शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

गोवा बनतोय ‘किलर स्टेट’; पर्यटकांनो सावधान, जीवाशी खेळ करू नका...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 08:50 IST

राज्याची लोकसंख्या केवळ १६ लाख असली तरी वर्षाकाठी सव्वाकोटी पर्यटक गोव्यात येतात. वाढत्या वर्दळीमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.

किशाेर कुबल पणजी : वाढते रस्ता अपघात आणि बुडून मरण पावण्याच्या घटना यामुळे गोवा ‘किलर स्टेट’ बनला आहे. गेल्या पाच वर्षांच्या काळात राज्यात रस्ता अपघातांमध्ये १,०२२ बळी गेले. तब्बल १३,७६५ अपघातांची नोंद या कालावधीत झाली. जगाच्या नकाशावर गोवा हे लौकिकप्राप्त पर्यटनस्थळ म्हणून झळकत असल्याने देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येथे भेट देत असतात.

राज्याची लोकसंख्या केवळ १६ लाख असली तरी वर्षाकाठी सव्वाकोटी पर्यटक गोव्यात येतात. वाढत्या वर्दळीमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. अधिकृत माहितीनुसार पाच वर्षांत नोंद झालेल्या १३,७६५ रस्ता अपघातांपैकी ९२४ अपघात जीव घेणारे ठरले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, ७० टक्के बळी दुचाकी अपघातातील असतात. अनेकदा भीषण अपघातांमध्ये दुचाकी चालवणारा, तसेच मागे बसलेली व्यक्तीही प्राण गमावून बसते. त्यामुळे दोघांनीही हेल्मेट परिधान करणे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

गेल्या वर्षी बुडताना वाचवले ६३९ पर्यटकांचे प्राण दृष्टी लाइफ सेव्हिंगच्या जीवरक्षकांनी गेल्या वर्षी ७६४ घटनांमध्ये ६३९ जणांना बुडण्यापासून वाचवले. याचा अर्थ दररोज सरासरी दोघांचे जीव वाचले. यात सर्वाधिक ११९ पर्यटक कर्नाटकातील होते. त्यापाठोपाठ महाराष्ट्रातील १०६ पर्यटकांचा क्रमांक लागतो. बुडण्यापासून वाचवण्यात आलेल्या १२० परदेशी पर्यटकांमध्ये प्रामुख्याने ७० रशियन आणि १६ ब्रिटिश नागरिक होते. 

५ वर्षांत १०५ पर्यटक बुडालेगेल्या पाच वर्षांत गोव्यातील समुद्र किनारे, नद्या, तसेच धबधब्यांवर १०५ पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. दक्षिण गोव्यात २१ जणांनी प्राण गमावले. मद्यपान करून समुद्रात उतरणे किंवा धबधब्यावर जाणे यामुळे दुर्घटना घडतात. दृष्टी लाइफ सेव्हिंगचे ६०० जीवरक्षक किनारे व धबधबे मिळून ४१ ठिकाणी सेवा देत आहेत. 

वाहन चालकांना विशेषत: दुचाकी चालवणारे, तसेच मागे बसणारी व्यक्ती अशा दोघांनीही हेल्मेट वापरावे, वेगाने वाहन चालवू नये, मद्यपान करून वाहन चालवू नये यासाठी पोलिस जागरूक राहून दंडात्मक कारवाई करत असतात - चेतन सावलेकर, वाहतूक पोलिस निरीक्षक, पणजी   

टॅग्स :tourismपर्यटन