शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मनोहर पर्रीकरांचे खरे शिष्य; लोकसभा निवडणुकीत प्रमोद सावंतांचे काम प्रभावी अन् व्यापक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2024 11:12 IST

पूर्वी निवडणुकांवेळी मनोहर पर्रीकर ज्या पद्धतीने काम करायचे, त्याच पद्धतीचे प्रभावी व व्यापक काम यावेळी डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

- सद्‌गुरू पाटील निवासी संपादक, गोवा

सासष्टीत काँग्रेसला साठ हजारांपेक्षा अधिक आघाडी मिळाली नाही तर काँग्रेस जिंकूच शकणार नाही. साठ हजार मतांची लिड मिळाली तरी काँग्रेस जिंकू शकत नाही; कारण ती लिड फोंडा, सांगे, सावर्डे या भागात व मुरगाव तालुक्यात तसेच काणकोण व केपे तालुक्यात भाजप सहज भरून काढील.

पूर्वी निवडणुकांवेळी मनोहर पर्रीकर ज्या पद्धतीने काम करायचे, त्याच पद्धतीचे प्रभावी व व्यापक काम यावेळी डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. मुख्यमंत्री सावंत हे पूर्ण पू गोव्यात फिरले. ते केवळ आपल्या साखळी मतदारसंघापुरते किंवा केवळ डिचोली तालुक्यापुरते मर्यादित राहिले नाहीत. उत्तर आणि दक्षिण गोव्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये सावंत यांनी दौरे केले. कार्यकर्त्यांची शेकडो संमेलने, हजारो बैठका व काही जाहीर सभा घेतल्या. खिस्ती मतदारांमध्येही सावंत यांनी यावेळी जोरात प्रचार केला, दक्षिण गोव्यात भाजप जर जिंकला तर त्याचे अधिकांश श्रेय डॉ. सावंत यांनाच जाईल. 

अर्थात भाजपला यावेळी दक्षिण गोव्यात जास्त मते मिळालेली असतील असे म्हणण्यास खूप वाव आहे. हिंदू मतदारांची संख्या जास्त असलेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये जास्त प्रमाणात मतदान झाले, त्यामागे भाजपचेच प्रयत्न आहेत हे मान्य करावे लागेल, काँग्रेसने लोकांना मतदानासाठी बाहेर काढले नाही, बाहेर येऊन आपल्यासाठी मतदान करा असे सांगण्यासाठी फिल्डवर अत्यंत सक्रीय कार्यकर्ते व कार्यकर्त्यांच्या टीम्स लागतात, काँग्रेसकडे ही व्यवस्थाच नव्हती व आताही नाही. त्यामुळे भाजपला अधिक मोकळे रान मिळाले. मुख्यमंत्री सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी या संधीचे सोने केले. 

पर्रीकर विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकांवेळी कसे काम करायचे ते आम्ही काही पत्रकारांनी खूप जवळून पाहिले होते, अनुभवले होते. त्याच पद्धतीने मुख्यमंत्री सावंत यांनी आता काम केले आणि त्यांना तानावडे, उपाध्यक्ष दत्ता खोलकर तसेच नरेंद्र सावईकर, दामू नाईक, विनय तेंडुलकर आदी अनेक पदाधिकाऱ्यांची योग्य साथ मिळाली, विरोधातील इंडिया आघाडीही संघटीत होती, पण कार्यकर्ते कमी, संघटनात्मक व्यवस्था नाही; यामुळे आघाडी कमी पडली. ज्या विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपला प्रचंड आघाडी एरव्ही मिळते, त्या मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे काम नावापुरतेही नाही. जिथे भाजपला वीस हजार मते मिळतात तिथे काँग्रेसला चार-पाच हजार एवढीच मते मिळतात. ती देखील भाजप नको म्हणून काँग्रेसला मत दिले असे सांगणान्या लोकांची.

भाजपकडे अठरा हजार कार्यकर्ते आहेत, पन्ना प्रमुख ही व्यवस्था भाजपने अत्यंत प्रभावीपणे यावेळी राबवली. परवा मला तानावडे यांनी सांगितले की- भाजपच्या ज्या आमदाराने पन्ना प्रमुख ही भाजपची व्यवस्था स्वीकारली, त्या आमदाराच्या मतदारसंघात ८० टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. पणजीत बाबूश भोन्सेरात यांनी पन्ना प्रमुख पद्धत चांगल्या प्रकारे अमलात आणलीच नाही, त्यामुळे पणजीत मतदान मर्यादित प्रमाणात झाले. मडगाव, कुडचडेतही त्या त्या आमदारांनी पन्नाप्रमुख पद्धत छान राबवली. डिचोलीत राबवली गेली, साखळीत तर उत्तम प्रकारे अंमलबजावणी झाली. त्या सगळीकडे मतदान खूप वाढलेय, सत्तरी तालुक्यात विश्वजित राणे यांनी स्वतःची वेगळी व आक्रमक व्यवस्था राबवली आणि मतदान वाढवून दाखवले.

प्रमोद सावंत भाजपसाठी अगदी झोकून देऊन काम करतात, खूप कष्ट घेतात. सरकार सांभाळताना खूप कसरती कराव्या लागतात. काही मंत्री छळत असतात, ठरावीक फाइल्स संमत व्हाव्यात एवढीच काही मंत्री व आमदारांची अपेक्षा असते. अर्थात अशा प्रकारचा त्रास सावंत यांच्या वाट्याला तुलनेने आता कमी येतो. कारण सरकार भक्कम आहे. हे आघाडी सरकार नव्हे, मगो पक्षही मुख्यमंत्र्यांवर दबाव घालू शकत नाही. तरी देखील सरकार चालवतानाच राज्यभर फिरून पक्षाचे काम करत राहणे हे कष्टाचे असते, पर्रीकर यांचे आरोग्य ढासळण्यास तेही एक कारण होते. पर्रीकर यांना कायम काही मंत्र्यांच्या कटकटींना तोंड द्यावे लागायचे, पक्ष काम करतच गोवाभर फिरावे लागत असे, जेवण वगैरे वेळेवर होतच नव्हते. मुख्यमंत्री सावंत हे वेळेचे व्यवस्थापन नीट करतात.

भाजपकडे प्रशिक्षण व्यवस्था आहे. त्या प्रशिक्षणातून कार्यकर्ते तयार होतात. कार्यकर्ते चुकांतून शिकतात. मुख्यमंत्र्यांनी भाजप संघटनेत पूर्वी विविध टप्प्यांवर काम केल्यामुळे त्यांनाही अनुभव मिळाला. पर्रीकर यांच्यामुळेच आपण राजकारणात पुढे येऊ शकलो, पर्रीकरांनी तिकीट दिले, वाव दिला; त्यामुळे आपण आमदार होऊ शकलो असे प्रमोद सावंत अनेकदा सांगतात. सावंत यांची कसोटी गेल्या विधानसभा निवडणुकीवेळीही लागली होती. २०२२ ची विधानसभा निवडणूक सावंत व तानावडे यांनी हाताळली, पण त्यावेळी मदतीसाठी देवेंद्र फडणवीस महिनाभर गोव्यात होते. सी. टी. रवी हेही गोव्यात वारंवार यायचे. रोहन खंवटेंसह काहीजणांना पक्षात आणण्याचे काम त्यावेळी फडणवीस व इतरांनी केले होते. 

यावेळी लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री सावंत व प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी स्वबळावर सगळी योजना राबवली. पूर्ण गोव्यात जोरात काम केल्याने मतदानाची टक्केवारी वाढलीच शिवाय दोन्ही जागा भाजप जिंकतोय असा आत्मविश्वास पक्षाच्या रैंक अॅण्ड फाईलमध्ये निर्माण झाला. श्रीपाद नाईक यांच्याबाबत उत्तरेत नाराजी होती, पण त्या नाराजीवर मुख्यमंत्र्यांनी यशस्वी मात केली आहे. दक्षिण गोव्यातील खिस्ती मतदार आणि काही ख्रिस्ती धर्मगुरूंनी काँग्रेसला यावेळी जबरदस्त साथ दिली. पण सावर्डे, सांगे, कुडचडे, केपे, फोंडा तालुका व मुरगाव तालुक्यातील मतदानाच्या बळावर भाजप जिंकेल असेच दिसते. पल्लवी धेंपे यांच्यासाठी ती लॉटरी असेल व त्याचे श्रेय मुख्यमंत्री सावंत आणि भाजपच्या सर्व मंत्री, आमदारांना जाईल हे वेगळे सांगायला नको. 

गोव्यात काँग्रेस संघटनात्मक पातळीवर खूप विस्कळीत झाली आहे, काही ठिकाणी ती खिळखिळीच झाली आहे. आमदार पक्ष सोडून गेले की काँग्रेसचे कार्यकर्तेही आमदारासोबत दुसऱ्या पक्षात जातात. तिथे हा पक्ष मार खातो. यावेळी कळंगुट, सांताक्रूड़ा व हळदोणे या तीनच विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसला लिड मिळू शकते, अशी चर्चा भाजपच्या आतिल गोटात आहे. 

कळंगुटमध्ये काँग्रेससाठी जोझफ सिक्वेरा यांनी काम केले, दक्षिण गोव्यात भाजपला बाणावली, नुवे, वेळ्ळी अशा काही मतदारसंघांमध्ये कधी आघाडी मिळतच नाही. तिथे पाच हजार मते मिळणे हेच मोठे काम असते, सासष्टीत काँग्रेसला साठ हजारांपेक्षा अधिक आघाडी मिळाली तरी काँग्रेस जिंकूच शकणार नाही. साठ हजार मतांची लिड मिळाली तरी काँग्रेस जिंकू शकत नाही, कारण ती लिड फोंडा, सांगे, सावर्डे व मुरगाव तालुक्यात तसेच काणकोण व कैपे तालुक्यात भाजप सहज भरून काढील. फोंडा तालुक्यात भाजपला वीस हजार लिड मिळू शकते. उर्वरित तालुक्यांमध्ये आणखी चाळीस हजार मतांची आघाडी भाजप प्राप्त करूच शकतो. मुख्यमंत्री सावंत यांचे नेतृत्व याबाबतीत नशीबवान ठरले आहे, असे आताच पक्षाचे काही महत्त्वाचे पदाधिकारी बोलत आहेत.

पर्रीकर यांच्या निधनानंतरच्या काळापासून ते आतापर्यंत मुख्यमंत्री सावंत खऱ्या अर्थाने भाजपची धुरा गोव्यात यशस्वीपणे सांभाळत आहेत. पंतप्रधान मोदी किवा गृहमंत्री शहा यांनाही याची कल्पना आली आहे. एकदा लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकल्या की, सावंत यांचे आसन गोव्यात अधिक भक्कम होईल असे म्हणण्यास खूप वाव आहे. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतManohar Parrikarमनोहर पर्रीकरBJPभाजपा