शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

दक्षिण गोव्यासाठी अत्याधुनिक कचरा प्रक्रिया प्रकल्प काळाची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 17:07 IST

गोव्यात  सध्या कचऱ्याची समस्या बिकट बनलेली असून त्यामुळे पर्यटन क्षेत्रालाही धोका पोहचण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देगोव्यात सध्या कचऱ्याची समस्या बिकट बनलेली असून त्यामुळे पर्यटन क्षेत्रालाही धोका पोहचण्याची शक्यता आहे.दक्षिण गोव्यातील किनारपट्टी भागात पर्यटन जोमात फोफावत असून  त्या मानाने या भागात जो कचरा तयार होतो त्याची विल्हेवाट लावण्यासाठी कुठलीही प्रभावी योजना पुढे येत नाही.गोव्याची बाजारपेठ असलेल्या मडगावाला कचऱ्याच्या समस्येने ग्रासले आहे. 

सुशांत कुंकळयेकर

मडगाव - गोव्यात सध्या कचऱ्याची समस्या बिकट बनलेली असून त्यामुळे पर्यटन क्षेत्रालाही धोका पोहचण्याची शक्यता आहे. दक्षिण गोव्यातील किनारपट्टी भागात पर्यटन जोमात फोफावत असून  त्या मानाने या भागात जो कचरा तयार होतो त्याची विल्हेवाट लावण्यासाठी कुठलीही प्रभावी योजना पुढे येत नाही.

सध्या गोव्याची बाजारपेठ असलेल्या मडगावाला कचऱ्याच्या समस्येने ग्रासले आहे.  या शहरात  कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पात केवळ ओला कचरा घेणेच सुरू केल्याने दक्षिण गोव्यातील या शहरात ठिकठिकाणी कचऱ्याच्या राशी दिसू लागल्या आहेत. त्यामुळे या शहरात दुर्गंधीही पसरलेली आहे. दक्षिण गोव्यातील पर्यटन क्षेत्र याच शहराला जोडून असल्याने या ओंगळवाण्या दृश्याचा पर्यटनावरही विपरीत परिणाम होऊ लागला आहे.

दक्षिण गोव्यात मडगावला जोडून कोलवा, बाणावली, माजोर्डा,उतोर्डा, केळशी असे किनारे असून याच भागात मोठय़ा प्रमाणावर तारांकीत हॉटेलेही आहेत. या भागात देशी-विदेशी पर्यटक भेट देतात. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हा भाग पर्यटन क्षेत्र असूनही या भागातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कुठलीही तजवीज न केल्याने या भागातील पंचायतीसाठी कचरा ही डोकेदुखी बनली असून या भागातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी त्वरीत तजवीज करण्याची गरज पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांकडून केली जात आहे.

काही वर्षापूर्वी उत्तर गोव्यातील किनारपट्टी भागातही कचऱ्याची ही समस्या सतावत होती. मात्र या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गोवा घनकचरा व्यवस्थापन महामंडळातर्फे साळगाव येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आल्याने उत्तर गोव्यातील समस्येवर काही प्रमाणात उपाय निघाला आहे.  मात्र दक्षिण गोव्यात अजुनही या समस्येवर तोडगा काढलेला नाही. दक्षिण गोव्यातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या काणकोण तालुक्यातही वेगळी परिस्थिती नाही. ही गरज लक्षात घेता साळगावच्या धर्तीवर दक्षिण गोव्यासाठीही अत्याधुनिक कचरा प्रकिया प्रकल्प उभारण्याची गरज व्यक्त केली जात असून  विशेषता पर्यटन भागाची गरज लक्षात घेऊन असा प्रकल्प ही सध्या काळाची गरज बनली आहे.

 

टॅग्स :goaगोवाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न