शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

Goa Election Results 2022: गोव्यात मोठी राजकीय हालचाल, भाजपात अंतर्गत वाद?; विश्वजीत राणेंनी घेतली राज्यपालांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 08:28 IST

यंदाची गोवा निवडणूक अनेक दृष्टीनं महत्त्वाची ठरली. मनोहर पर्रिकर यांच्यविना भाजपा निवडणुकीच्या मैदानात उतरली.

पणजी – देशात ५ राज्यांच्या निवडणुकीचे निकाल आल्यानंतर आता सत्तास्थापनेचे वेध लागले आहेत. ५ पैकी ४ राज्यात भारतीय जनता पार्टीचं(BJP) सरकार येणार असून पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने बाजी मारली आहे. यंदाच्या निवडणुकीत गोव्यात भाजपानं सर्वाधिक जागा जिंकल्या. बहुमतासाठी भाजपाला केवळ एका जागेची गरज आहे. भाजपानं गोव्यात ४० पैकी २० जागा पटकावल्या आहेत. त्यानंतर एमजीपी आणि काही अपक्षांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपा सरकार बनण्यात काहीही अडचण नाही.

गोवा राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी विधानसभा भंग केली आहे. गोव्यात प्रमोद सावंतच(Pramod Sawant) मुख्यमंत्री राहणार की, हायकमांड धक्का देणार हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. त्यातच विश्वजीत राणे(Vishwajeet Rane) यांनी अचानक राज्यपालांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. १५ मार्च रोजी गोवा सरकारचा कार्यकाळ संपणार आहे. भाजपाकडून राज्यपालांना विधानसभा भंग करण्याची मागणी करण्यात आली होती. शनिवारी राज्यपालांनी यावर महत्त्वाचा निर्णय घेत नवीन सरकार बनवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.(Goa Assembly Election 2022)

यंदाची गोवा निवडणूक अनेक दृष्टीनं महत्त्वाची ठरली. मनोहर पर्रिकर यांच्यविना भाजपा निवडणुकीच्या मैदानात उतरली. पर्रिकर यांचे चिरंजीव अपक्ष निवडणुकीत उभे राहिले. ममता बॅनर्जी यांची टीएमसी पार्टीही निवडणुकीत उतरली होती. आपची सक्रियता वाढली होती. परंतु आता निकालात भाजपा तिसऱ्यांदा सरकार बनवण्याच्या जवळ पोहचली आणि काँग्रेस सत्तेपासून दुरावली. त्यामुळे गोव्यात प्रमोद सावंत पुन्हा मुख्यमंत्री बनवणार की भाजपा अन्य नेत्याला ही जबाबदारी सोपवणार हा प्रश्न आहे.

प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वात निवडणुका लढवल्या गेल्या त्यामुळे तेच मुख्यमंत्री होतील असं बोललं जात आहे. परंतु पक्षाच्या नेतृत्वानं अद्याप कुठलेही संकेत दिले नाहीत. मात्र त्याआधीच विश्वजीत राणे अचानक राज्यपालांच्या भेटीला पोहचले. राज्यपालांना कुणीही भेटू शकतं असं ते म्हणाले असले तरी राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू झाली. विश्वजीत राणे हे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तर नाही ना? असं विचारलं जात आहे. भाजपात अंतर्गत कलह असल्याचेही संकेत मिळत आहेत. कारण सरकार बनवण्यासाठी एमजीपीनं दिलेलं समर्थन काहींना आवडलं नाही. एमजीपीनं गोवा निवडणुकीत टीएमसीच्या ममता बॅनर्जींसोबत आघाडी केली होती. त्यामुळे पक्षातील काही नेते नाराज आहेत. परंतु हायकमांडच्या निर्णयापुढे कुणीही काही बोलण्यास तयार नाही.  

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा