शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
5
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
8
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
9
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
10
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
11
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
12
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
13
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
14
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
15
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
16
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
17
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
18
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
19
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
20
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 

गिरीश कर्नाड यांचे गोव्याशी वेगळे भावबंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 12:05 IST

गिरीश कर्नाड यांचे गोव्याशी वेगळे भावबंध होते. गोव्यातील कोंकणी माणूस त्यांना आपला वाटायचा. अनेक गोमंतकीयांनी त्यांच्याविषयीच्या आठवणींना सोशल मीडियावरून आणि अन्य व्यासपीठांवरही उजाळा देण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देगिरीश कर्नाड यांचे गोव्याशी वेगळे भावबंध होते. गोव्यातील कोंकणी माणूस त्यांना आपला वाटायचा. अनेक गोमंतकीयांनी त्यांच्याविषयीच्या आठवणींना सोशल मीडियावरून आणि अन्य व्यासपीठांवरही उजाळा देण्यास सुरुवात केली आहे.

सदगुरू पाटील

पणजी : स्व. गिरीश कर्नाड यांचे गोव्याशी वेगळे भावबंध होते. गोव्यातील कोंकणी माणूस त्यांना आपला वाटायचा. अनेक गोमंतकीयांनी त्यांच्याविषयीच्या आठवणींना सोशल मीडियावरून आणि अन्य व्यासपीठांवरही उजाळा देण्यास सुरुवात केली आहे.

कर्नाड यांचा जन्म जरी महाराष्ट्रातील माथेरानमध्ये झाला तरी, ते कोंकणी माणूस. ते मूळचे धारवाडचे. त्यांच्या धारवाडच्या घरी अनेक गोमंतकीय लेखक, गायिका, नाटककार जात असे. एखादा गोमंतकीय घरी आल्याचे पाहून कर्नाड आणि कर्नाड यांच्या आई त्या गोमंतकीयाशी कोंकणी भाषेत बोलत असे. गोव्याच्या एक गायिका शकुंतला भरणे यांनीही अशाच प्रकारची आठवण सोशल मीडियावर शेअर केली आहे. गोवा विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. नंदकुमार कामत यांनी देखील कर्नाड यांच्याविषयीचा आपला अनुभव व आठवण याचा उल्लेख फेसबुकवर केला आहे.

कर्नाड अनेकदा गोव्यात यायचे. 2012 साली गोव्यात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती व दिगंबर कामत हे मुख्यमंत्री होते. त्यावेळी गोवा सुवर्ण महोत्सवी विकास मंडळाची स्थापना मुख्यमंत्री कामत यांनी केली होती. नामवंत संशोधक डॉ. रघुनाथ माशेलकर हे या मंडळाचे अध्यक्ष होते. विजय केळकर वगैरे मंडळाचे सदस्य होते. आणखी कुणाची नियुक्ती या मंडळावर करता येईल काय असे त्यावेळी गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री कामत यांनी माशेलकर यांना विचारले. त्यावेळी माशेलकर यांनी गिरीश कर्नाड यांचे नाव कामत यांना सूचविले. कामत मग कर्नाड यांच्याशी बोलले व कर्नाड त्या मंडळावर काम करण्यास तयार झाले. मध्यंतरीच्या कालावधीत एका चित्र प्रदर्शनावरून वाद निर्माण झाल्यानंतर कर्नाड यांनी तात्त्विक आणि वैचारिक भूमिका घेत मंडळाच्या सदस्यत्वाचा राजीनामा जाहीर केला होता. मग पुन्हा कामत यांनी कर्नाड यांच्याशी बोलणी करून राजीनामा मागे घेण्याची त्यांना विनंती केली होती. कर्नाड यांनी ती विनंती मान्य केली.

कामत यांनीही लोकमतला कर्नाड यांच्याविषयीच्या आठवणी सांगितल्या. गोव्यासाठी पुढील पंचवीस वर्षाचे व्हिजन ठरविण्याच्या हेतूने या मंडळाची स्थापना झाली होती. माशेलकर यांच्यासोबत कर्नाड यांनीही बऱ्यापैकी या कामात रस घेतला. आम्ही गोव्यात त्यावेळी युवकांशी संवादाचे दोन मोठे कार्यक्रम आयोजित केले होते. त्यात कर्नाडही सहभागी झाले होते, असे कामत यांनी सांगितले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने मी सहज भुतकाळामध्ये गेलो, असे कामत म्हणाले.

 

टॅग्स :Girish Karnadगिरिश कर्नाडgoaगोवा