शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

फॉर्मेलीनयुक्त मासळीच्या प्रश्नावर काँग्रेस आक्रमक, शिष्टमंडळाचे मंत्र्यांना निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 14:47 IST

गोव्यात आयात होणाऱ्या फॉर्मेलीनयुक्त मासळीच्या प्रश्नावर काँग्रेस शिष्टमंडळाने मच्छीमार मंत्री विनोद पालेकर यांना भेटण्यासाठी सोमवारी सकाळी तडक मंत्रालय गाठले.

पणजी : गोव्यात आयात होणाऱ्या फॉर्मेलीनयुक्त मासळीच्या प्रश्नावर काँग्रेस शिष्टमंडळाने मच्छीमार मंत्री विनोद पालेकर यांना भेटण्यासाठी सोमवारी (24 सप्टेंबर) सकाळी तडक मंत्रालय गाठले. परंतु आपण अपॉईंटमेंट देऊनही मंत्री उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे खात्याचे संचालक विनेश आर्लेकर यांच्याकडे निवेदन देऊन हे शिष्टमंडळ परतले.

दोन दिवसापूर्वी काँग्रेसने पुढाकार घेऊन मडगाव येथे फॉर्मेलीनयुक्त मासळी पकडली. त्यानंतर पक्षाच्या नेत्यांकडून सरकारवर अकार्यक्षमतेचे आरोप सुरू झाले. तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक तसेच अन्य राज्यांमधून गोव्यात आयात होणाऱ्या मासळीत फॉर्मेलीन वापरले जाते आणि ते मानवी आरोग्याला धोकादायक असूनही सरकार कारवाईबाबत कोणती पावले उचलत नाही असा काँग्रेसचा आरोप आहे. या प्रश्नावर पक्षाने मच्छीमारी मंत्री विनोद पालेकर यांची अपॉईंटमेंट मागितली होती. 

सकाळी अकरा वाजता मंत्र्यांनी पर्वरी येथील मंत्रालयात भेटण्यासाठी या शिष्टमंडळाला अपॉईंटमेंट दिली होती. परंतु प्रत्यक्षात मंत्री काही फिरकलेच नाहीत. त्यांनी संचालक विनेश आर्लेकर यांना पाठवले. काँग्रेसने संचालकांकडे निवेदन सादर केले असून आयात मासळी तपासणी बाबत सरकारने कठोर पावले उचलावीत अशी मागणी केली आहे. विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, सांताक्रुजचे आमदार टोनी फर्नांडिस, उत्तर जिल्हा अध्यक्ष विजय भिके तसेच इतरांचा शिष्टमंडळात समावेश होता.अन्न व औषध प्रशासनाकडून मासळी तपासण्यासाठीची यंत्रणा पूर्णपणे सज्ज होईपर्यंत मासळीच्या आयातीवर बंदी घातली जावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. पणजी, मडगाव, वास्को, फोंडा, मापसा आदी सर्व प्रमुख मासळी बाजारांमध्ये मासळी तपासण्यासाठीची कायमस्वरूपी यंत्रणा उभी करावी. तेथे तंत्रज्ञ नेमावेत अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

आयात मासळी टिकवून ठेवण्यासाठी फॉर्मेलीन रसायनाचा वापर केला जातो हे रसायन मानवी आरोग्यास धोकादायक आहे. गेल्या 12 जुलै रोजी मडगाव येथे घाऊक मासे बाजारात हा प्रकार आढळून आल्यानंतर गोव्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर काही दिवसांसाठी आयात मासळीवर राज्य सरकारने बंदी घातली होती. परंतु ही बंदी उठवण्यात आली असून  तपासणी अन्न व औषध प्रशासनाने बंद केली आहे . या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये याबाबत भीतीचे वातावरण कायम आहे. फॉर्मेलीन हे रसायन मानवी पार्थिव टिकवून ठेवण्यासाठी मृतदेहावर लावले जाते. या रसायनाचा वापर मासळी टिकविण्यासाठी केला जात आहे. आणि ते अत्यंत धोकादायक आहे.

टॅग्स :Formalin Chemicalफॉर्मलीन केमिकलgoaगोवाcongressकाँग्रेस