शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

Goa Election 2022: “तृणमूलने आमचे नेते पळविले, हे योग्य नव्हे”; काँग्रसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 09:55 IST

Goa Election 2022: काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष असून, भाजपला घरी पाठविण्याची गरज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

पणजी :काँग्रेसने पर्येंत याआधीच प्रतापसिंह राणे यांना उमेदवारी घोषित केली आहे. ते निवडणूक लढवणार नसतील तर त्यांनी पर्यायी उमेदवार द्यावा, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम् यांनी केले आहे. पत्रकार परिषदेत चिदंबरम् एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की, ‘पर्येतील उमेदवार एक- दोन दिवसात स्पष्ट होईल.’

काँग्रेसने ज्येष्ठ राणे यांना उमेदवारी जाहीर केली असली तरी ते निवडणूक लढवणार आहेत की नाही, हे अजून स्पष्ट झालेले नाही. भाजपने पर्येंत त्यांची सून दिव्या राणे यांना तिकीट दिले आहे. काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतरच मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यासंदर्भात चर्चा होईल. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निवडणुकीआधी जाहीर करावा की निकालानंतर निवड करावी, हे ठरणार आहे. याबाबतीत काँग्रेस योग्य तोच निर्णय घेईल, असे ते म्हणाले.

काॅंग्रेसच्या उमेदवारांनी शनिवारी पक्ष सोडणार नाही, अशी जी शपथ घेतली त्याबद्दल विचारले असता चिदंबरम् म्हणाले की, ‘याआधीचा पक्षांतराचा इतिहास पाहता उमेदवारांकडून शपथ घेणे गरजेचे होते. लोकांनी काँग्रेसवर विश्वास ठेवावा. आम्हाला राज्यात सरकार स्थापन करता यावे, म्हणून सर्व उमेदवारांकडून आम्ही शपथ घेतली.’

दरम्यान, ऑल इंडिया रिपब्लिकन पक्षाने येत्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला आहे. पत्रकार परिषदेत यासंबंधीची घोषणा करण्यात आली. यावेळी चिदंबरम्, गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, ऑल इंडिया रिपब्लिकन पक्षाचे  प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर वारखंडकर उपस्थित होते.

‘भाजपचा पराभव करण्यासाठी आम्ही काँग्रेसला पाठिंबा देत आहोत. काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे आणि या पक्षाने नेहमीच गोव्यातील लोकांसाठी काम केले आहे. भाजपच्या राजवटीत जनता त्रस्त आहे. त्यामुळे भाजपला घरी पाठविण्याची गरज आहे. राज्यात बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्यात आले पाहिजे, यासाठी काँग्रेसकडे मागणी केली असल्याचे  वारखंडकर म्हणाले. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले की, ‘या पक्षाचे  मांद्रे, पेडणे, थिवी आणि हळदोण मतदारसंघात सक्रिय सदस्य आहेत. जे काँग्रेसला  जिंकण्यास मदत करतील.’ तृणमूलने आमचे नेते पळविले

तृणमूलकडून येत्या निवडणुकीसाठी युतीचा प्रस्ताव होता. परंतु, एकीकडे पक्षाने हा प्रस्ताव दिल्यानंतर दुसरीकडे कुडतरी, वास्को, मुरगावमध्ये तृणमूलने काँग्रेसचे नेते पळवले. हे योग्य नव्हे, असे चिदंबरम् एका प्रश्नावर म्हणाले.

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२P. Chidambaramपी. चिदंबरमcongressकाँग्रेस