शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
2
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
3
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
4
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
5
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
6
अचानक बेपत्ता झाली होती बॉलिवूड अभिनेत्री; ११ महिन्यांनी सापडला हाडांचा सांगाडा
7
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
8
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
9
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
10
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
11
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
12
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
13
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
14
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
15
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
16
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
17
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
18
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
19
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
20
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य

खाणप्रश्नी सरकारला गोव्याच्या एजींचा सल्ला सरकारला अमान्य?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 12:41 PM

गोव्यातील अनेक वकिलांनाही यामुळे थोडा आश्चर्याचाच धक्का बसला आहे.

पणजी : गोव्याचे अॅडव्हकेट जनरल (एजी) दत्तप्रसाद लवंदे यांनी गोवा सरकारला खनिज खाण लिजांचा लिलावच पुकारायला हवा आणि सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका सादर करणो योग्य नव्हे, ते निष्फळ ठरेल अशा प्रकारचा सल्ला दिलेला असला तरी, काही लोकांना खूष करण्याच्या नादात सरकारने राजकीय कारणास्तव एजींचा सल्ला मान्य न करण्याची भूमिका घेतल्याचे तूर्त दिसून येत आहे. सरकारमधील तीन मंत्र्यांच्या समितीने तरी सर्वोच्च न्यायालयाच्या गेल्या दि. 7 फेब्रुवारीच्या आदेशाच्या अनुषंगाने न्यायालयात फेरविचार याचिका सादर करण्याचे ठरवले आहे. गोव्यातील अनेक वकिलांनाही यामुळे थोडा आश्चर्याचाच धक्का बसला आहे.देशाचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आत्माराम नाडकर्णी हे 2015 सालापर्यंत गोव्याचे अॅडव्हकेट जनरल होते. आता दत्तप्रसाद लवंदे हे अॅडव्हकेट जनरल आहेत. नाडकर्णी व लवंदे या दोघांचेही सल्ले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सरकार कायम ऐकत आले. त्यांचे सल्ले कधी अमान्य केले गेले नाहीत. खनिज खाणप्रश्नी मात्र नाडकर्णी व लवंदे या दोन्ही तज्ज्ञांचे सल्ले पूर्णपणे स्वीकारण्याच्या मनस्थितीत सध्या गोवा सरकारमधील तीन मंत्र्यांची समिती नाही. मुख्यमंत्री मनोहर पर्कीकर सध्या अमेरिकेत उपचार घेत आहेत. ते तिथे इस्पितळात दाखल झालेले असताना गोव्यात खनिज खाण बंदी गुरुवारपासून लागू झाली आहे. गोव्यातील सगळ्य़ा खनिज खाणी बंद झाल्या आहेत. पाच वर्षात दुस:यांदा 1क्क् टक्के खनिज खाणी बंद होण्याची वेळ गोव्यात आली आहे. यामुळे खाणींवर अवलंबून असलेल्या लोकांचा सरकारवर आणि तीन मंत्र्यांच्या सल्लागार समितीवर दबाव येत आहे. या दबावाच्या पाश्र्वभूमीवरच एजी लवंदे यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून  सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका सादर करण्याच्या विचाराप्रत सरकार आले आहे. खाणपट्टय़ातील जे लोक खाण बंदीमुळे अस्वस्थ झालेले आहेत, त्यांच्यासाठी आपण काही तरी करतो आहोत हे सरकार दाखवू पाहत आहे व त्यासाठीच फेरविचार याचिका सादर करण्याचा निर्णय तीन मंत्र्यांच्या समितीने घेतला आहे असा निष्कर्ष राजकीय विश्लेषक काढत आहेत.गेल्या 7 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने निवाडा दिला व गोव्यातील सर्व 88 खनिज लिजेस रद्द केली. तसेच खनिज लिजांचा लिलाव पुकारण्याची सूचना केली. काही मंत्री अगोदर लिलाव पुकारण्याशी सहमत नव्हते. याविषयी खाण खात्याने अॅडव्हकेट जनरलांचा सल्ला मागितला. एजींनी सल्ला देताना लिजांचा लिलाव पुकारणो हाच एकमेव उपाय ठरेल असे स्पष्टपणो लेखी स्वरुपात सरकारला कळवले. तसेच लिलाव वगळता अन्य कोणता मार्ग जर स्वीकारला गेला तर ते गोवा सरकारविषयी चुकीचा समज निर्माण करणारे ठरेल आणि सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका सादर करण्याची प्रक्रिया देखील निष्फळ ठरेल, असे एजींनी बजावले. मात्र तीन मंत्र्यांच्या समितीने फेरविचार याचिका सादर करण्याचे ठरवले आहे. तशी शिफारस समितीने मुख्यमंत्री र्पीकर यांच्या मंजुरीसाठी पाठवून दिली आहे. लिजांचा लिलाव करण्याचा सल्ला मात्र मंत्र्यांच्या समितीला तत्त्वत: मान्य आहे, असे सुत्रांनी सांगितले.