शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल; "विरोधासाठी विरोध करणाऱ्या शक्ती वावरत आहेत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2020 12:48 IST

वीज वाहिन्यांचेही काम जर करता आले नाही तर लोकांच्या घरांमध्ये वातानुकूलित यंत्रणा तसेच उद्योग बंद पडतील.

पणजी : निवडणुका जवळ आलेल्या असल्याने प्रत्येक गोष्टीला विरोध करण्याचे राजकारण राज्यात वाढत आहे. प्रत्येक प्रकल्पाला विरोध करणे हे गोव्याच्या हिताचे नव्हे, काही शक्ती विरोधासाठी विरोध करण्याच्या हेतूनेच वावरत आहेत, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी येथे सांगितले.

वीज वाहिन्यांचेही काम जर करता आले नाही तर लोकांच्या घरांमध्ये वातानुकूलित यंत्रणा तसेच उद्योग बंद पडतील. घरात तीन-चार वातानुकूलित यंत्रणा लावून अनेकजण झोपतात पण वीज वाहिन्यांचा प्रकल्प झाला नाही तर यंत्रणा चालू शकणार नाहीत. काहीजण लंडनमध्ये राहतात व मोलेच्या प्रकल्पाला विरोध करतात. मोले कुठे व लंडन कुठे याचा तरी विचार व्हायला हवा, असे मुख्यमंत्री म्हणाले.

प्रत्येक प्रकल्पाला अर्थहीन पद्धतीने विरोध करण्यासाठीच काही शक्ती वावरत आहेत. पुढील वीस वर्षानंतर कधी तरी राष्ट्रीय महामार्गाचे काम होईल पण त्याचे नियोजन आतापासूनच करावे लागते. आम्ही ते नियोजन सुरू केले तरी विरोध केला जातो. बेतुल बंदराच्या विषयावरूनही काहीजण अपप्रचार करू पाहतात. ते बंदर आम्ही यापूर्वीच रद्द करून घेतले आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. आमचे सरकार सामान्य माणसाचा व समाजात सर्वात शेवटपर्यंत असलेल्या घटकाच्या विकासासाठी वावरत आहे.

गोवा सरकारने हे राज्य स्वयंपूर्ण करण्यावर भर दिला आहे. अधिकाऱ्यांना त्यासाठी तयार केले गेले आहे. वरिष्ठ अधिकरी पंचायतींना भेट देतील. गोवा मुक्त होऊन साठ वर्षे झाली पण अजूनही काही मूलभूत समस्या येथे कायम आहेत. त्या सोडविल्या जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले. आयआयटीसारख्या चांगल्या प्रकल्पालाही काहीजण विरोध करतात. हे ठीक नव्हे. अशा प्रकारचे प्रकल्प यायलाच हवेत. लोकांनी चर्चेसाठी यावे, आपण स्वत: लोकांचे सगळे म्हणणे ऐकून घेतो. आम्ही प्रश्न सोडवतो असे मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत