शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

भाऊसाहेबांच्या दूरदृष्टीचा आज गोव्याला लाभ: मंत्री सुदिन ढवळीकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 08:02 IST

पुण्यतिथीदिनी अभिवादन

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भाऊसाहेब बांदोडकर हेच राज्याचे खरे भाग्यविधाते आहेत. त्यांच्यामुळे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष सुरुवातील अनेक वर्षे सत्तेत येऊ शकला. भाऊसाहेबांमुळे राज्यात शिक्षणाचा पाया रोवला गेला. ज्या अनेक विकास योजना त्यांनी राबविल्या त्याचा फायदा आज राज्याला होत आहे, असे प्रतिपादन वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले.

मंत्री ढवळीकर यांनी मंगळवारी भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने पणजीत जूने सचिवालय परिसरात असलेल्या भाऊसाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनीही पणजीत उपस्थित राहत भाऊसाहेबांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्यासोबत मुख्य सचिव व्ही. कांडावेलू आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

मिरामार येथील भाऊसाहेब बांदोडकर यांच्या समाधीचे काम विविध कारणांमुळे प्रलंबित आहे. परंतु, मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन जीएसआयडीसीकडून देण्यात आले आहे. किनाऱ्यावरच असल्याने येथे अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. पण येणाऱ्या काळात नक्कीच ती पूर्ण होईल, असेही मंत्री ढवळीकर यांनी सांगितले.

आयोग नाही, तर बीएलओ जबाबदार

सध्या मते चोरीचा विषय चर्चेत असून, त्यावर बोलताना मंत्री ढवळीकर म्हणाले की, मतदारांमधील तफावत ही गट विकास अधिकारी (बीएलओ) स्तरावर होते आणि ती पूर्णपणे निवडणूक आयोगाच्या पातळीवर सोडवता येत नाही. कर्नाटकमध्ये मतदारांच्या यादीत तफावत झाल्याचे समोर येत आहे. इथे काय भाजप सत्तेत नाही, तिथे काँग्रेस सत्तेत आहे आणि बीएलओ राज्य सरकारच्या अंतर्गत काम करतात, त्यामुळे पक्षाला किंवा केवळ निवडणूक आयोगाला दोष देऊन काहीच फायदा नाही, त्यापेक्षा बीएलओ स्तरावर चांगले काम झाले पाहिजे.

भाऊसाहेबांकडून विकासाची पायाभरणी : शिष्टाचार मंत्री माविन गुदिन्हो

कुठलीही इमारत किंवा बांधकाम घट्ट राहण्यासाठी त्याचा पाया मजबुत असणे गरजेचे आहे. तसेच राज्याच्या बाबतीतही आहे. आम्ही गोमंतकीय याबाबत खूप नशीबवान आहोत की, आम्हाला भाऊसाहेब बांदोडकर यांच्यासारखे पहिले मुख्यमंत्री मिळाले. त्यांनीच राज्याच्या विकासाचा पाया रचला आणि आमचे राज्य समृद्धीकडे वळले. त्यांनीच शिक्षण क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, उद्योग, वाहतूक व इतर साधन सुविधा योग्य प्रकारे भविष्याचा वेध घेत राज्यात आणल्या. ज्याचा फायदा आज गोव्याला होत आहे, असे शिष्टाचार मंत्री माविन गुदिन्हो यांनी यावेळी सांगितले.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण