शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

गोव्याच्या राज्यपालांकडून ‘चला हवा येऊ द्या’ टीमचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 14:13 IST

‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी शोची लोकप्रियता संपूर्ण देशात पसरली आहे. भाऊ कदम, कुशल बंद्रीके, भारत गणेशपुरे आणि सागर करंडे, श्रेया बुगडे ही नावे आता महाराष्ट्रासह इतर राज्यांतही प्रत्येक घराघरांत पोहोचली आहेत.

सचिन कोरडे

पणजी -  ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी शोची लोकप्रियता संपूर्ण देशात पसरली आहे. भाऊ कदम, कुशल बंद्रीके, भारत गणेशपुरे आणि सागर करंडे, श्रेया बुगडे ही नावे आता महाराष्ट्रासह इतर राज्यांतही प्रत्येक घराघरांत पोहोचली आहेत. जबरदस्त विनोदी शैलीच्या जोरावर या चौघांनी बुधवारी(30 जानेवारी) गोमंतकीयांनाही पोठ धरुन हसवले. यास गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा या सुद्धा अपवाद ठरलेल्या नाहीत. सिन्हा या देखील कलाकारांच्या प्रत्येक ‘पंच’वर हसत होत्या. ‘तुम्हारी हास्यनाटिका देखकर खूप मजा आया...लोगोको हसाना सबसे कठीण बात होती है..आपने वो सहज तरिकेसे कर दिखाया...मेरी आपको शुभकामनाए...अशा शब्दांत सिन्हा यांनी कलाकाराचे कौतुक केले. 

गोव्यात पहिल्यांदाच ‘स्वाभिमान-२०१८’ हा पोलिसांसाठी गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. कला अकादमीच्या दर्या संगमवरील खुल्या जागेत मोठ्या थाटात हा कार्यक्रम झाला. या निमित्त ‘चला हवा येऊ द्या ची टीम’ गोव्यात आली होती. खास राज्यपालांसाठी या टीमने हिंदी भाषेत एक हास्यनाटक सादर केले. उल्लेखनिय म्हणजे, खुल्या रंगमंचावर या टीमकडून हिंदी भाषेतील हा पहिलाच प्रयोग होता. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. सुरुवातीपासून शेवटपर्यंत या कलाकारांनी गोमंतकीयांना हसवले. शिक्षक आणि मस्तीखोर विद्यार्थ्यामधील संवाद यावर हे नाट्य होते. भारत गणेशपुर यांची शिक्षकी भूमिका छाप सोडून गेली.  

दयासंगवरील काही क्षण...

कार्यक्रमाला उशीर झाल्याने भाऊ कदम, भारत गणेशपुरे, सागर कारंडे आणि कुशल बंद्रिके या चौघांनी कला अकादमीच्या मागच्या बाजूला असलेल्या जेटीवर थोडा वेळ घालवला. याच ठिकाणी 'भूतनाथ' या चित्रपटाची शूटिंग झाले होते. आता ही जेटी पाडण्यात आली आहे परंतु, त्याचा काही भाग अजूनही आहे. अत्यंत शांत आणि काळोखात हे चारही जण खुर्च्या टाकून बसले. चा चौघांनी आपल्या गोव्याबद्दलच्या आठवणी एकमेकांना शेअर केल्या. 

व-हाडी भाषेचा प्रयोग यशस्वी : गणेशपुरे

प्रत्येक भाषेचा लहेजा असतो. महाराष्ट्रातच बघा ना.. मराठी भाषा वेगवेगळ्या ‘टोनिंग’मध्ये बोलल्या जाते. पण त्या सर्वच चित्रपटात उतरतात असे नाही. कारण प्रेक्षक ते स्वीकारतील की नाही, याची भीती मनात असते. मराठवाड्याची बोली आता ब-याच चित्रपटातून पुढे येत आहे. पण व-हाडी बोली मर्यादित होती. चला हवा येऊ द्या या शोमध्ये काही तरी वेगळं सादर करण्याच्या नादात मी व-हाडी बोलून जातो. ते प्रेक्षकांना आवडायला लागलं.. हा प्रयोग यशस्वी झाला याचं समाधान आहे. याच बोलीमुळे काही वेगळं अस्तीत्वही निर्माण करु शकलो. व-हाडी भाषेतील ‘नाळ’ आणि आता ‘झुंड’ ज्यात अमिताभ बच्चनाही आहेत असे चित्रपट येत आहेत...हे सर्व प्रेक्षकांनी स्वीकारल्यामुळेच शक्य आहे, असे भारत गणेशपुरे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. 

टॅग्स :Chala Hawa Yeu Dyaचला हवा येऊ द्याgoaगोवाPoliceपोलिस