शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

महिलांचे खच्चीकरण नको; जाहीर झालेले पुरस्कार अन् वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 11:08 IST

राज्य सांस्कृतिक पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. एकूण बारा पुरस्कार जाहीर करताना त्यात एकादेखील महिलेचा समावेश करण्यात आलेला नाही, हा वादाचा मुद्दा बनला आहे.

राज्य सांस्कृतिक पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. एकूण बारा पुरस्कार जाहीर करताना त्यात एकादेखील महिलेचा समावेश करण्यात आलेला नाही, हा वादाचा मुद्दा बनला आहे. गोव्यातील काही जागृत महिलांनी याविरुद्ध आवाज उठविणे सुरू केले आहे, कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी खरे म्हणजे महिलावर्गाला समाधानकारक उत्तर द्यायला हवे होते. यावर्षी जमले नाही किंवा योग्य उमेदवार मिळाले नाहीत; पण पुढील वर्षी आम्ही महिलांनाही पुरस्कार देऊ, असे जाहीर करायला हवे होते. त्याऐवजी गावडे यांनी जो युक्तिवाद केला तो मान्य करण्यासारखा नाही.

बारा राज्य पुरस्कार देताना एकही पात्र महिला या पुरस्कारासाठी न मिळणे हे कला संस्कृती खात्याचे अपयश आहे. गोव्यात विविध क्षेत्रांत नाव कमावलेल्या शेकडो महिला आहेत. ज्यांनी पुरस्कारासाठी अर्ज केले होते, त्यांची नावे जाहीर करावीत, अशी मागणी परवाच ज्योती कुंकळ्ळ्येकर, सुचिता नार्वेकर व इतरांनी केली. सरकारला धाडस असेल तर नावे जाहीर करावीच. कला संस्कृती खात्याने अन्य दोन गटांमध्ये काही महिलांना पुरस्कार घोषित केले आहेत. त्या पुरस्कारप्राप्त महिलांचे अभिनंदन; मात्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार गटात मुद्दाम काही महिलांना डावलले गेले की काय, अशी शंका अनेकांच्या मनात येते. 

याबाबत थेट मंत्री गावडे यांना दोष देता येणार नाही. खात्याने नेमलेल्या निवड समितीने राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचा विषय गंभीरपणे घेतलाच नसावा किंवा आपण पुरस्कार दिला नाही तरी कुणीच महिला गोव्यात आवाज उठवणार नाही, असे कदाचित संबंधितांना वाटले असावे. साहित्य, संस्कृती, कलेच्या क्षेत्रात चमकणाऱ्या महिला निवड समितीला दिसल्या नाहीत काय? नाट्यकलेसह साहित्य, सिनेमा, संस्कृती, लोककला संवर्धनाच्या क्षेत्रात केपेपासून सत्तरीपर्यंतच्या अनेक महिला वावरत आहेत. त्यांचादेखील समावेश बारा उमेदवारांमध्ये करता आला असता. खरे म्हणजे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या विषयात लक्ष घालायला हवे. मुद्दाम महिलांना पुरस्कार घोषित करणे नाकारण्यामागे झारीतील कोणत्या शुक्राचार्याचा हात आहे, याचा शोध मुख्यमंत्र्यांनी घेतला तर बरे होईल. निदान पुढील वर्षीं तरी अशी चूक होऊ नये. 

महिला सबलीकरणाच्या गोष्टी सध्या भाजपचे सगळेच केंद्रीय नेते सांगत असतात. महिलांना सबल करण्याऐवजी दुर्बल करू लागलेत, त्याकडे जरा सरकारने लक्ष द्यावे. गोवा मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही. पूर्वी जेनिफर मोन्सेरात होत्या. त्यांना यावेळी बाजूला काढून त्यांच्या पतीराजांना मंत्री केले गेले. गोव्यात बहुतांश राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षही महिलांना सहसा अध्यक्षपद देत नाहीत. भाजपने तर अजून गोव्यात एकदाही महिलेला प्रदेशाध्यक्षपद दिलेले नाही. गोवा फॉरवर्डने प्रारंभी महिलेकडे अध्यक्षपद सोपविले होते; पण लगेच विजय सरदेसाई यांना ते पद देखील आपणच घ्यावे, अशी इच्छा निर्माण झाली. पुरुषी अहंकार जागा झाला. शशिकला काकोडकर यांच्यानंतर मगो पक्षात कुणीही महिला अध्यक्ष झाल्या नाहीत. पहिल्या व आतापर्यंतच्या शेवटच्या महिला मुख्यमंत्री शशिकलाताईच ठरल्या आहेत. नावापुरते महिलांना सरपंचपदी किंवा नगराध्यक्षपदी बसविले जाते, हे आपण पाहतोच आहोत. 

गोव्यात काँग्रेसनेच महिलांना यापूर्वी काही काळ प्रदेशाध्यक्षपद दिले होते, हे येथे नमूद करावे लागेल. मोपा येथील विमानतळावर काम करणारी दिशा नाईक ही भारतातील पहिली कॅश फायर फायटर बनली आहे. गोव्यातील महिलांचा विविध स्तरांवर गौरव होत आहे. कधीतरी कला व संस्कृती खात्याला वर्तमान व इतिहास समजून घ्यावा लागेल. पोर्तुगीज काळापासून आतापर्यंत अनेक गोमंतकीय महिलांनी संस्कृती साहित्य क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचे ताजमहाल बांधलेले आहेत. महिलांना पुरस्कारांबाबत आरक्षण नाही व नसावेच. पुरस्कार म्हणजे पंचायत निवडणूक नव्हे, हा गोविंद गावडे यांचा मुद्दा मान्य आहे; पण संबंधित निवड समितीच्या डोळ्यांना जर पुरस्कारासाठी एकही महिला दिसली नसेल तर समितीचे डोळे तपासून घेण्याची वेळ आली आहे. पुरस्कारासाठी हजारो अर्ज आले होते, असे मंत्री सांगतात. मग हजारो अर्जामध्ये दोन-तीन महिलादेखील पुरस्कारासाठी गुणवत्तेच्या निकषावर जर उतरल्या नसतील, तर ते गोवा सरकारसाठीही भूषणावह नाही.

 

टॅग्स :goaगोवा