शहरं
Join us  
Trending Stories
1
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
2
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
3
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
4
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
5
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
6
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
7
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
8
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
9
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
10
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
11
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
12
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
13
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
14
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
15
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
16
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
17
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
18
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
19
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
20
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 

दक्षिण गोव्यासाठी अत्याधुनिक कचरा प्रक्रिया प्रकल्प काळाची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 17:07 IST

गोव्यात  सध्या कचऱ्याची समस्या बिकट बनलेली असून त्यामुळे पर्यटन क्षेत्रालाही धोका पोहचण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देगोव्यात सध्या कचऱ्याची समस्या बिकट बनलेली असून त्यामुळे पर्यटन क्षेत्रालाही धोका पोहचण्याची शक्यता आहे.दक्षिण गोव्यातील किनारपट्टी भागात पर्यटन जोमात फोफावत असून  त्या मानाने या भागात जो कचरा तयार होतो त्याची विल्हेवाट लावण्यासाठी कुठलीही प्रभावी योजना पुढे येत नाही.गोव्याची बाजारपेठ असलेल्या मडगावाला कचऱ्याच्या समस्येने ग्रासले आहे. 

सुशांत कुंकळयेकर

मडगाव - गोव्यात सध्या कचऱ्याची समस्या बिकट बनलेली असून त्यामुळे पर्यटन क्षेत्रालाही धोका पोहचण्याची शक्यता आहे. दक्षिण गोव्यातील किनारपट्टी भागात पर्यटन जोमात फोफावत असून  त्या मानाने या भागात जो कचरा तयार होतो त्याची विल्हेवाट लावण्यासाठी कुठलीही प्रभावी योजना पुढे येत नाही.

सध्या गोव्याची बाजारपेठ असलेल्या मडगावाला कचऱ्याच्या समस्येने ग्रासले आहे.  या शहरात  कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पात केवळ ओला कचरा घेणेच सुरू केल्याने दक्षिण गोव्यातील या शहरात ठिकठिकाणी कचऱ्याच्या राशी दिसू लागल्या आहेत. त्यामुळे या शहरात दुर्गंधीही पसरलेली आहे. दक्षिण गोव्यातील पर्यटन क्षेत्र याच शहराला जोडून असल्याने या ओंगळवाण्या दृश्याचा पर्यटनावरही विपरीत परिणाम होऊ लागला आहे.

दक्षिण गोव्यात मडगावला जोडून कोलवा, बाणावली, माजोर्डा,उतोर्डा, केळशी असे किनारे असून याच भागात मोठय़ा प्रमाणावर तारांकीत हॉटेलेही आहेत. या भागात देशी-विदेशी पर्यटक भेट देतात. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हा भाग पर्यटन क्षेत्र असूनही या भागातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कुठलीही तजवीज न केल्याने या भागातील पंचायतीसाठी कचरा ही डोकेदुखी बनली असून या भागातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी त्वरीत तजवीज करण्याची गरज पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांकडून केली जात आहे.

काही वर्षापूर्वी उत्तर गोव्यातील किनारपट्टी भागातही कचऱ्याची ही समस्या सतावत होती. मात्र या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गोवा घनकचरा व्यवस्थापन महामंडळातर्फे साळगाव येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आल्याने उत्तर गोव्यातील समस्येवर काही प्रमाणात उपाय निघाला आहे.  मात्र दक्षिण गोव्यात अजुनही या समस्येवर तोडगा काढलेला नाही. दक्षिण गोव्यातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या काणकोण तालुक्यातही वेगळी परिस्थिती नाही. ही गरज लक्षात घेता साळगावच्या धर्तीवर दक्षिण गोव्यासाठीही अत्याधुनिक कचरा प्रकिया प्रकल्प उभारण्याची गरज व्यक्त केली जात असून  विशेषता पर्यटन भागाची गरज लक्षात घेऊन असा प्रकल्प ही सध्या काळाची गरज बनली आहे.

 

टॅग्स :goaगोवाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न