शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

आजचा अग्रलेख: सिल्वेरा-मनोज वाद निरर्थक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 08:45 IST

गेले काही दिवस सांतआंद्रेचे माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा आणि आरजीचे प्रमुख मनोज परब यांच्यात वाद सुरू आहे.

गेले काही दिवस सांतआंद्रेचे माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा आणि आरजीचे प्रमुख मनोज परब यांच्यात वाद सुरू आहे. एकमेकांवर शाब्दिक हल्ले करतानाच एकमेकांस खोचक सल्लेही दिले जात आहेत. सिल्वेरा यांना आम्ही कामावर ठेवू नोकरी देऊ असे अगोदर मनोज परब यांनी जाहीर केले होते. त्यानंतर सिल्वेरा यांचे काही समर्थक व कार्यकर्ते खवळले. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सिल्वेरा किती मोठे व्यावसायिक आहेत, याची माहिती गोमंतकीयांना दिली. काल सिल्वेरा यांनी स्वत: मीडियाशी बोलताना परब यांनाच आपण नोकरी देतो असे जाहीर केले. दरमहा पन्नास हजार रुपये पगारावर आपल्या घरी, आपल्या कार्यालयात मनोज परब यांनी नोकरीस यावे. अगदी उद्यापासून काम सुरू करावे, आपल्या कुटुंबाकडे दहा-बारा ट्रॉलर्स आहेत, असे सिल्वेरा यांनी जोशात जाहीर केले. सिल्वेश कुटुंब हे पारंपरिक मासेमारी व्यवसायात असून आम्ही चारशे लोकांना रोजगार दिलेला आहे, असे सिल्वेरा यांनी अभिमानाने सांगितले.

वास्तविक सिल्वेरा यांच्यासह भाजपमधील जे पराभूत आमदार आहेत, त्या सर्वांनीच आपल्या पराभवाची कारणमीमांसा जाणून घेण्याची वेळ आली आहे. एकदा पराभूत झालेला उमेदवार पुन्हा जिंकून येतोच असे नाही. अनेक जण राजकीयदृष्ट्या इतिहासजमा होतात. पाच वर्षापूर्वी जे आमदार चकचकीत बूट, ब्रँडेड कपडे, हातात सोन्याचे मास्कोत घालून फिरत होते, ते आता पराभूत होऊन घरी बसले आहेत. मग लोकही त्यांना असे विसरून जातात ते माजी आमदार आहेत अशी नोंददेखील जनतेच्या मनात राहत नाही. एकेकाळी सांगेत (स्व.) प्रभाकर गावकर नावाचे आमदार होऊन गेले. त्याच सांगेत प्रसाद गावकर एकदा जिंकले व दुसऱ्यावेळी पराभूत झाले. शिवोलीत विनोद पालयेकर आमदार झाले, मैत्रीही झाले, मग पुढच्या निवडणुकीत त्यांची अनामत रक्कमही जप्त झाली. गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सिल्वेरा, सांताक्रूझचे टोनी फर्नाडिस, वेळीचे फिलीप नेरी, नुवेचे बाबाशान वगैरे अनेक जण भाजपमध्ये गेले होते. यापैकी बहुतेक जण पराभूत झाले. आता सांताक्रूझमध्ये पुन्हा कधी टोनी आमदार होतील असे म्हणण्यासारखी स्थिती नाही. बाबाशान पुन्हा विधानसभेत पोहोचतील किंवा कुंकळीचे क्लाफास डायस पुन्हा जिंकतीलच असे आजच्या टप्प्यावर म्हणता येत नाही. सांतआंद्रे मतदारसंघातील सध्याची स्थिती पाहता सिल्वेरा यांनादेखील विचार करावा लागेल, काँग्रेसच्या तिकिटावर निवडून यायचे व मग भाजपमध्ये उडी टाकायची आणि पराभूत झाल्यानंतर आपल्या पराभवाची खरी कारणे न शोधता भलतेच काही तरी बोलत राहावे, हे आश्चर्यजनक आहे.

आरजीचे उमेदवार विरेश बोरकर जास्त पैसे खर्च न करताही सांतआंद्रेत जिंकले. ते का जिंकले याची खरी कारणे सिल्वेरा आजदेखील सांगू शकत नाहीत. बोरकर यांनी तिथे काही करिश्मा केला नव्हता. ते प्रस्थापित राजकारणी नव्हते, पण लोकांनाच मतदारसंघात बदल हवा होता. म्हणून ते जिंकले. सांताक्रूझमध्ये मतदारांना टोनी नको झाले, त्यामुळे रुदोल्फ फर्नाडिस जिंकले. जयेश साळगावकर यांना साळगावमध्ये दुसऱ्यांदा लोकांनी स्वीकारले नाही.

मंत्रिपद भूषविलेले अनेक नेतेही पराभूत होतात. अनेक जण वन टाइम आमदार ठरतात. सहा महिन्यांपूर्वी जे आठ आमदार भाजपमध्ये गेले आहेत, त्यापैकीदेखील काही जण पुढील विधानसभा निवडणुकीत गटांगळ्या खातील. निवडणुकीत पैसा कितीही खर्च केला, तरी जिंकता येतेच असे नाही; हा अनुभव अनेक कथित महारथींनीही घेतला आहे. बाबूश मोन्सेरात पणजीत गेल्या निवडणुकीवेळी कमी मतांनी जिंकले. कुडचडेत नीलेश काब्राल यांचीही गेल्या निवडणुकीत प्रचंड दमछाक झाली. नवख्या उमेदवारांनी प्रस्थापितांना गेल्या निवडणुकीत दमविले आहे. सिल्वेरा यांना सांतआंद्रेत नव्याने प्रभाव निर्माण करण्यासाठी कष्ट घ्यावे लागतील. नवे आमदार वीरेश बोरकर हे काहीच विकास करू शकलेले नाहीत, अशी टीका सिल्वेरा करतात. सिल्वेरा यांचा तो दावा खरा असेल तर पुढील निवडणुकीत लोक योग्य तो कौल देतील. मात्र, त्यांनी सध्या चालविलेला शाब्दिक वाद हा त्यांच्या फायद्याचा नाही. अर्थात आरजीनेही अगोदर आपण सिल्वेरा यांना नोकरीस ठेवतो अशी भाषा वापरायलाच नको होती.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण