शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

काही सामाजिक कार्यकर्ते खंडणीखोर, आंदोलने पैशांसाठी; भाजपचे टीकास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2024 10:47 IST

काहीजण स्वतःला समाजिक कार्यकर्ते म्हणून घेतात, ते खंडणीखोर आहेत. काही पैसे घेऊन आंदोलन करत आहेत. काही राजकीय हेतूने आंदोलन करत आहेत, अशी टीका भाजपाने केली.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : ज्या सामाजिक कार्यकर्त्यांना खरोखरच राज्याविषयी काही देणे-घेणे आहे, त्यांच्या सूचना भाजप सरकार ऐकून घेत आहे. पण काहीजण स्वतःला समाजिक कार्यकर्ते म्हणून घेतात, ते खंडणीखोर आहेत. काही पैसे घेऊन आंदोलन करत आहेत. काही राजकीय हेतूने आंदोलन करत आहेत. असे कार्यकर्ते चांगल्या कामांना विरोध करतात, अशी टीका भाजपचे प्रवक्ते गिरीराज पै-वेर्णेकर यांनी केली. जे कार्यकर्ते समाजाच्या हितासाठी काम करत आहेत त्यांचे सरकार ऐकते असे ते म्हणाले.

गुरुवारी भाजप कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे प्रवक्ते अॅड. यतिश नाईक व माजी आमदार ग्लेन टिकलो, गिरीश उस्कैकर यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, 'कोमुनिदाद जमिनींच्या रूपांतरणावर बंदीचा सरकारचा निर्णय हा सर्वांच्या हिताचा आहे. यामुळे अवैध बांधकाम आणि बेकायदेशीर जमिनीचा वापर थांबणार आहे. पण काँग्रेसचे आमदार अॅड. कार्लस फरेरा यांनी यालाही राजकीय हेतूने विरोध केला. काँग्रेस जनतेच्या हितासाठी नाही तर राजकीय हितासाठी विरोध करत आहे.

अॅड. यतिश नाईक म्हणाले, नुकतेच सरकारने भाडेकरूंची पडताळणी करणारी मोहीम सुरू केली आहे. ती सुरक्षिततेसाठी महत्त्वाची आहे. आज राज्यात गुन्हे होत आहेत याला परप्रांतीय जबाबदार आहेत. त्यामुळे अशी पडताळणी केली तर गुन्हे कमी होतील. अशा निर्णयांचे विरोधकांनी स्वागत करायचे असते. पण ते विरोध करत आहेत.

गिरीराज पै वेर्णेकर म्हणाले की, मोदींनी फक्त चार जातींना महत्त्व दिले आहे. यात युवा, महिला, गरीब आणि शेतकरी यांच्या विकासासाठी भाजप काम करत आहे. फा. फ्रान्सिस झेवियरवर आक्षेपार्ह विधान केले आहे तो सामाजिक कार्यकर्ता भाजपलाही टार्गेट करत आहे. त्यामुळे भाजप त्याला पाठिंबा देत नाही. ज्यांच्या भावना दुखावल्या त्यांनी कायदेशीर तक्रार करावी. सरकार कारवाई करेल.

आलेमांव यांनी तो डीएनए तपासावा 

गिरीराज पै वेर्णेकर म्हणाले, काँग्रेसचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव हे कुणीही जातीय सलोखा बिघडवला तर त्याला भाजपला जबाबदार धरतात. त्यांनी नुकतेच भाजपला जबाबदार धरून डीएनए चाचणी करावी, असे विधान केले आहे. युरींनी भाजपच्या डीएनएविषयी बोलू नये. अगोदर आलेमांवचा डीएनए काय आहे ते पाहावे. आलेमाव कुटुंबाला २०१२ च्या निवडणुकीत जनतेने नाकारले होते. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण