शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

Goa Assembly Election 2022 Rahul Gandhi: पाच वर्षांपूर्वी भाजपनं चोरीनं मिळवली होती गोव्याची सत्ता; राहुल गांधींचा भाजपवर टीकेचा बाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 17:32 IST

Goa Assembly Election Latest News Rahul Gandhi: पाच वर्षांपूर्वी गोव्याच्या जनतेनं भाजपला जनमत दिलं नव्हतं, त्यांनी चोरीनं सत्ता मिळवली, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

Goa Assembly Election Latest News Rahul Gandhi: गोव्यात १४ फेब्रुवारी रोजी एकाच टप्प्यात विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदान घेतलं जाणार आहे. एकीकडे भारतीय जनता पक्ष (BJP) डबल इंजिन सरकार आणि विकास कामांचे मुद्दे घेऊन लोकांच्या समोर जात आहे, तर दुसरीकडे काँग्रेसलाही (Congress) या निवडणुकीत आपल्याला विजय मिळेल अशी अपेक्षा आहे. गोव्यातील आगामी निवडणुकांपूर्वी काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार निशाणा साधला. तसंच सत्तेत आल्यानंतर त्वरित गोव्यात स्थायी आणि कायदेशीर पद्धतीनं खाणकाम योजना सुरू केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

"यावेळी आम्हाला पूर्ण बहुमत मिळेल आणि गोव्यात काँग्रेसचेच सरकार स्थापन व्हावे यासाठी आम्ही तातडीने काम करू," असे काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी सांगितलं. गोव्यात बेरोजगारी ही मोठी समस्या बनली आहे. गोव्यातील प्रत्येक तरुणाला येथे नोकऱ्या नाहीत याची कल्पना आहे. पर्यटनाच्या स्थितीबाबतही काय झालंय हे सर्वांनाच माहीत आहे. भाजपने गोव्यात गेली पाच वर्षे जे राज्य केले, ते त्यांनी चोरीच्या माध्यमातून मिळवलं आहे. गोव्यातील जनतेला काँग्रेसला सत्तेवर आणायचे होते, मात्र भाजपने भ्रष्टाचार करून पैसे देऊन येथे सरकार स्थापन केले. भाजपने गेल्या ५ वर्षात एकही विकासकाम केले नसल्याचा आरोपही त्यांनी केला. २०१२ पूर्वी गोव्यात विकास झाला नसल्याचं भाजपनं म्हटलं पण सत्य गोव्यातील जनतेला माहीत आहे. आम्हाला गोव्यातील लोकांचा आवाज ऐकायचा आहे आणि त्यांच्या मताचा आदर करायचा आहे, असे राहुल गांधी म्हणाले. इतर पक्षातून येऊन काँग्रेसच्या नावाने जिंकणारे असे लोक आम्हाला नको आहेत असंही गोव्यातील जनतेनं सांगितल्याचं ते म्हणाले.

पंतप्रधानांच्या वक्तव्यावरही उत्तरराहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेवरही उत्तर दिलं. गोव्याला पोर्तुगीजांपासून मुक्त करण्यासाठी काँग्रेस सरकारला १५ वर्षे लागल्याचं ते म्हणाले होते. "त्यांना (पंतप्रधान) त्यावेळचा इतिहास समजत नाही," असं उत्तर त्यांनी यावेळी दिलं. बोलताना त्यांनी हिजाबच्या मुद्द्यावरही आपली प्रतिक्रिया दिली. लोकांचे लक्ष विचलित करणाऱ्या अशा संभाषणात मी सहभागी होणार नाही. माझे लक्ष त्यांच्यासाठी (लोकांसाठी) काय महत्त्वाचे आहे यावर असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी