शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल; "विरोधासाठी विरोध करणाऱ्या शक्ती वावरत आहेत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2020 12:48 IST

वीज वाहिन्यांचेही काम जर करता आले नाही तर लोकांच्या घरांमध्ये वातानुकूलित यंत्रणा तसेच उद्योग बंद पडतील.

पणजी : निवडणुका जवळ आलेल्या असल्याने प्रत्येक गोष्टीला विरोध करण्याचे राजकारण राज्यात वाढत आहे. प्रत्येक प्रकल्पाला विरोध करणे हे गोव्याच्या हिताचे नव्हे, काही शक्ती विरोधासाठी विरोध करण्याच्या हेतूनेच वावरत आहेत, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी येथे सांगितले.

वीज वाहिन्यांचेही काम जर करता आले नाही तर लोकांच्या घरांमध्ये वातानुकूलित यंत्रणा तसेच उद्योग बंद पडतील. घरात तीन-चार वातानुकूलित यंत्रणा लावून अनेकजण झोपतात पण वीज वाहिन्यांचा प्रकल्प झाला नाही तर यंत्रणा चालू शकणार नाहीत. काहीजण लंडनमध्ये राहतात व मोलेच्या प्रकल्पाला विरोध करतात. मोले कुठे व लंडन कुठे याचा तरी विचार व्हायला हवा, असे मुख्यमंत्री म्हणाले.

प्रत्येक प्रकल्पाला अर्थहीन पद्धतीने विरोध करण्यासाठीच काही शक्ती वावरत आहेत. पुढील वीस वर्षानंतर कधी तरी राष्ट्रीय महामार्गाचे काम होईल पण त्याचे नियोजन आतापासूनच करावे लागते. आम्ही ते नियोजन सुरू केले तरी विरोध केला जातो. बेतुल बंदराच्या विषयावरूनही काहीजण अपप्रचार करू पाहतात. ते बंदर आम्ही यापूर्वीच रद्द करून घेतले आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. आमचे सरकार सामान्य माणसाचा व समाजात सर्वात शेवटपर्यंत असलेल्या घटकाच्या विकासासाठी वावरत आहे.

गोवा सरकारने हे राज्य स्वयंपूर्ण करण्यावर भर दिला आहे. अधिकाऱ्यांना त्यासाठी तयार केले गेले आहे. वरिष्ठ अधिकरी पंचायतींना भेट देतील. गोवा मुक्त होऊन साठ वर्षे झाली पण अजूनही काही मूलभूत समस्या येथे कायम आहेत. त्या सोडविल्या जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले. आयआयटीसारख्या चांगल्या प्रकल्पालाही काहीजण विरोध करतात. हे ठीक नव्हे. अशा प्रकारचे प्रकल्प यायलाच हवेत. लोकांनी चर्चेसाठी यावे, आपण स्वत: लोकांचे सगळे म्हणणे ऐकून घेतो. आम्ही प्रश्न सोडवतो असे मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत