शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

Goa: दाबोळी विमानतळाच्या अस्तित्वाबाबत जीसीसीआयचे केंद्र सरकारला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 13:39 IST

Goa News: दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळवरील विमानांची उड्डाणे कमी केल्याबद्दल उद्योजकांनी चिंता व्यक्त आहे. गोवा चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्री (जीसीसीआय) ने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विमानतळाच्या अस्तित्वाबाबत पत्र लिहून आपली चिंता व्यक्त केली आहे.

- नारायण गावस पणजी - दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळवरील विमानांची उड्डाणे कमी केल्याबद्दल उद्योजकांनी चिंता व्यक्त आहे. गोवा चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्री (जीसीसीआय) ने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विमानतळाच्या अस्तित्वाबाबत पत्र लिहून आपली चिंता व्यक्त केली आहे.

जीसीसीआयने नमूद केलेल्या निवेदनानुसार दाबोळी विमानतळावरील प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. जी गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत अंदाजे १५ ते २० टक्के कमी आहे.  मोपा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान कंपन्यांनी विमाने स्थलांतरित केल्याने ही घट जाणवली आहे.  त्यामुळे दाबोळी विमानतळावर अवलंबून असलेल्या भागधारक आणि  व्यवसायिकांना याचा फटका बसला आहे. दाबोळीचे बंद विमानतळामुळे दक्षिण गोव्यातील पर्यटन उपक्रमांवर विपरित परिणाम होईल, असे जीसीसीआयने म्हटले आहे.

जीसीसीआयने म्हटले आहे की या बाबतीत आम्ही केंद्र सरकारला कळवले आहे. दाबोळी येथील विमानतळ देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय प्रवाशांना सेवा देतो आणि हा महत्वाचा असा विमानतळ आहे. या विमानतळामुळे राज्याच्या आर्थिक विकासात भर पडली आहे. ही प्रमुख एअरलाइन ऑपरेशन्स बंद केल्याने इतर कंपन्यांची विमान सेवा बंद होतील आणि अखेरीस हा विमानतळ पूर्ण बंद होऊ शकतो अशी भिती जीसीसीअयाने वर्तविली आहे.

जीसीसीआयने पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी संबंधित भागधारकांसोबत बैठक करण्याची विनंती केली आहे. ही बैठक घेऊन त्यांच्या सुचना लक्षात घेण्याची मागणी केली आहे.  या अगाेदर कॉँग्रेस गोवा फॉरवर्ड तसेच इतर राजकीय पक्षांनी याची भिती व्यक्त केली आहे.

टॅग्स :goaगोवाAirportविमानतळ