शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

पारंपारिक व्यवसाय करणाऱ्यांना स्वयंपूर्ण ई बाजाराच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून देणार!

By आप्पा बुवा | Updated: October 10, 2023 23:29 IST

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आश्वासन

अप्पा बुवा, लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा: एकेकाळी पारंपारिक व्यवसायावर आमच्या विकासाची आर्थिक चाके फिरत होती. कालांतराने पारंपरिक व्यवसाय मागे पडत चालले आहेत .परंतु पारंपारिक व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक स्थैर्य उभे करण्यासाठी सरकारने वेगवेगळ्या योजना मांडल्या असून, स्वयंपूर्ण ई बाजाराच्या माध्यमातून मार्केट उपलब्ध करून देण्याचे आव्हान गोवा सरकारने स्वीकारले आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर स्वयंपूर्ण ई बाजार आम्ही प्रत्यक्षात आणत आहोत. असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी दिले.बेतोडा निरंकाल पंचायतीच्या सभागृहाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जलस्त्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर ,पंचायत मंत्री माविन गुदिनो , जी सुडाचे  उपाध्यक्ष आमदार केदार नाईक आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की लोकांना रोजगार निर्माण व्हावे म्हणून आम्ही वेगवेगळे प्रशिक्षण कार्यक्रम राबवत आहोत. तुम्ही फक्त सांगा तुम्हाला हवे ते प्रशिक्षण द्यायला सरकार तयार आहे.या प्रशिक्षण योजना च्या माध्यमातून युवकांनी स्वतःला अद्यावत ठेवणे गरजेचे आहे. यापुढे सरकारी नोकरी देताना सुद्धा अनुभव गरजेचा आहे. मग तो अनुभव सरकारी अप्रेंटरशिप मधला असू दे किंवा खाजगी अप्रेंटरशिप मधला असू दे. गावची पंचायत ही विकासाचे मुख्य केंद्र बनले पाहिजे. त्याकरता नावापुरते पंच सदस्य आम्हाला नको तर, 24 तास गावचया विकासाबद्दल विचार करणारे पंच सदस्य आम्हाला हवे आहेत. कारण विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करायचे असल्यास आम्हाला सर्व घटकांचे सहकार्य आवश्यक आहे. सरकार आज विकासाचे स्वप्न घेऊन वेगवेगळे प्रकल्प उभारत आहे. ग्रामीण भागात सुद्धा आज मोठ्या संख्येने सभागृहे बांधण्यात येत आहेत. ह्या प्रकल्पाचा योग्य तो वापर व्हायला हवा.कारण पूर्वीच्या सरकारने काही ठिकाणी प्रकल्प बांधले व त्यांचा उपयोग झाला नाही अशा घटना घडलेल्या आहेत. गावातील कोणताही सरकारी प्रकल्प हा लोकांना आपला वाटला पाहिजे. आपला प्रकल्प म्हणून त्यानी त्याची निगा राखली पाहिजे.पंचायत मंत्री मावीन गुधीनो यावेळी म्हणाले की' दुर्गम भाग व दुर्बल घटक  डोळ्यासमोर ठेवून आम्ही योजना राबवत आहोत. सामानातल्या सामान्य माणसाचा विकास कसा होईल हे आमचे सरकार पहात आहे. केंद्र सरकारचा सुद्धा गोवा सरकारवर विश्वास आहे म्हणूनच आम्हाला निधी कमी पडू दिला जात नाही . आम्ही फक्त बोलत नाही तर प्रत्यक्षात कृती करून दाखवतो. गाव स्वच्छ राहिला तर गोवा स्वच्छ राहील यासाठी प्रत्येक प्रभागात कचऱ्याचे योग्य ते नियोजन करा. या साठी जो काही पैसा लागेल तो द्यायला सरकार तयार आहे. जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यावेळी बोलताना म्हणाले की सरकारी नोकरी पेक्षा जास्त पैसा आज पारंपारिक व्यवसायात आहे. शेती डेरिं सारख्या व्यवसायामधून सुद्धा मुबलक पैसा कमावता येतो हे काही युवकांनी दाखवून दिले आहे. पारंपारिक धंद्याची कास धरून गावचा विकास शक्य आहे. आज सरकारने वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत.  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सरकारी विकासासाठी पैसा कमी पडू देत नाही. शिक्षणामुळे  जसा व्यक्तीचा विकास होतो तसाच गावचा सुद्धा विकास होतो .स्वयंपूर्ण गोवा, स्वयंपूर्ण पंचायत स्वप्नसाठी प्रत्येक नागरिकांनी आग्रह धरावा. आमदार केदार नाईक यावेळी बोलताना  म्हणाले की गावा गावांमध्ये प्रकल्प येण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सबका साथ, सबका विकास ,सबका प्रयास हा मंत्र घेऊन आम्ही मागची दहा वर्षे काम करत आहोत. भविष्यात सुद्धा करत राहू.डॉ.गौरी शिरोडकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सरपंच उमेश गावडे यांनी स्वागत केले .

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंत