शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Goa Election 2022: दिगंबर कामतांनी खाण घोटाळा केलाय, राहुल गांधींनी आधी माहिती घ्यावी; प्रमोद सावंतांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 15:16 IST

Goa Election 2022: आदित्य ठाकरे यांच्या आरोपावर बोलताना, शिवसेनेचे गोव्यात अस्तित्वच नसल्याचे प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

पणजी : काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांना खाण विषयाची काहीच माहिती नाही. त्यामुळे त्यांनी या विषयावर बोलण्यापूर्वी त्याची माहिती दिगंबर कामत यांच्याकडून घ्यावी. कारण त्यांनीच हा घोटाळा केला असून ते सविस्तर माहिती देऊ शकतील, असा टोला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हाणला.

पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, राहूल गांधी गोव्यात येवून खाणींविषयी काहीही बोलतात. त्यांना या विषयाचे ज्ञान नसल्यामुळे तसे होते. भाजप सरकारने खाणी सुरू करण्याच्या दिशेने प्रक्रिया सुरू केली असल्याचे ते म्हणाले.

शिवसेनेच्या गोव्यात निवडणूक लढविण्याच्या निर्णयासंबंधी आणि आदित्य ठाकरे यांनी भाजपवर केलेल्या आरोपांविषयी विचारले असता, मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे गोव्यात अस्तित्वच नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, मतदान यंत्रावर नोटासाठी एक पर्याय असतो. नोटाला जितकी मते मिळणार त्यापेक्षाही कमी मते शिवसेनेला मिळणार, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना भाजपचे अध्यक्ष सदानंद शेट तनावडे यांनी निवडणूक काळात प्रसारमाध्यमांनी दिलेल्या प्रसिद्धीबद्दल धन्यवाद दिले. तसेच काँग्रेसच्या अपप्रचाराला लोक बळी पडणार नाहीत, असेही सांगितले. या निवडणुकीत भाजप विरुद्ध सर्व विरोधक एकत्र झाले होते यावरूनच भाजपची शक्ती वाढल्याचे स्पष्टहोत असल्याचे ते म्हणाले. निवडणुकीत भाजपला पूरण बहुमत मिळणार असल्याचा दावाही त्यांनी केला. 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Pramod Sawantप्रमोद सावंतRahul Gandhiराहुल गांधीPoliticsराजकारण