शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

गोवा-कर्नाटकच्या सीमेवर वाघ संवर्धनास अनुकूलता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 20:45 IST

केंद्रीय व्याघ्र संवर्धन समितीने गोव्याच्या म्हादई अभयारण्य क्षेत्रात वाघांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आल्यामुळेच त्या अभयारण्याचे व्याघ्र क्षेत्रात रूपांतर करण्याची सूचना केली आहे. जी राज्य सरकारला अजून पचनी पडलेली नाही.

- राजू नायककेंद्रीय व्याघ्र संवर्धन समितीने गोव्याच्या म्हादई अभयारण्य क्षेत्रात वाघांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आल्यामुळेच त्या अभयारण्याचे व्याघ्र क्षेत्रात रूपांतर करण्याची सूचना केली आहे. जी राज्य सरकारला अजून पचनी पडलेली नाही.व्याघ्र संवर्धन समितीने नुकतीच गोव्याला भेट दिली. या भेटीत त्यांनी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांपासून म्हादईचे वनरक्षक, पर्यावरणवादी व स्थानिकांच्या गाठीभेटी घेतल्या. तेथे त्यांची खात्री पटली, देशात वाघांची संख्या वाढू शकते, अशी जी मोजकी अभयारण्ये आहेत, त्यात एक म्हादई आहे. त्यामुळे त्यांनी व्याघ्र क्षेत्राबरोबरच इतरही काही सूचना केल्या आहेत, ज्यांच्या अंमलबजावणीबाबत राज्य सरकार उदासीन होते. म्हादई अभयारण्याला विशेष दर्जा मिळूनही गेली २० वर्षे त्याची सीमा अद्याप निश्चित झालेली नाही.- राज्य सरकारच्या टाळाटाळीमुळे हा प्रकार घडलेला आहे.दुर्दैवाने समितीच्या सूचनेकडे राज्य सरकारने दुर्लक्षच करायचे ठरविले आहे असे दिसते. या भागाचे आमदार व मंत्री विश्वजित राणे यांनी यापूर्वीच ‘‘मी लोकांचा सेवक आहे. त्यामुळे माझ्या मतदारसंघातील लोकांच्या मर्जीनुसार मी भूमिका घेईन,’’ असे सांगत सत्तरीच्या लोकांचा विरोध या प्रकल्पाला आहे व त्यामुळे माझाही विरोध राहील, हे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तर वरताण भाष्य केले. ते म्हणाले, व्याघ्र समितीच्या मनात आले म्हणून म्हादई व्याघ्र क्षेत्र बनणार नाही. आम्हाला विविध घटकांशी चर्चा करूनच त्याबाबत काय ती भूमिका निश्चित करावी लागेल.या भागातील पर्यावरणप्रेमी राज्याच्या या उदासीन भूमिकेबद्दल नाराज आहेत. गेली २० वर्षे राज्य सरकार व्याघ्र क्षेत्र जाहीर करण्याबाबत टाळाटाळ करीत आहे. १९९९ मध्ये तत्कालीन पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी व्याघ्र प्रकल्पाची सूचना केली होती. परंतु राज्याने त्याबाबत निर्णय घ्यायचा होता. राज्य सरकारने त्याबाबत केवळ टोलवाटोलवी चालविली आहे.देशात सध्या तीन हजार वाघ आहेत. त्यांची संख्या धिम्या गतीने का होईना वाढते आहे. परंतु दु:खद गोेष्टीही घडतात. म्हादईत गेल्या महिन्यात चार वाघांची हत्या झाल्यानंतर व्याघ्र प्रकल्पाला हादरा बसला. तज्ज्ञांच्या मते सध्या मध्य प्रदेशात सर्वाधिक वाघ असले तरी कर्नाटक व गोवा सीमेवरील पश्चिम घाट क्षेत्रात वाघांची संख्या वाढण्यास अनुकूल वातावरण आहे. मध्य प्रदेशला सध्या ‘व्याघ्र-राज्य’ संबोधले जात असले तरी कर्नाटक सीमेवर ज्या पद्धतीने वाघांचा संचार चालू ती एक दिलासाजनक बाब आहे. दुर्दैवाने गोवा राज्य- जे पर्यावरणाबाबत खूपच सजग होते- खाण व पर्यटन उद्योगामुळे त्या बाबतीत खूपच प्रतिगामी बनले आहे. वर्षभरात राज्यात पाच वाघ मारले जाऊनही राज्य किंवा येथील वन खाते सक्रिय बनलले नाही. वन खात्यावर नेत्यांचा खूप दबाव आहे. ज्यांनी वाघांची हत्या केली, त्यांच्याबाबत सौम्य धोरण अवलंबिले जाते. उलट वनाधिकाऱ्यांचाच छळ होत आहे. प्रमोद सावंत यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत तर पर्यावरण रक्षणाची अगदीच हेळसांड होऊ लागली आहे.

टॅग्स :Tigerवाघgoaगोवाwildlifeवन्यजीव