शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

तीन खाण कंपन्यांना गोवा उच्च न्यायालयाचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 11:31 IST

शिरगाव गावात तिन्ही खाण कंपन्यांनी केलेल्या खनिज उत्खननामुळे तेथील शेतजमिनींचे मोठे नुकसान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: खाण व्यवसायामुळे शिरगाव येथील शेतजमिनींचे नुकसान झाल्याबद्दल तीन खाण कंपन्यांनी आणखी २ कोटी रुपये जिल्हा खनिज निधीत जमा करावेत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्यागोवा खंडपीठाने दिला आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक व निवेदिता मेहता यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.

शिरगाव गावात तिन्ही खाण कंपन्यांनी केलेल्या खनिज उत्खननामुळे तेथील शेतजमिनींचे मोठे नुकसान झाले. त्याची नुकसान भरपाई म्हणून ही रक्कम या निधीत जमा करावी, असे न्यायालयाने नमूद केले आहे. न्यायालयाच्या या आदेशाने उत्खनन करणाऱ्या खाण कंपन्यांना दणका बसला आहे.

जलस्रोत खात्याने केलेल्या पाहणीत खाण व्यवसायामुळे शिरगाव येथील शेतजमिनींचे सुमारे ४ कोटी रुपयांना नुकसान झाल्याचे आढळून आले होते. त्यानुसार न्यायालयाने या तिन्ही खाण कंपन्यांना ४ कोटी रुपये जिल्हा खनिज निधीत जमा करावेत निर्देश दिले होते. या रकमेचा वापर हा शेतजमिनी मूळ स्थितीत आणणे हा होता. त्यानुसार या खाण कंपन्यांनी आतापर्यंत केवळ २ कोटी रुपयेच जमा केले आहेत. शेतजमिनी मूळ स्थितीत आणण्यासाठी उर्वरित २ कोटी रुपये हे जिल्हा खनिज निधीमधीलच वापरले गेले. हे वापरलेले २ कोटी रुपये पुन्हा खाण कंपन्या या निधीत जमा करतील, असे ठरले होते. परंतु त्यांनी रक्कम जमाच केली नव्हती.

जबाबदारी टाळता येणार नाही

जिल्हा खनिज निधीत आपण यापूर्वीच योगदान दिले आहे. त्यामुळे पुन्हा रक्कम जमा करू शकत नाही. जी रक्कम जमा केली, त्याचा वापर खाणकामामुळे होणाऱ्या पर्यावरणीय नुकसानाची भरपाईसाठी केला जावा, असा युक्तिवाद कंपन्यांच्यावतीने केला गेला. मात्र, न्यायालयाने त्यास असहमती दर्शविली. खाणींमुळे जे नुकसान झाले, त्याची कंपन्यांनी स्वतः नुकसानभरपाई द्यावी लागेल. सरकार किंवा करदात्यांचे ते काम नाही. कंपन्या आपली जबाबदारी टाळू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सेसा मायनिंग कंपनी, राजाराम बांदेकर आणि चौगुले कंपनी या कंपन्यांना ही दोन कोटी रुपयांची रक्कम भरावी लागणार आहे.

 

टॅग्स :goaगोवाHigh Courtउच्च न्यायालय