शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

काही सामाजिक कार्यकर्ते खंडणीखोर, आंदोलने पैशांसाठी; भाजपचे टीकास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2024 10:47 IST

काहीजण स्वतःला समाजिक कार्यकर्ते म्हणून घेतात, ते खंडणीखोर आहेत. काही पैसे घेऊन आंदोलन करत आहेत. काही राजकीय हेतूने आंदोलन करत आहेत, अशी टीका भाजपाने केली.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : ज्या सामाजिक कार्यकर्त्यांना खरोखरच राज्याविषयी काही देणे-घेणे आहे, त्यांच्या सूचना भाजप सरकार ऐकून घेत आहे. पण काहीजण स्वतःला समाजिक कार्यकर्ते म्हणून घेतात, ते खंडणीखोर आहेत. काही पैसे घेऊन आंदोलन करत आहेत. काही राजकीय हेतूने आंदोलन करत आहेत. असे कार्यकर्ते चांगल्या कामांना विरोध करतात, अशी टीका भाजपचे प्रवक्ते गिरीराज पै-वेर्णेकर यांनी केली. जे कार्यकर्ते समाजाच्या हितासाठी काम करत आहेत त्यांचे सरकार ऐकते असे ते म्हणाले.

गुरुवारी भाजप कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे प्रवक्ते अॅड. यतिश नाईक व माजी आमदार ग्लेन टिकलो, गिरीश उस्कैकर यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, 'कोमुनिदाद जमिनींच्या रूपांतरणावर बंदीचा सरकारचा निर्णय हा सर्वांच्या हिताचा आहे. यामुळे अवैध बांधकाम आणि बेकायदेशीर जमिनीचा वापर थांबणार आहे. पण काँग्रेसचे आमदार अॅड. कार्लस फरेरा यांनी यालाही राजकीय हेतूने विरोध केला. काँग्रेस जनतेच्या हितासाठी नाही तर राजकीय हितासाठी विरोध करत आहे.

अॅड. यतिश नाईक म्हणाले, नुकतेच सरकारने भाडेकरूंची पडताळणी करणारी मोहीम सुरू केली आहे. ती सुरक्षिततेसाठी महत्त्वाची आहे. आज राज्यात गुन्हे होत आहेत याला परप्रांतीय जबाबदार आहेत. त्यामुळे अशी पडताळणी केली तर गुन्हे कमी होतील. अशा निर्णयांचे विरोधकांनी स्वागत करायचे असते. पण ते विरोध करत आहेत.

गिरीराज पै वेर्णेकर म्हणाले की, मोदींनी फक्त चार जातींना महत्त्व दिले आहे. यात युवा, महिला, गरीब आणि शेतकरी यांच्या विकासासाठी भाजप काम करत आहे. फा. फ्रान्सिस झेवियरवर आक्षेपार्ह विधान केले आहे तो सामाजिक कार्यकर्ता भाजपलाही टार्गेट करत आहे. त्यामुळे भाजप त्याला पाठिंबा देत नाही. ज्यांच्या भावना दुखावल्या त्यांनी कायदेशीर तक्रार करावी. सरकार कारवाई करेल.

आलेमांव यांनी तो डीएनए तपासावा 

गिरीराज पै वेर्णेकर म्हणाले, काँग्रेसचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव हे कुणीही जातीय सलोखा बिघडवला तर त्याला भाजपला जबाबदार धरतात. त्यांनी नुकतेच भाजपला जबाबदार धरून डीएनए चाचणी करावी, असे विधान केले आहे. युरींनी भाजपच्या डीएनएविषयी बोलू नये. अगोदर आलेमांवचा डीएनए काय आहे ते पाहावे. आलेमाव कुटुंबाला २०१२ च्या निवडणुकीत जनतेने नाकारले होते. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण