शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

मुख्यमंत्र्यांकडून बेरोजगार युवकांची थट्टा, गिरीश चोडणकर यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 18:54 IST

रोजगार निर्मिती हा चर्चेचा व प्राधान्याचा विषय नाही असे विधान मुख्यमंत्र्यांनी नुकतेच केले आहे.

पणजी -  मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे अपरिपक्व अशी विधाने करत आहेत. रोजगार निर्मिती हा निवडणुकीचा विषयच होऊ शकत नाही असे विधान मुख्यमंत्र्यांनी करून पणजीतील बेरोजगार युवकांची थट्टा केली आहे. त्यांनी क्रुर विनोदच केला आहे, अशी टीका गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मंगळवारी येथे केली.

काँग्रेस हाऊसमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना चोडणकर म्हणाले, की  पणजीतील पोटनिवडणुकांमध्ये रोजगार निर्मिती हा चर्चेचा व प्राधान्याचा विषय नाही असे विधान मुख्यमंत्र्यांनी नुकतेच केले आहे. म्हणजेच रोजगार निर्मितीचा विषय हा सरकारच्या अजेंडय़ावर नाही असे सावंत म्हणतात. एवढे बेजबाबदार विधान मुख्यमंत्री पदावर असलेल्या नेत्याने तरी करू नये. पणजीत असलेली बेरोजगारीची समस्या मुख्यमंत्र्यांना दिसतच नाही. युवकांमध्ये बरीच बेरोजगारी आहे. त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती करणो हे सरकारचे प्राधान्य असायलाच हवे. पणजीत आता होत असलेल्या पोटनिवडणुकीमध्ये रोजगाराचा विषय नाही असे म्हणणो हे धक्कादायक आहे, असे चोडणकर म्हणाले.मुख्यमंत्रीपदाला त्यांचे विधान शोभत नाही. आम्ही त्यांच्या विधानाचा अतिशय तीव्र शब्दांमध्ये निषेध करतो, असेही चोडणकर म्हणाले. कारवार व कर्नाटकच्या लोकांनी गोव्यात येऊन रोजगार संधी मिळवावी असे मुख्यमंत्री म्हणतात पण पणजीतील बेरोजगारांसाठी रोजगाराची निर्मिती करायला हवी असे ते म्हणत नाही. आपण आता मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर आहोत याची जाणीवच अजून सावंत यांना झालेली नाही. मुख्यमंत्री झाल्यापासून ते अशाच प्रकारे बेजबाबदार विधाने करत आले आहेत, असेही चोडणकर म्हणाले. रोजगाराऐवजी विकास करणो एवढाच निवडणुकीत विषय असल्याचे मुख्यमंत्री सांगतात. विकास म्हणजे निधीचा वापर व भ्रष्टाचार एवढेच मुख्यमंत्र्यांना अपेक्षित आहे काय असे आपण विचारतो. कारण मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी जीएसआयडीसीवरही काम केले आहे व त्यांना विकास म्हणजे काय ते ठाऊक आहे, अशीही टीका चोडणकर यांनी केली. 

 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसPramod Sawantप्रमोद सावंत