शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

सरकारला कुणाचीही जमीन हडप करायची नाही: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 08:30 IST

वारसा नसलेल्या मालमत्तेच्या विधेयकावरून सभागृहात गदरोळ झाला.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सरकारला कोणाचीही जमीन हडप करायची नाही. उलट राज्यातील भू-बळकाव प्रकरणांत सरकारने एसआयटी स्थापन केली व ७५ संशयितांना आतापर्यंत अटक झाल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

वारसा नसलेल्या मालमत्तेच्या विधेयकावरून सभागृहात काल गदरोळ झाला. वारसा नसलेल्या मालमत्ता कोणत्या निकषाच्या आधारावर तुम्ही ठरवणार, अशा मालमत्ता सरकार कशा ताब्यात घेऊ शकते, हा एकप्रकारचा जमीन हडप करण्याचा प्रकार असल्याचा आरोप विरोधी आमदारांनी केला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी वरील उत्तर दिले.

राज्यातील भू-बळकाव प्रकरणी सरकार कारवाई करीत आहे. या प्रकरणात आतापर्यंत २२ गुन्हें नोंद झाले आहेत. भू-बळाकाव प्रकरणी ७५ संशयितांना अटक झाली आहे. यात सहा सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

काही प्रकरणांमध्ये आरोपत्र न्यायालयात सादर केले असून मुख्य संशयित सुलेमान यालाही गोवा पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वीच्या सरकारने भू बळकाव प्रकरणी कारवाई केली नाही. मात्र आम्ही केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

न्यायालयात आव्हान द्या

वारसा नसलेल्या मालमत्तेबाबत विधेयक आणून आम्ही लोकांच्या जमिनी हडप करणार, असा आरोप चुकीचा आहे. सरकारला लोकांच्या जमिनी सुरक्षित ठेवायच्या असून त्यासाठी विधेयक आणले आहे. जर विधेयकाला विरोध असेल तर न्यायालयात न्यायालयात आव्हान द्यावे, असेही मुख्यमंत्र्यांनी आमदार अॅड. कार्ल्स फेरेरा यांना सुनावले.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतvidhan sabhaविधानसभा