शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आजचा अग्रलेख: सिल्वेरा-मनोज वाद निरर्थक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 08:45 IST

गेले काही दिवस सांतआंद्रेचे माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा आणि आरजीचे प्रमुख मनोज परब यांच्यात वाद सुरू आहे.

गेले काही दिवस सांतआंद्रेचे माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा आणि आरजीचे प्रमुख मनोज परब यांच्यात वाद सुरू आहे. एकमेकांवर शाब्दिक हल्ले करतानाच एकमेकांस खोचक सल्लेही दिले जात आहेत. सिल्वेरा यांना आम्ही कामावर ठेवू नोकरी देऊ असे अगोदर मनोज परब यांनी जाहीर केले होते. त्यानंतर सिल्वेरा यांचे काही समर्थक व कार्यकर्ते खवळले. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सिल्वेरा किती मोठे व्यावसायिक आहेत, याची माहिती गोमंतकीयांना दिली. काल सिल्वेरा यांनी स्वत: मीडियाशी बोलताना परब यांनाच आपण नोकरी देतो असे जाहीर केले. दरमहा पन्नास हजार रुपये पगारावर आपल्या घरी, आपल्या कार्यालयात मनोज परब यांनी नोकरीस यावे. अगदी उद्यापासून काम सुरू करावे, आपल्या कुटुंबाकडे दहा-बारा ट्रॉलर्स आहेत, असे सिल्वेरा यांनी जोशात जाहीर केले. सिल्वेश कुटुंब हे पारंपरिक मासेमारी व्यवसायात असून आम्ही चारशे लोकांना रोजगार दिलेला आहे, असे सिल्वेरा यांनी अभिमानाने सांगितले.

वास्तविक सिल्वेरा यांच्यासह भाजपमधील जे पराभूत आमदार आहेत, त्या सर्वांनीच आपल्या पराभवाची कारणमीमांसा जाणून घेण्याची वेळ आली आहे. एकदा पराभूत झालेला उमेदवार पुन्हा जिंकून येतोच असे नाही. अनेक जण राजकीयदृष्ट्या इतिहासजमा होतात. पाच वर्षापूर्वी जे आमदार चकचकीत बूट, ब्रँडेड कपडे, हातात सोन्याचे मास्कोत घालून फिरत होते, ते आता पराभूत होऊन घरी बसले आहेत. मग लोकही त्यांना असे विसरून जातात ते माजी आमदार आहेत अशी नोंददेखील जनतेच्या मनात राहत नाही. एकेकाळी सांगेत (स्व.) प्रभाकर गावकर नावाचे आमदार होऊन गेले. त्याच सांगेत प्रसाद गावकर एकदा जिंकले व दुसऱ्यावेळी पराभूत झाले. शिवोलीत विनोद पालयेकर आमदार झाले, मैत्रीही झाले, मग पुढच्या निवडणुकीत त्यांची अनामत रक्कमही जप्त झाली. गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सिल्वेरा, सांताक्रूझचे टोनी फर्नाडिस, वेळीचे फिलीप नेरी, नुवेचे बाबाशान वगैरे अनेक जण भाजपमध्ये गेले होते. यापैकी बहुतेक जण पराभूत झाले. आता सांताक्रूझमध्ये पुन्हा कधी टोनी आमदार होतील असे म्हणण्यासारखी स्थिती नाही. बाबाशान पुन्हा विधानसभेत पोहोचतील किंवा कुंकळीचे क्लाफास डायस पुन्हा जिंकतीलच असे आजच्या टप्प्यावर म्हणता येत नाही. सांतआंद्रे मतदारसंघातील सध्याची स्थिती पाहता सिल्वेरा यांनादेखील विचार करावा लागेल, काँग्रेसच्या तिकिटावर निवडून यायचे व मग भाजपमध्ये उडी टाकायची आणि पराभूत झाल्यानंतर आपल्या पराभवाची खरी कारणे न शोधता भलतेच काही तरी बोलत राहावे, हे आश्चर्यजनक आहे.

आरजीचे उमेदवार विरेश बोरकर जास्त पैसे खर्च न करताही सांतआंद्रेत जिंकले. ते का जिंकले याची खरी कारणे सिल्वेरा आजदेखील सांगू शकत नाहीत. बोरकर यांनी तिथे काही करिश्मा केला नव्हता. ते प्रस्थापित राजकारणी नव्हते, पण लोकांनाच मतदारसंघात बदल हवा होता. म्हणून ते जिंकले. सांताक्रूझमध्ये मतदारांना टोनी नको झाले, त्यामुळे रुदोल्फ फर्नाडिस जिंकले. जयेश साळगावकर यांना साळगावमध्ये दुसऱ्यांदा लोकांनी स्वीकारले नाही.

मंत्रिपद भूषविलेले अनेक नेतेही पराभूत होतात. अनेक जण वन टाइम आमदार ठरतात. सहा महिन्यांपूर्वी जे आठ आमदार भाजपमध्ये गेले आहेत, त्यापैकीदेखील काही जण पुढील विधानसभा निवडणुकीत गटांगळ्या खातील. निवडणुकीत पैसा कितीही खर्च केला, तरी जिंकता येतेच असे नाही; हा अनुभव अनेक कथित महारथींनीही घेतला आहे. बाबूश मोन्सेरात पणजीत गेल्या निवडणुकीवेळी कमी मतांनी जिंकले. कुडचडेत नीलेश काब्राल यांचीही गेल्या निवडणुकीत प्रचंड दमछाक झाली. नवख्या उमेदवारांनी प्रस्थापितांना गेल्या निवडणुकीत दमविले आहे. सिल्वेरा यांना सांतआंद्रेत नव्याने प्रभाव निर्माण करण्यासाठी कष्ट घ्यावे लागतील. नवे आमदार वीरेश बोरकर हे काहीच विकास करू शकलेले नाहीत, अशी टीका सिल्वेरा करतात. सिल्वेरा यांचा तो दावा खरा असेल तर पुढील निवडणुकीत लोक योग्य तो कौल देतील. मात्र, त्यांनी सध्या चालविलेला शाब्दिक वाद हा त्यांच्या फायद्याचा नाही. अर्थात आरजीनेही अगोदर आपण सिल्वेरा यांना नोकरीस ठेवतो अशी भाषा वापरायलाच नको होती.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण