शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

गोवा आयपीबीच्या सीईओंचा राजीनामा, लालफितीतील कारभाराला दोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 11:58 IST

गोवा सरकारच्या गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या (आयपीबी) मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा (सीईओ) विशाल प्रकाश यांनी राजीनामा दिला आहे.

पणजी - गोवा सरकारच्या गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या (आयपीबी) मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा (सीईओ) विशाल प्रकाश यांनी बुधवारी (11 सप्टेंबर) राजीनामा दिला आहे. त्यांनी आपले राजीनामा पत्र मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या कार्यालयास सादर केले आहे. मुख्य सचिवांनाही ते पत्र मिळाले आहे.

मुख्यमंत्री सावंत हे आयपीबीचे चेअरमन आहेत. उद्योग मंत्री व माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री या मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. राज्यात येऊ पाहणाऱ्या उद्योगांना, हॉटेल व अन्य प्रकल्पांना मंजुरी देण्याची जबाबदारी मंडळावर आहे. मंडळाची गाडी नीट चालत नसल्याची टीका अधूनमधून होत होती. अर्थात त्यास सीईओ जबाबदार नाही. सीईओ प्रकाश यांनी सविस्तरपणे आपले राजीनामा पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी सरकारच्या लालफितीतील कारभारावर बोट ठेवले आहे. यावरून राज्यातील उद्योजकांनाही स्थितीची कल्पना येते.

माझे कौशल्य आणि अनुभव यामुळे आयपीबीच्या कारभारात बदल होईल असे मला वाटले होते पण व्यवसायिक ज्या लालफितीतील कारभाराविषयी तक्रारी करतात, त्याच कारभारास मला तोंड द्यावे लागते, अशी खंत विशाल प्रकाश यांनी व्यक्त केली आहे. वायब्रंट गोवा ही ग्लोबल एक्सो परिषद यापुढील महिन्यात गोव्यात पार पडणार आहे, तत्पूर्वीच गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या सीईओंचा राजीनामा आल्याने उद्योग वतरुळात तो चर्चेचा विषय बनला आहे.

सावंत हे आयपीबीचे चेअरमन झाल्यानंतर आयपीबीची एकच बैठक झाली. केपीएमजी या आयपीबीच्या सल्लागार यंत्रणेला सरकारने दिलेले शूल्क व त्या यंत्रणेचे काम यावर गेल्या अधिवेशनात बरीच टीका झाली आहे. स्व. मनोहर पर्रीकर हे मार्च 2012 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतरच्या काळात पर्रीकर यांनीच आयपीबीची स्थापना केली होती. जलदगतीने उद्योजकांना त्यांच्या प्रकल्पांसाठी मान्यता मिळावी असे अपेक्षित होते पण आयपीबीचा कारभार हा अनेकदा वादाचाच विषय ठरला.

 

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर