शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडा मंत्री माणिकराव कोकटे यांना कुठल्याही क्षणी अटक होणार?; जिल्हा कोर्टाने सुनावला निकाल
2
IPL 2026 Auction : कॅमरुन ग्रीनसह BCCI ही मालामाल! ऑस्ट्रेलिन खेळाडूवर लागली रेकॉर्ड ब्रेकिंग बोली
3
"ज्यांनी तुम्हाला हिंदुत्व शिकवलं त्या बाळासाहेबांच्या कुटुंबाला..."; बाळा नांदगावकरांचा टोला
4
"मुंबईचे मारेकरी कोण? राजकीय स्वार्थासाठी मराठी माणसाला वापरले"; भाजपाचा ठाकरेंना टोला
5
निर्मला सीतारामन यांचं एक वक्तव्य आणि 'या' शेअर्सना लागले पंख; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
6
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
7
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
8
Chandrapur Farmer : किडनी वीक पण कर्ज फेड ! सावकाराच्या सांगण्यावरून शेतकऱ्याने ८ लाखांना विकली किडनी; कंबोडियात जाऊन केले ऑपेरेशन
9
निवडणुका जाहीर होताच उद्धवसेनेला धक्का; माजी नगरसेवकांचा जय महाराष्ट्र, शिंदे गटात प्रवेश
10
धक्कादायक! ७ वर्षांच्या मुलीचा तिसऱ्या मजल्यावरून पडून संशयास्पद मृत्यू, आईनेच खाली फेकल्याचा संशय  
11
“२०२९ मध्ये भाजपा विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसेल, राक्षसी महत्त्वाकांक्षा...”: रोहित पवार
12
IPL 2026 Auction : लिलावासाठी काव्या मारन नटली; सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश Look ची चर्चा रंगली
13
Marriage: लग्नात आधी वधू वरमाला का घालते? त्यामागे काय आहे धार्मिक आणि सामाजिक कारण 
14
कष्टाचं फळ! आईसोबत शेतात केली मजुरी; ८ वेळा अपयश पण खचला नाही, झाला मोठा अधिकारी
15
विराट आणि अनुष्का पुन्हा एकदा पोहचले वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे घेतले आशीर्वाद
16
"अरे मर्दा, मागे तर बघ, आम्ही बिहारहून आलोय!" Vaibhav Suryavanshi याचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
17
८ दिवसांत १८० टक्क्यांची तेजी; सातत्यानं 'या' शेअरला लागतंय अपर सर्किट, केडियांचीही आहे गुंतवणूक
18
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
19
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
20
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण गोव्यासाठी अत्याधुनिक कचरा प्रक्रिया प्रकल्प काळाची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 17:07 IST

गोव्यात  सध्या कचऱ्याची समस्या बिकट बनलेली असून त्यामुळे पर्यटन क्षेत्रालाही धोका पोहचण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देगोव्यात सध्या कचऱ्याची समस्या बिकट बनलेली असून त्यामुळे पर्यटन क्षेत्रालाही धोका पोहचण्याची शक्यता आहे.दक्षिण गोव्यातील किनारपट्टी भागात पर्यटन जोमात फोफावत असून  त्या मानाने या भागात जो कचरा तयार होतो त्याची विल्हेवाट लावण्यासाठी कुठलीही प्रभावी योजना पुढे येत नाही.गोव्याची बाजारपेठ असलेल्या मडगावाला कचऱ्याच्या समस्येने ग्रासले आहे. 

सुशांत कुंकळयेकर

मडगाव - गोव्यात सध्या कचऱ्याची समस्या बिकट बनलेली असून त्यामुळे पर्यटन क्षेत्रालाही धोका पोहचण्याची शक्यता आहे. दक्षिण गोव्यातील किनारपट्टी भागात पर्यटन जोमात फोफावत असून  त्या मानाने या भागात जो कचरा तयार होतो त्याची विल्हेवाट लावण्यासाठी कुठलीही प्रभावी योजना पुढे येत नाही.

सध्या गोव्याची बाजारपेठ असलेल्या मडगावाला कचऱ्याच्या समस्येने ग्रासले आहे.  या शहरात  कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पात केवळ ओला कचरा घेणेच सुरू केल्याने दक्षिण गोव्यातील या शहरात ठिकठिकाणी कचऱ्याच्या राशी दिसू लागल्या आहेत. त्यामुळे या शहरात दुर्गंधीही पसरलेली आहे. दक्षिण गोव्यातील पर्यटन क्षेत्र याच शहराला जोडून असल्याने या ओंगळवाण्या दृश्याचा पर्यटनावरही विपरीत परिणाम होऊ लागला आहे.

दक्षिण गोव्यात मडगावला जोडून कोलवा, बाणावली, माजोर्डा,उतोर्डा, केळशी असे किनारे असून याच भागात मोठय़ा प्रमाणावर तारांकीत हॉटेलेही आहेत. या भागात देशी-विदेशी पर्यटक भेट देतात. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हा भाग पर्यटन क्षेत्र असूनही या भागातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कुठलीही तजवीज न केल्याने या भागातील पंचायतीसाठी कचरा ही डोकेदुखी बनली असून या भागातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी त्वरीत तजवीज करण्याची गरज पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांकडून केली जात आहे.

काही वर्षापूर्वी उत्तर गोव्यातील किनारपट्टी भागातही कचऱ्याची ही समस्या सतावत होती. मात्र या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गोवा घनकचरा व्यवस्थापन महामंडळातर्फे साळगाव येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आल्याने उत्तर गोव्यातील समस्येवर काही प्रमाणात उपाय निघाला आहे.  मात्र दक्षिण गोव्यात अजुनही या समस्येवर तोडगा काढलेला नाही. दक्षिण गोव्यातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या काणकोण तालुक्यातही वेगळी परिस्थिती नाही. ही गरज लक्षात घेता साळगावच्या धर्तीवर दक्षिण गोव्यासाठीही अत्याधुनिक कचरा प्रकिया प्रकल्प उभारण्याची गरज व्यक्त केली जात असून  विशेषता पर्यटन भागाची गरज लक्षात घेऊन असा प्रकल्प ही सध्या काळाची गरज बनली आहे.

 

टॅग्स :goaगोवाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न