शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

गोव्याचा अर्थसंकल्प: विकास व रोजगाराचा मजबूत पाया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 08:48 IST

मुख्यमंत्री सावंत यांनी कल्पक कल्याणकारी योजनांनी नटलेला आणि भविष्यातील गोवा घडविण्यासाठी मार्गदर्शक ठरणारा अर्थसंकल्प मांडला.

दत्ता खोलकर, म्हापसा

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुकताच राज्याचा वित्तीय वर्ष २०२३ - २४ चा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. एकूण २६,८४४ कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी अर्थसंकल्प मांडण्यात आला. कोणतीही नवीन करवाढ नसलेला व गोमंतकीय जनतेला सवलती देणाऱ्या या अर्थसंकल्पाचे राज्यभरात स्वागत झाले. तसेच अर्थसंकल्पात साधन सुविधा निर्मितीवर भर देण्यात आल्यामुळे, ही बाब उद्योगधंद्यांना पूरक ठरेल. बहुतेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

अर्थसंकल्प हा राज्याचा सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज असतो. त्यात राज्याची आर्थिक स्थिती तर मांडली जातेच, पण भविष्यासाठी ब्ल्यू प्रिंट आखला जातो. त्याच्या आधारे सरकार पुढील आर्थिक वर्षाच्या खर्चाचे तसेच उत्पन्नाचे नियोजन करते. अर्थसंकल्पात विविध लोककल्याणकारी योजनांचा व त्यासाठी लागणाऱ्या निधी पुरवठ्याचा समावेश असतो. तसेच राज्यातील नवीन प्रकल्प आणि पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद यात केली जाते. सरकारला आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अर्थसंकल्प दिशा देतो.

पूर्वी गोवा केंद्रशासित प्रदेश असताना येथील विधानसभेत मंजूर झालेला अर्थसंकल्प लोकसभेत मान्यतेसाठी पाठवावा लागत असे. त्यावेळी अधिकाऱ्यांमार्फत तयार केलेला अर्थसंकल्प मांडला जायचा. फक्त सरकारी महसूल व खर्च तसेच कर प्रणालीवर आधारित बजेट तयार करण्यात येत होते. नवीन योजनांचा व प्रकल्पांचा यात जरा सुद्धा उल्लेख नसायचा. १९८७ साली पूर्ण राज्याचा दर्जा प्राप्त झाल्यानंतरसुद्धा गोव्याचा पूर्ण अर्थसंकल्प अधिकारी वर्गच तयार करत असत. तत्कालीन अर्थमंत्री फक्त बजेट विधानसभेत सादर करून त्यास मंजुरी घेण्याचे कार्य करत. परंतु (स्व.) मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्री झाल्यावर ही पद्धत मोडीत काढली. मार्च महिन्यात पर्रीकर अर्थसंकल्प तयार करण्यात स्वतःला गुंतवून ठेवत विविध प्रकारच्या घटकांसोबत चर्चा करून त्यांच्या समस्या समजून घेत. खातेप्रमुखांबरोबर बैठकांचे सत्र चालायचे. आमदारांसोबत बसून विविध मतदासंघांतील आवश्यक कामाची यादी मागवत. विस्तृत गृहपाठानंतरच, ते विश्वासू अधिकाऱ्यांसह बसून अर्थसंकल्प तयार करायचे. त्यांनी आपल्या कार्यकाळात एकूण नऊ वेळा अर्थसंकल्प सादर केला. २-३ तास दीर्घ भाषण व कल्पक कल्याणकारी योजनांनी युक्त त्यांचा अर्थसंकल्प ऐकण्यासाठी विधानसभेत प्रेक्षक गॅलरीत प्रचंड गर्दी होत असे. त्यांनी कित्येक महत्त्वाच्या प्रकल्पांची घोषणा आपल्या बजेट भाषणात केली. गोमंतकीय पर्रीकर यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाची वाट पाहात.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी कृषी उत्पादकांना भरीव आर्थिक पाठबळ जाहीर केली आहे. भात, काजू व नारळासाठी आधारभूत किमतीत लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. भातासाठी प्रति किलो २० रुपयांवरून २२, नारळासाठी बारावरून पंधरा रुपये तर काजूसाठी १२५ वरून १५० रुपये आधारभूत किंमत जाहीर झाली आहे. भातासाठीचा हमी भाव २०१७ नंतर पहिल्यांदाच १० टक्के वाढला आहे. काजूच्या बाबतीत गेली दहा वर्षे उत्पादक सतत मागणी करत होते. १२५ वरून १५०, म्हणजे २० % भरीव वाढ देण्यात आली आहे. या नवीन दरांमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून, यामुळे किमान तीस हजार कृषी उत्पादकांना लाभ होणार आहे. तसेच नाचणी व इतर धान्य पिकविण्यासाठी दिलेले उत्तेजन व आर्थिक पाठबळ स्वागतार्ह आहे.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी राज्यात नवीन रोजगार संधी निर्माण करण्यास प्राधान्य दिले आहे. सरकारी नोकऱ्या सगळ्यांना मिळू शकत नसल्याने स्वयंरोजगार व्यवस्था बळकट करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. अर्थसंकल्पात टॅक्सी व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांसाठी गोंयचो टॅक्सी पात्रांव योजनेंतर्गत कोणत्याही गुंतवणुकीशिवाय टॅक्सी दिल्या जातील. यावर्षी १००० युवकांना याचा लाभ मिळेल. हरित गोवा धोरणांतर्गत हरित तंत्रज्ञान वापरासाठी प्रोत्साहित करून पुढच्या पाच वर्षांत दहा हजार नोकऱ्या तयार करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच पुढील काळात गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाचा विस्तार करण्यासाठी ठोस कार्यक्रम आखण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांत सुमारे २२ हजार कर्मचारी या महामंडळात सामावून घेण्यात आले. या संस्थेतर्फे सुरक्षा रक्षक, एमटीएस व तत्सम कर्मचारी वर्गासाठी भरती केली जाते. एसएससीपर्यंत शिक्षित युवक-युवतींना ही भरती वरदान ठरली आहे. यापूर्वी या नोकऱ्या कंत्राटदारामार्फत परप्रांतीयांना देण्यात येत होत्या. या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना १८ ते २० हजार मासिक वेतन असून, याचा विस्तार करून खासगी क्षेत्रातसुद्धा या संस्थेतर्फे भरती करून येत्या वर्षात किमान दहा हजार रोजगार तयार करण्याचे सरकारने निश्चित केले आहे. अर्थसंकल्पात या कर्मचाऱ्यांना नवीन सवलती व सरकारी नोकरीत आरक्षण देण्याची घोषणा झाली आहे. स्वयंपूर्ण गोवा बोर्ड स्थापन करून युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करणे व त्यांना प्रशिक्षण देण्याची योजना जाहीर झाली आहे. यामुळे बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध होतील, हे निश्चित.

राज्यातील पायाभूत सुविधा व सरकारी व्यवस्था बळकट करण्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. पाणीपुरवठ्यासाठी ६६३ कोटी, जीएसआयडीसीसाठी ३८० कोटी, शहर विकासासाठी ६०५ कोटी, रस्त्यांच्या कामासाठी १००० कोटी, सरकारी कार्यालयांच्या डागडुजीसाठी ३४३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. म्हादई खोऱ्यात तीन जलशुद्धीकरण प्रकल्पांची निर्मिती, चोडण-पोंबुर्पा, सत्तरीत पैकुळ व तार सावर्डे येथे पूल उभारणी, पर्वरीत आंबेडकर भवन, बांबोळीत अत्याधुनिक रक्तपेढी आणि टीबी हॉस्पिटल बांधकाम, वाळपईत सुसज्ज अग्निशमन दल इ. प्रकल्प जाहीर करून राज्याच्या विकासाला गती देण्याचा मनोदय मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

सर्व सरकारी खाती व महामंडळे यापुढे फक्त डिजिटल पद्धतीने आर्थिक व्यवहार करतील, हा निर्णय स्वागतार्ह आहे. मेडिक्लेम तसेच दयानंद सुरक्षा योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी उत्पन्न मर्यादा वाढविल्याने गरजू लाभार्थीना योग्य न्याय मिळेल व गैरवापर बंद होईल. मुख्यमंत्र्यांच्या अचूक आर्थिक नियोजनामुळे गेल्या आर्थिक वर्षात फक्त १३०० कोटी कर्जरूपी घेतले गेले. नाबार्ड व सिडबी (SIDBI) कडून दोन टक्के व्याजाने कर्ज घेतल्यामुळे सरकारच्या करोडो रुपयांची बचत झाली. अर्थसंकल्प पूर्णपणे अंमलात आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांना कठोर निर्णय घ्यावे लागतील. जीएसटी महसुलाचे राज्य सरकारच्या उत्पन्नात ४४ टक्के प्रमाण असून, ते वाढवून किमान ५५ टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी सरकारला प्राधान्य द्यावे लागेल. समांतर अर्थव्यवस्था मोडीत काढून, पर्यटन उद्योगातून महसूल वाढविणे आवश्यक आहे. खाणींचा लिलाव व प्रत्यक्ष खाण उद्योग लवकर सुरू झाल्यास अपेक्षित एक हजार कोटी महसूल मिळेल. सरकारला हे आव्हान स्वीकारावे लागेल. पगार व पेन्शनवर २८.४ टक्के व सरकारी कर्ज व व्याज परतफेड यावर १५.७ टक्के खर्च होतात. भविष्यात ही आकडेवारी कमी होणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री ही आव्हाने यशस्वीपणे पेलण्यासाठी योग्य पद्धती अवलंबतील व रणनीती आखतील, हे निश्चित.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :goaगोवाBudgetअर्थसंकल्प 2023