शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

Goa Election 2022: “ही माझी शेवटची निवडणूक, ती तृणमूल काँग्रेसकडूनच लढवणार”; ‘या’ नेत्याची मतदारांना भावूक साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 09:20 IST

Goa Election 2022: गेल्या तीन दशकांत मी बरेच राजकीय पक्ष बदलले. ते स्वार्थासाठी नसून जनतेच्या सेवेसाठी बदलणे भाग पडले.

मडगाव : गेल्या तीन दशकांपासून मी राज्याच्या राजकारणात सक्रिय आहे. या राजकीय कारकिर्दीच्या काळात खूप जनसेवा  केली  आहे. सध्या मी वयाची ७२ वर्षे ओलांडली असून, आता खरोखरच राजकारणातून निवृत्ती घेण्याची वेळ  आली आहे. २०२२ची विधानसभा निवडणूक लढविणे ही शेवटची  इच्छा आहे, असे बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी येथे पत्रकार  परिषदेत केले.

राजकारणात मी कधीच स्वार्थ बघितलेला नाही. कुटुंबीयासाठी राजकारण केलेले नाही. जनसेवेसाठी राजकारण केले आहे. मी बरेच राजकीय पक्ष बदलले. ते स्वार्थासाठी नसून जनतेच्या सेवेसाठी बदलणे भाग पडले. देशात भाजपच्या सरकारला कोणीही अडथळा नाही. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता दीदी त्यांना योग्य धडा शिकवू शकतात. तृणमूल काँग्रेसने जनतेच्या कल्याणासाठी विविध योजना अंमलात आणल्या आहेत. त्या योजनांतून राज्यातील लोकांना लाभ मिळणार आहे. त्यासाठी मी तृणमूल काँग्रेसमधून शेवटची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. 

त्यांचे कुटुंबाचे राजकारण नाही का?

देशात काँग्रेसच्या सोनिया गांधी, राहुल गांधी, मुंबईत उद्धव ठाकरे, दक्षिणेत करुणानिधी या सर्वांनी आपल्या कुटुंबीयांना राजकारणात उतरविले आहेत. राज्यात प्रतापसिंग राणे, विश्वजित राणे, बाबूश मोन्सेरात, जेनिफर मोन्सेरात, मायकल लोबो, डिलायला लोबो,  बाबू कवळेकर, सावित्री कवळेकर हे सर्वजण कौटुंबिक राजकारण  करीत आहेत. मग आमचे कुटुंबीय राजकारणात उतरले, तर त्यांच्यावर कौटुंबिक राजकारणाचा लोक ठपका का ठेवतात? इतर राजकारण्यांवर असा ठपका का ठेवला जात नाही? असा सवाल आलेमाव यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Trinamool Congressतृणमूल काँग्रेस