शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

गोवा : मोलें महामार्ग चौपदरीकरणास राज्य वन्य प्राणी सल्लागार मंडळाची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 14:24 IST

राज्य वन्य प्राणी सल्लागार मंडळाने मोलें अभयारण्यातून जाणा-या 13 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्ग 4अ चौपदरीकरणास तसेच दक्षिण-मध्य रेल्वेच्या डबल ट्रेकला तत्त्वत: मंजुरी दिली आहे.

पणजी : राज्य वन्य प्राणी सल्लागार मंडळाने मोलें अभयारण्यातून जाणा-या 13 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्ग 4अ चौपदरीकरणास तसेच दक्षिण-मध्य रेल्वेच्या डबल ट्रेकला तत्त्वत: मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली. अनमोड भागातून वरील महामार्ग बेळगाव व पुढे जातो. संवर्धित वनक्षेत्राची कमीतकमी हानी करून चौपदरीकरण होत असेल तर त्याला हरकत घेण्याचे कारण नाही, असे बैठकीत ठरले.

कारण या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक आता प्रचंड वाढली आहे. चोर्ला घाटातून जाणारा दुसरा मार्गही पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील विभागातूनच जातो. तो मार्ग हलक्या वाहनांसाठी वापरता येईल , असे पर्रीकर म्हणाले. अनमोड महामागार्चे चौपदरीकरण झाल्यानंतर बरीचशी वाहतूक कोंडीची समस्या मिटणार आहे. महामागार्चे चौपदरीकरण करताना या वनक्षेत्राची कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेतली जाईल.

दरम्यान, म्हादई अभयारण्य प्रस्तावित व्याघ्र प्रकल्पाच्या बाबतीत कोणतीही चर्चा झाली नाही. म्हादई अभयारण्य हे राखीव व्याघ्र हे बनू शकते, असे २0११ मध्ये तत्कालीन केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी म्हटले होते. दुसरीकडे शेती बागायती नष्ट करणा-या वन्यप्राण्यांना उपद्रवकारी ठरविण्याच्या प्रस्तावावरही अजून काही झालेले नाही. कुठलाही वन्यप्राण्यांना ठार मारू नये, असे मत पर्रीकर यांनी व्यक्त केले. वनक्षेत्रानजीकच्या या कृषी जमिनीचे संवर्धन करण्यासाठी आधुनिक पद्धतीने कुंपण कसे घालता येईल, याबाबत सल्लामसलत केली जाईल असे पर्रीकर यांनी स्पष्ट केले. याआधी २0१६ मध्ये जानेवारी महिन्यात झालेल्या बोर्डाच्या बैठकीत कोणत्याही वन्यप्राण्याला उपद्रवकारी ठरवण्याआधी सरकारने योग्य तो अभ्यास करावा, असे ठरले होते.

वनक्षेत्रात येणा-या काही पर्यटनस्थळांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. दुधसागर धबधब्यावर पर्यटक क्षमता याबाबत अभ्यास करण्याचे ठरले. बोंडला अभयारण्य दर्जा वाढविणे , राणा वाघ आणि संध्या वाघिणीचा मृत्यू झालेला असल्याने या अभयारण्यात नवे वाघ आणणे, आदी विषयांवर चर्चा झाली. गालजीबाग-तळपण किना-यावरील कासव संवर्धन प्रकल्पाला १७ कोटी रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारने ही जमीन कासवांच्या संवर्धनासाठी संपादित केली आहे. राष्ट्रीय महामार्ग ४ ‘अ’ चा वापर बेळगांव, बंगळूरकडे जाणाºया-येणा-या प्रवाशांकडून जास्त होतो.

प्राप्त माहितीनुसार एनएच ४ अ च्या विस्तारीकरणासाठी मोले अभयारण्याची ७.९ हेक्टर जमीन जाणार आहे. महामार्ग चौपदरीकरणासाठी जेवढी जमीन वापरली जाणार आहे तेवढीच जमीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वन खात्याला द्यावी लागेल व जेवढी वृक्षतोड होईल त्याची भरपाई पर्यायी जमिनीत वनीकरणाने करावी लागेल. वनीकरणाचा सर्व खर्चही प्राधिकरणालाच करावा लागेल.  

टॅग्स :goaगोवा