शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

Goa: दाबोळी विमानतळाच्या अस्तित्वाबाबत जीसीसीआयचे केंद्र सरकारला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 13:39 IST

Goa News: दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळवरील विमानांची उड्डाणे कमी केल्याबद्दल उद्योजकांनी चिंता व्यक्त आहे. गोवा चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्री (जीसीसीआय) ने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विमानतळाच्या अस्तित्वाबाबत पत्र लिहून आपली चिंता व्यक्त केली आहे.

- नारायण गावस पणजी - दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळवरील विमानांची उड्डाणे कमी केल्याबद्दल उद्योजकांनी चिंता व्यक्त आहे. गोवा चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्री (जीसीसीआय) ने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विमानतळाच्या अस्तित्वाबाबत पत्र लिहून आपली चिंता व्यक्त केली आहे.

जीसीसीआयने नमूद केलेल्या निवेदनानुसार दाबोळी विमानतळावरील प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. जी गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत अंदाजे १५ ते २० टक्के कमी आहे.  मोपा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान कंपन्यांनी विमाने स्थलांतरित केल्याने ही घट जाणवली आहे.  त्यामुळे दाबोळी विमानतळावर अवलंबून असलेल्या भागधारक आणि  व्यवसायिकांना याचा फटका बसला आहे. दाबोळीचे बंद विमानतळामुळे दक्षिण गोव्यातील पर्यटन उपक्रमांवर विपरित परिणाम होईल, असे जीसीसीआयने म्हटले आहे.

जीसीसीआयने म्हटले आहे की या बाबतीत आम्ही केंद्र सरकारला कळवले आहे. दाबोळी येथील विमानतळ देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय प्रवाशांना सेवा देतो आणि हा महत्वाचा असा विमानतळ आहे. या विमानतळामुळे राज्याच्या आर्थिक विकासात भर पडली आहे. ही प्रमुख एअरलाइन ऑपरेशन्स बंद केल्याने इतर कंपन्यांची विमान सेवा बंद होतील आणि अखेरीस हा विमानतळ पूर्ण बंद होऊ शकतो अशी भिती जीसीसीअयाने वर्तविली आहे.

जीसीसीआयने पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी संबंधित भागधारकांसोबत बैठक करण्याची विनंती केली आहे. ही बैठक घेऊन त्यांच्या सुचना लक्षात घेण्याची मागणी केली आहे.  या अगाेदर कॉँग्रेस गोवा फॉरवर्ड तसेच इतर राजकीय पक्षांनी याची भिती व्यक्त केली आहे.

टॅग्स :goaगोवाAirportविमानतळ