शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

सरकार मुके आणि बहिरेच नाही तर नाकर्ते असल्याचेही आता सिद्ध झाले- विजय सरदेसाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 15:59 IST

दाबोळी विमानतळ उघडण्यासाठी प्रधानमंत्र्यांना निवेदन

मडगाव: विदेशातील गोवेकरांना गोव्यात आणण्यासाठी देशातील 10 राज्यातील विमानतळ उघडे झाले पण त्यात दाबोळी विमानतळाचा समावेश नसल्याबद्दल गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी आश्चर्या व्यक्त केले असून या सरकारच्या शब्दाला दिल्लीत किमंत नाही हे पुन्हा सिद्ध झाले आहे अशी टीका केली आहे.

हे सरकार आतापर्यंत मुके आणि बहिरे असे आम्हाला वाटत होते पण ते नाकर्ते असल्याचेही आता सिद्ध झाले आहे. आम्ही प्रधानमंत्री कार्यालयाच्या संपर्कात आहोत असे रोज सांगणाऱ्या गोवा सरकारला केंद्रात त्यांचेच सरकार असतानाही साधा दाबोळी विमानतळ खलाशाना घेऊन येणाऱ्या चार्टर विमानांना उघडता आला नाही, ही शरमेची बाब असल्याचे ते म्हणाले. आता गोवा फॉरवर्ड पक्ष गोवेकरासाठी दाबोळी विमानतळ खुला करावा यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असलेल्या प्रधानमंत्र्यांना राज्यपाला मार्फत निवेदन पाठवू असे त्यांनी म्हटले आहे.

अमेरिका आणि युरोप या देशासह जगभर अडकून पडलेल्या भारतीयांना पुन्हा देशात आणण्यासाठी भारतातून 64 विमाने  7 मे पासून पाठविली जाणार असे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. ही 64 विमाने भारतातील 10 राज्यातून वाहतूक करणार आहेत. गोव्यातील हजारो नागरिक आणि खलाशी देशाबाहेर अडकलेले असतानाही गोव्याचा या 10 राज्यांमध्ये समावेश नाही.

देशाबाहेर अडकलेले हे हजारो गोमंतकीय आणि खलाशी मागचे दोन महिने गोवा व केंद्र सरकारकडे वारंवार  आपल्याला या अवस्थेतून सोडवावे अशी मागणी करत आहेत. या खलाशी आणि इतरांच्या कुटुंबियांच्या वतीने गोवन सिफेरर अससोसिएशन ऑफ इंडिया, इतर संघटना, राजकारणी आणि गोवा फॉरवर्डसह अनेक राजकीय पक्षांनी सरकारला असंख्य निवेदनेही दिली. मात्र  याबाबतीत ज्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे होता ते गोवा सरकार  कित्येक आठवडे मुके आणि बहिऱ्या प्रमाणेच वागले असं  विजय सरदेसाई यांनी सांगितले.

खलाशांच्या कुटुंबियांकडून आणि लोकांकडून रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिल्यानंतर आलेल्या दबावाखाली  राज्य सरकारने केवळ मुबंईत पोहोचलेल्या मारेला जहाजावरील खलाशाना खाली उतरविण्याचे केवळ सोपस्कार केले. पण तसे करतानाही क्वारान्टीन सुविधा , त्याचे शुल्क आदींबाबत निर्णय घ्यायला सरकारला तब्बल एक आठवडा लागला. 

कर्णिका आणि आंगरिया या जहाजावरील खलाशाबाबत न बोललेलेच बरे, कारण या जहाजावर असलेले युक्रेन आणि अन्य देशाचे खलाशी गोव्यातून आपल्या राज्यात पोहोचलेले असताना खलाशांच्या कंपन्याना जास्तीत जास्त लुटू पाहणारे एजंट आणि गोव्यातील सरकारी नोकरशाही यांची टेबलखालील डिल्स अजून पूर्ण न झाल्याने ते अडकून पडले असून ते गोव्यात पोहोचत नाहीत अशी टीका त्यांनी केली.

एवढे दिवस गोवेकरांना मात्र हा केंद्राच्या अखत्यारीत असलेला प्रश्न असून आम्ही प्रधानमंत्र्यांच्या कार्यालयाच्या संपर्कात आहोत अशा सुक्या घोषणा आणि आस्वासने ऐकून घ्यावी लागत होती. जर सरकार आणि त्यांचे तथाकथित प्रवक्ते रोज दिल्लीशी संपर्क साधूनही त्यांचे जर कुणी ऐकत नाही तर हे सरकार नाकर्ते  असल्याचेच आता सिद्ध झाले आहे. यावरून एकतर हे सरकार नाकर्ते आहे किंव्हा त्यांना देशाबाहेर अडकलेल्या गोवेकारांचे काहीच पडून गेलेले नाही हेच सिद्ध होते. मात्र काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेले विशेषतः सासष्टीतील आमदार येथे लोकांना केवळ पोकळ आश्वासने देत आहेत अशी टीका सरदेसाई यांनी केली आहे.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत