शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

Goa Election 2022: राष्ट्रवादी काँग्रेसची पाटी कोरीच; लक्षवेधक कामगिरी नाहीच, नावापुरतेच उरले कार्यकर्ते

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 09:29 IST

Goa Election 2022: गोव्यात येणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांनीही फारसे काही केलेले नाही, असे सांगितले जात आहे.

प्रसाद म्हांबरे, लोकमत न्यूज नेटवर्क

म्हापसा : थिवी मतदार संघातून २००७ साली राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर निवडून येऊन नंतर मंत्री झालेले विद्यमान आमदार नीळकंठ हळर्णकर यांचा हा एकमेव अपवाद वगळता तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेसला लक्षवेधक कामगिरी करून दाखवता आली नाही. गेल्या दोन निवडणुकीत तर पक्षाकडून रिंगणात उतरवलेल्या उमेदवारांना निराशजनक कामगिरीबरोबर अनामत रक्कम जप्त होण्यास सामोरे जावे लागले आहे. आता तर बार्देशात पक्षाची पाटी कोरीच राहिली. 

२००७ सालच्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादी तसेच काँग्रेस पक्षाच्या झालेल्या युतीच्या जोरावर राज्यातून राष्ट्रवादीचे तीन उमेदवार विधानसभेवर निवडून आले होते. त्यात थिवी मतदार संघातून तत्कालीन आमदार नीळकंठ हळर्णकर यांचा समावेश होता. त्यावेळी त्यांनी प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार सदानंद तानावडे यांचा अटीतटीच्या लढतीत सुमारे ३५० मतांनी पराभव केला होता. राष्ट्रवादीचे हे एकमात्र यश वगळता त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांच्या पदरी अपयशच पडले आहे. 

नीळकंठ हळर्णकरांच्या या विजयानंतर २०१२ च्या निवडणुकीत त्यांना थिवीतून भाजप उमेदवार किरण कांदोळकरांकडून पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे साळगाव, म्हापसा तसेच पर्वरी या इतर तीन मतदार संघातून उमेदवार उतरवले होते; पण मतदारांवर ते आपला प्रभाव टाकू शकले नाहीत. त्यामुळे त्या निवडणुकीपासूनच ताकद कमी झाली. 

पुन्हा २०१७ च्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादीकडून उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले. यात शिवोली, थिवी, म्हापसा तसेच हळदोणा या मतदारसंघांचा त्यात समावेश होता. मात्र पक्षाच्या उमेदवारांचा उल्लेख करावा, अशी कामगिरी करुन दाखवता आली नाही. अवघी काही मते त्यांच्या पदरात पडल्याने उमेदवारांची निराशजनक कामगिरी दिसून आली. कळंगुट मतदारसंघातून तर या पक्षाला रिंगणात उतरवण्यासाठी अद्यापपर्यंत उमेदवार सापडू शकला नाही. 

गट स्तरावर अस्तित्व शून्य 

राष्ट्रवादीच्या अपयशाला विविध कारणे असली तरी त्यातील प्रमुख कारण म्हणजे गट स्तरावरील पक्षाची कामगिरी. काही मतदार संघातून पक्षाच्या समित्यासुद्धा अस्तित्वात असल्याचे दिसून येत नाही. जे कार्यकर्ते आहेत त्यांचे नावापुरते कार्य आहे.

हळर्णकर भाजपमध्ये 

२००७ साली राष्ट्रवादीचे आमदार म्हणून निवडून आलेल्या नीळकंठ हळर्णकर यांनी पुन्हा २०१२ ची निवडणूक राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर लढवली. त्यानंतर २०१७ ची निवडणूक त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर लढवली. तर आता ते भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढवत आहेत. पक्षाने आपल्याकडील नेते, कार्यकर्ते टिकावेत यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत, असेच दिसते.

इतरांनी उमेदवारी नाकारली की...

इतर पक्षाकडून उमेदवारी नाकारलेल्या उमेदवारांनी पर्याय म्हणून शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेऊन निवडणूक लढवली. त्याचेही परिणाम पक्षावर झाले.  अशाने तालुक्यात कोठेही कार्यकर्त्यांची नवी फळी तयार होऊ शकली नाही. कार्यकर्ते नसल्याने बूथ स्तरावर काम करण्याचा प्रश्नच येत नाही. उत्तर गोवा जिल्ह्यात पक्षाचे अस्तित्व नगण्य राहिले आहे. निवडणुकीच्या काळात राज्यात येणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांनीही फारसे काही केलेले नाही. 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२NCPराष्ट्रवादी काँग्रेस