शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

फॉर्मेलीनयुक्त मासळीच्या प्रश्नावर काँग्रेस आक्रमक, शिष्टमंडळाचे मंत्र्यांना निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 14:47 IST

गोव्यात आयात होणाऱ्या फॉर्मेलीनयुक्त मासळीच्या प्रश्नावर काँग्रेस शिष्टमंडळाने मच्छीमार मंत्री विनोद पालेकर यांना भेटण्यासाठी सोमवारी सकाळी तडक मंत्रालय गाठले.

पणजी : गोव्यात आयात होणाऱ्या फॉर्मेलीनयुक्त मासळीच्या प्रश्नावर काँग्रेस शिष्टमंडळाने मच्छीमार मंत्री विनोद पालेकर यांना भेटण्यासाठी सोमवारी (24 सप्टेंबर) सकाळी तडक मंत्रालय गाठले. परंतु आपण अपॉईंटमेंट देऊनही मंत्री उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे खात्याचे संचालक विनेश आर्लेकर यांच्याकडे निवेदन देऊन हे शिष्टमंडळ परतले.

दोन दिवसापूर्वी काँग्रेसने पुढाकार घेऊन मडगाव येथे फॉर्मेलीनयुक्त मासळी पकडली. त्यानंतर पक्षाच्या नेत्यांकडून सरकारवर अकार्यक्षमतेचे आरोप सुरू झाले. तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक तसेच अन्य राज्यांमधून गोव्यात आयात होणाऱ्या मासळीत फॉर्मेलीन वापरले जाते आणि ते मानवी आरोग्याला धोकादायक असूनही सरकार कारवाईबाबत कोणती पावले उचलत नाही असा काँग्रेसचा आरोप आहे. या प्रश्नावर पक्षाने मच्छीमारी मंत्री विनोद पालेकर यांची अपॉईंटमेंट मागितली होती. 

सकाळी अकरा वाजता मंत्र्यांनी पर्वरी येथील मंत्रालयात भेटण्यासाठी या शिष्टमंडळाला अपॉईंटमेंट दिली होती. परंतु प्रत्यक्षात मंत्री काही फिरकलेच नाहीत. त्यांनी संचालक विनेश आर्लेकर यांना पाठवले. काँग्रेसने संचालकांकडे निवेदन सादर केले असून आयात मासळी तपासणी बाबत सरकारने कठोर पावले उचलावीत अशी मागणी केली आहे. विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, सांताक्रुजचे आमदार टोनी फर्नांडिस, उत्तर जिल्हा अध्यक्ष विजय भिके तसेच इतरांचा शिष्टमंडळात समावेश होता.अन्न व औषध प्रशासनाकडून मासळी तपासण्यासाठीची यंत्रणा पूर्णपणे सज्ज होईपर्यंत मासळीच्या आयातीवर बंदी घातली जावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. पणजी, मडगाव, वास्को, फोंडा, मापसा आदी सर्व प्रमुख मासळी बाजारांमध्ये मासळी तपासण्यासाठीची कायमस्वरूपी यंत्रणा उभी करावी. तेथे तंत्रज्ञ नेमावेत अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

आयात मासळी टिकवून ठेवण्यासाठी फॉर्मेलीन रसायनाचा वापर केला जातो हे रसायन मानवी आरोग्यास धोकादायक आहे. गेल्या 12 जुलै रोजी मडगाव येथे घाऊक मासे बाजारात हा प्रकार आढळून आल्यानंतर गोव्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर काही दिवसांसाठी आयात मासळीवर राज्य सरकारने बंदी घातली होती. परंतु ही बंदी उठवण्यात आली असून  तपासणी अन्न व औषध प्रशासनाने बंद केली आहे . या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये याबाबत भीतीचे वातावरण कायम आहे. फॉर्मेलीन हे रसायन मानवी पार्थिव टिकवून ठेवण्यासाठी मृतदेहावर लावले जाते. या रसायनाचा वापर मासळी टिकविण्यासाठी केला जात आहे. आणि ते अत्यंत धोकादायक आहे.

टॅग्स :Formalin Chemicalफॉर्मलीन केमिकलgoaगोवाcongressकाँग्रेस