शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
3
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
4
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
5
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
6
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
7
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
8
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
9
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
10
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
11
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
12
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
13
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
14
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
15
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
16
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
17
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
18
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
19
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
20
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर

'अटल आसरा'चे अर्ज प्रलंबित; योजनेसाठी निधीची तरतूद न केल्याबद्दल विरोधकांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 08:48 IST

अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने चालू असलेल्या या योजनेची राज्य सरकारने थट्टा चालवली असल्याची टीका आमदार विजय सरदेसाई यांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: अटल आसरा योजनेचे असंख्य अर्ज निधीची तरतूद न झाल्याने प्रलंबित असल्याची माहिती पुढे आल्याने विरोधी आमदारांनी काल समाज कल्याण खात्याच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेवेळी सरकारवर हल्लाबोल केला. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने चालू असलेल्या या योजनेची राज्य सरकारने थट्टा चालवली असल्याची घणाघाती टीका आमदार विजय सरदेसाई यांनी केली. विधानसभेत समाज कल्याण, दिव्यांग सबलीकरण, पुरातत्व व अंतर्गत जलवाहतूक खात्यांच्या अनुदान मागण्यांवरील ते बोलत होते.

सरदेसाई म्हणाले की, "दिव्यांग व्यक्तींना खाजगी संस्थांमध्ये रोजगार देण्यासाठी "मुख्यमंत्री सक्षम उद्योग योजना" जाहीर केली. या योजनेसाठी अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद केलेली नाही. शिक्षण विभागात ४१ पदे आहेत पैकी फक्त २ पदे भरली आहेत. भू नोंदणी खात्यात ७२ पदे आहेत पैकी एकही पद भरलेली नाही. आरोग्य खात्यात ३१ पदे आहेत परंतु पदे भरलेली नाहीत. दंत महाविद्यालयात ५१ पदे आहेत.

काब्रालांचाही तक्रारीचा सूर

सत्ताधारी आमदार निलेश काब्राल यांनीही तक्रारीचा सूर आळवला. आपल्या मतदारसंघात अटल आसरा योजनेचे अनेक अर्ज प्रलंबित असल्याचे ते म्हणाले. शिबिरे घेऊन अर्ज निकालात काढावेत अशी मागणी काब्राल यांनी केली.

अनेक अर्ज प्रलंबित : वीरेश

या विषयावर बोलताना आमदार वीरेश बोरकर म्हणाले की, समाज कल्याण विभागाला ५२६ कोटींचे वाटप करूनही, निधीची कमतरता आहे. अटल आसरा योजनेचे असंख्य अर्ज प्रलंबित आहेत. त्यामुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

अर्ज विनाविलंब मंजूर करा : आमदार जीत आरोलकर

दयानंद सामाजिक सुरक्षा १ योजनेचा जलदगतीने आढावा घ्यावा. अटल आसरा योजनेचे अर्ज मंजूर करण्यासाठी होणारा विलंब दूर करावा. पर्यटनासाठी हळर्ण किल्ला विकसित करावा, आदी मागण्या आमदार जीत आरोलकर यांनी विधानसभेत केल्या.

समाज कल्याण खात्यांच्या पुरातत्व, अंतर्गत जलमार्ग व अनुदान मागण्यावर ते बोलत होते. जीत म्हणाले की, "मंत्री फळदेसाई प्रशंसनीय काम करत आहेत, त्यांच्या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. त्यांना वृद्ध, अपंग आणि वंचितांचे आशीर्वाद आहेत.

कन्यादानची रक्कम वाढवा

काँग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी अपंग व्यक्तींबद्दल अद्ययावत डेटाची आवश्यकता अधोरेखित केली व मानधनात वाढ करण्याची मागणी केली. लोकांना उपयुक्त ठरणाऱ्या कन्यादान योजनेची रक्कम सरकारने ५०,००० रुपयांपर्यंत वाढवण्याची मागणी त्यांनी केली. 

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभाPoliticsराजकारण