शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

Goa Election 2022: राष्ट्रवादी काँग्रेसची पाटी कोरीच; लक्षवेधक कामगिरी नाहीच, नावापुरतेच उरले कार्यकर्ते

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 09:29 IST

Goa Election 2022: गोव्यात येणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांनीही फारसे काही केलेले नाही, असे सांगितले जात आहे.

प्रसाद म्हांबरे, लोकमत न्यूज नेटवर्क

म्हापसा : थिवी मतदार संघातून २००७ साली राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर निवडून येऊन नंतर मंत्री झालेले विद्यमान आमदार नीळकंठ हळर्णकर यांचा हा एकमेव अपवाद वगळता तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेसला लक्षवेधक कामगिरी करून दाखवता आली नाही. गेल्या दोन निवडणुकीत तर पक्षाकडून रिंगणात उतरवलेल्या उमेदवारांना निराशजनक कामगिरीबरोबर अनामत रक्कम जप्त होण्यास सामोरे जावे लागले आहे. आता तर बार्देशात पक्षाची पाटी कोरीच राहिली. 

२००७ सालच्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादी तसेच काँग्रेस पक्षाच्या झालेल्या युतीच्या जोरावर राज्यातून राष्ट्रवादीचे तीन उमेदवार विधानसभेवर निवडून आले होते. त्यात थिवी मतदार संघातून तत्कालीन आमदार नीळकंठ हळर्णकर यांचा समावेश होता. त्यावेळी त्यांनी प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार सदानंद तानावडे यांचा अटीतटीच्या लढतीत सुमारे ३५० मतांनी पराभव केला होता. राष्ट्रवादीचे हे एकमात्र यश वगळता त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांच्या पदरी अपयशच पडले आहे. 

नीळकंठ हळर्णकरांच्या या विजयानंतर २०१२ च्या निवडणुकीत त्यांना थिवीतून भाजप उमेदवार किरण कांदोळकरांकडून पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे साळगाव, म्हापसा तसेच पर्वरी या इतर तीन मतदार संघातून उमेदवार उतरवले होते; पण मतदारांवर ते आपला प्रभाव टाकू शकले नाहीत. त्यामुळे त्या निवडणुकीपासूनच ताकद कमी झाली. 

पुन्हा २०१७ च्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादीकडून उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले. यात शिवोली, थिवी, म्हापसा तसेच हळदोणा या मतदारसंघांचा त्यात समावेश होता. मात्र पक्षाच्या उमेदवारांचा उल्लेख करावा, अशी कामगिरी करुन दाखवता आली नाही. अवघी काही मते त्यांच्या पदरात पडल्याने उमेदवारांची निराशजनक कामगिरी दिसून आली. कळंगुट मतदारसंघातून तर या पक्षाला रिंगणात उतरवण्यासाठी अद्यापपर्यंत उमेदवार सापडू शकला नाही. 

गट स्तरावर अस्तित्व शून्य 

राष्ट्रवादीच्या अपयशाला विविध कारणे असली तरी त्यातील प्रमुख कारण म्हणजे गट स्तरावरील पक्षाची कामगिरी. काही मतदार संघातून पक्षाच्या समित्यासुद्धा अस्तित्वात असल्याचे दिसून येत नाही. जे कार्यकर्ते आहेत त्यांचे नावापुरते कार्य आहे.

हळर्णकर भाजपमध्ये 

२००७ साली राष्ट्रवादीचे आमदार म्हणून निवडून आलेल्या नीळकंठ हळर्णकर यांनी पुन्हा २०१२ ची निवडणूक राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर लढवली. त्यानंतर २०१७ ची निवडणूक त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर लढवली. तर आता ते भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढवत आहेत. पक्षाने आपल्याकडील नेते, कार्यकर्ते टिकावेत यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत, असेच दिसते.

इतरांनी उमेदवारी नाकारली की...

इतर पक्षाकडून उमेदवारी नाकारलेल्या उमेदवारांनी पर्याय म्हणून शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेऊन निवडणूक लढवली. त्याचेही परिणाम पक्षावर झाले.  अशाने तालुक्यात कोठेही कार्यकर्त्यांची नवी फळी तयार होऊ शकली नाही. कार्यकर्ते नसल्याने बूथ स्तरावर काम करण्याचा प्रश्नच येत नाही. उत्तर गोवा जिल्ह्यात पक्षाचे अस्तित्व नगण्य राहिले आहे. निवडणुकीच्या काळात राज्यात येणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांनीही फारसे काही केलेले नाही. 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२NCPराष्ट्रवादी काँग्रेस