्या ‘व्याघ्र-राज्य’ संबोधले जात असले तरी कर्नाटक सीमेवर ज्या पद्धतीने वाघांचा संचार चालू ती एक दिलासाजनक बाब आहे. दुर्दैवाने गोवा राज्य- जे पर्यावरणाबाबत खूपच सजग होते- खाण व पर्यटन उद्योगामुळे त्या बाबतीत खूपच प्रतिगामी बनले आहे. वर्षभरात राज्यात पाच वाघ मारले जाऊनही राज्य किंवा येथील वन खाते सक्रिय बनलले नाही. वन खात्यावर नेत्यांचा खूप दबाव आहे. ज्यांनी वाघांची हत्या केली, त्यांच्याबाबत सौम्य धोरण अवलंबिले जाते. उलट वनाधिकाऱ्यांचाच छळ होत आहे. प्रमोद सावंत यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत तर पर्यावरण रक्षणाची अगदीच हेळसांड होऊ लागली आहे.

टॅग्स :Tigerवाघgoaगोवाwildlifeवन्यजीव