शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

गोव्याचा किनारपट्टी विभाग व्यवस्थापन आराखडा  लोकांना विश्वासात घेऊनच - निलेश काब्राल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 20:29 IST

गोव्याचा किनारपट्टी विभाग व्यवस्थापन आराखडा (सीझेडएमपी) लोकांना विश्वासात घेऊनच तयार केला जाईल

पणजी - गोव्याचा किनारपट्टी विभाग व्यवस्थापन आराखडा (सीझेडएमपी) लोकांना विश्वासात घेऊनच तयार केला जाईल, त्यासाठी तालुकावार जनसुनावण्याही सुरु झालेल्या असून ३ आॅगस्ट रोजी या सुनावण्या संपल्यानंतर लोकांनी ज्या काही सूचना किंवा हरकती उपस्थित केलेल्या आहेत त्या चेन्नई येथील नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंट या संस्थेला पाठवल्या जातील आणि शक्य तेवढ्या सूचनांचा अंतर्भाव केला जाईल, असे राज्याचे पर्यावरणमंत्री निलेश काब्राल यांनी सांगितले. 

गोव्यात किनारपट्टी व्यवस्थापन आराखड्यावरुन वाद निर्माण झाल्याने त्यातील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी हा आराखडा पुन: संस्थेकडे पाठवण्यात आला आहे. राज्यातील काही एनजीओ तसेच पर्यावरणप्रेमींनी या आराखड्याबद्दल प्रश्न उपस्थित करुन सरकारच्या हेतूबद्दल संशय व्यक्त केला होता. 

पत्रकार परिषदेत काब्राल यांनी एनजीओंवर निशाणा साधला. ते म्हणाले की, काही एनजीओ उलटसुलट सांगून लोकांची दिशाभूल करीत आहेत. हा आराखडा तयार करण्यासाठी ८ डिसेंबर २0१४ रोजी एनआयओला वर्क आॅर्डल दिली होती आराखडा तयार करण्यासाठी १ कोटी १0 लाख रुपये आणि भरती रेषा आखणी करण्यासाठी ९२ लाख रुपये देण्याची तयारीही सरकारने दाखवली होती. परंतु एनआयओने हे काम नाकारले. त्यानंतर चेन्नै येथील वरील संस्थेला ते देण्यात आले. दुसरी बाब म्हणजे अन्य कोणत्याही संस्थेला हे काम दिले तरी अखेर चेन्नईच्या एनसीएससीएमकडूनच मान्यता घ्यावी लागते. महाराष्ट्र तसेच अन्य काही राज्यांनी अन्य संस्थांकडून आराखडा तयार करुन घेतला परंतु अखेर  एनसीएससीएमकडून मान्यता घ्यावी लागली. त्यामुळे अखेर या संस्थेकडेच काम सोपविण्याचा निर्णय सरकारने घेतला. 

किनाºयांवरील किंवा सीआरझेड क्षेत्रातील बांधकामे आराखड्यात दाखवलेली नाहीत, अशी जी तक्रार केली जाते ती निरर्थक आहे. आराखड्यात बांधकामे दाखवणे आवश्यक नाही, ते आमचे कामही नव्हे. भरती रेषा, घातक रेषा, वाळूच्या टेकड्या, पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील अशी खारफुटीची जागा किंवा खाजन शेती याबाबत आराखड्यात नोंद करणे हेच काम आहे. 

मच्छिमारी विभागांची आखणी केलेली नाही, हा दावा चुकीचा आहे. जे आरोप करताहेत ते आखणी करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होते, असे काब्राल म्हणाले. २0११ च्या अधिसूचनेनुसार सीआरझेड -३ विभागाची आखणी केली जाईल. त्यासाठी समितीही स्थापन केली जाईल. 

काब्राल म्हणाले की, ‘ सीझेडएमपीसाठी येत्या २६ रोजी डिचोलीत तसेच ३ आॅगस्ट रोजी बार्देसमध्ये जनसुनावणी घेतली जाईल. या सर्व सुनावण्या झाल्यानंतर लोकांची जी काही मते, सूचना किंवा शिफारशी असतील त्या चेन्नईच्या संस्थेला पाठवल्या जातील. लोकसहभागातूनच हा आराखडा तयार केला जाईल. २0११ चा सीझेडएमपी आधी तयार करु आणि त्यानंतर २0१९ चा आराखडाही तयार करण्यात येईल. 

 

टॅग्स :goaगोवाGovernmentसरकार