शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्या पकडले अन्...
3
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
4
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
5
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
6
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
7
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
8
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
9
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
10
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
11
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
12
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
Daily Top 2Weekly Top 5

Goa: रेल्वे फाटकामुळे रुग्णवाहिकेला वेळेत पोहचण्यात अडचण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 13:38 IST

Goa News: कुंभारजुवा मतदार संघातील गवंडाळी रेल्वे फाटकाला उड्डाण पूल नसल्याने या ठिकाणी माेठ्या प्रमाणात रुग्णवाहिका तसेच कामगारांना वेळेत पाेहचण्यात अडचण येत आहे.

- नारायण गावस पणजी - कुंभारजुवा मतदार संघातील गवंडाळी रेल्वे फाटकाला उड्डाण पूल नसल्याने या ठिकाणी माेठ्या प्रमाणात रुग्णवाहिका तसेच कामगारांना वेळेत पाेहचण्यात अडचण येत आहे. गेली अनेक वर्षे झाली आहे ओल्ड गोवा गवंडाळी ते मार्शेल मार्ग पूर्ण झाला आहे. त्यामुळे साखळी वाळपईची वाहने आता बाणास्तरी मार्गे न जाता या मार्गाने जात आहेत. पण प्रत्येक तासात रेल्वे फाटक पडत असल्याने लाेकांचा वेळ वाया जात आहे. या ठिकाणी उड्डाण पुल बांधण्याची मागणी अनेक वर्षापासून हाेत आहे.

या मतदार संघाचे आमदार राजेश फळदेसाई यांनी या अगोदर सांगितले आहे की या ठिकाणी उड्डाण पुल बांधण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पायाभरणी फेब्रुवारीत केली जाणार होती पण आता आचार संहीतेमुळे कादाचित हे पुढे ढकलण्यात आले असावे. त्यामुळे लाेकांना याचा त्रास हाेत असतो. रेल्वे फाटक पडल्यावर किमान १५ ते २० मिनीट वाहनचालकांचा वेळ वाया जात असतो. याचा जास्तीत जास्त फटका हा रुग्णवाहिकेला तसेच कार्यालयात जाणाऱ्या कामगारांना तसेच विद्यार्थ्यांना बसत आहे.

या ठिकाणी उड्डाण पूल झाल्यावर लोकांचा वेळही वाचणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतही पूर्वी या मार्गाने येत हाेते. पण आता रेल्वे फाटक पडून वेळ वाया जात असल्याने साखळी बाणास्तारी मार्गाने पणजीला जातात. मुख्यमंत्र्यांनीही या पुलाचा आढावा घेतला आहे.

टॅग्स :goaगोवाTrafficवाहतूक कोंडी