शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

अर्थसंकल्पात फसवे आकडे; सरकारकडे पैसा असताना कर्जे काढण्याची गरजच काय? सरदेसाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2024 10:43 IST

सरकार कर्जे घेत सुटले आहे, अशी टीका सरदेसाई यांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: अर्थसंकल्पात खोटी आणि फसवी आकडेवारी दिलेली आहे. सरकारच्या हातात पैसा असताना कर्जे काढण्याची गरजच का पडली? असा संतप्त सवाल विरोधी आमदार गोवा फॉरवर्ड चे विजय सरदेसाई यांनी केला. विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेच्या वेळी सरदेसाई यांनी सरकारचे वाभाडे काढले.

सरकार कर्जे घेत सुटले आहे, अशी टीका सरदेसाई यांनी केली. ते म्हणाले की, दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत फसवी, गुलाबी चित्रे उभी केली जात आहेत. दरडोई उत्पन्न ७.६४ लाख रुपयांवर पोहोचेल हे कुठल्या आधारावर सांगता? असा प्रश्न त्यांनी केला. गोवा मुक्तीला ६० वर्षे झाली. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ३०० कोटी जाहीर केले होते पैकी १५० कोटी रुपये अद्याप मिळालेले नाही. त राज्य सरकार हे पैसे केंद्राकडून आणण्यात अपयशी ठरले आहे, अशी टीका त्यांनी केली.

सरदेसाई म्हणाले की, गोव्याच्या उद्योगांमध्ये ४३ हजार ७४० गोवेकर आणि ८० हजार ५८८ परप्रांतीय आहे. त गोव्यातील बेरोजगारीचे प्रमाण ९.७ टक्के आहे. हे सरकार २०४७ साली विकसित गोव्याच्या गोष्टी करत आहे. त्यावेळी बेरोजगारीचे प्रमाण किती असेल याची कल्पनाच न केलेली बरी. ते म्हणाले की, 'हॅलो गोयकर, 'मंत्री तुमच्या दारी', 'सरकार तुमच्या दारी, उपक्रम बंद करा. तुम्हाला या कार्यक्रमांदरम्यान ३६० तक्रारी देखील प्राप्त झालेल्या नाहीत. सरकारच्या तक्रार पोर्टलवर ३,५०० तक्रारी आल्या आहेत. तेथे अधिक लक्ष द्या. सरकार दंत महाविद्यालयाचा विस्तार करत आहे, ही चांगली गोष्ट आहे. परंतु जिल्हा रुग्णालये आणि उप आरोग्य केंद्रांमध्ये दंत चिकित्सालयांचाही विस्तार करण्याची गरज आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा मधील स्वयंसेवकांना अजून सरकारने पैसे दिलेले नाहीत. खेळाडू प्रशिक्षक यांना प्रमाणपत्र मिळालेली नाहीत. बक्षिसांची रक्कमही दिलेली नाही, अशी टीका त्यांनी केली.

एजंटांचा सुळसुळाट

केंद्र सरकारकडून प्रकल्प मंजूर करून आणण्यासाठी कन्सल्टंटला तीन टक्के कमिशन दिले जाते. त्यातील दोन वाटा काहीजणांना जातो, असा आरोपही सरदेसाई यांनी केला. हे सरकार एजंट चालवत आहेत. सरकारी कार्यालयांमध्ये एजंटांचा सुळसुळाट झाला आहे हे सत्ताधारी आमदाराने दाखवून दिले आहे त्याची गंभीर दखल सरकारने घ्यायला हवी, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांची कोपरखळी !

विजय सरदेसाई जवळपास विरोधी पक्षनेते झाल्यासारखेच आहेत अशी कोपरखळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मारली. त्यावर सरदेसाई यांची प्रतिक्रिया 'मी वन- मॅन आर्मी आहे', अशी होती.

'प्रवाह'चा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर करणार : मुख्यमंत्री

म्हादईच्या बाबतीत प्रवाह प्राधिक- रणाच्या अधिकाऱ्यांनी तयार केलेला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला जाईल. साधारणपणे ऑगस्ट महिन्यात सुप्रीम कोर्टात या प्रकरणी पुढील तारीख मिळू शकते, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सभागृहात स्पष्ट केले. विजय सरदेसाई यांनी म्हादईच्या बाबतीत सरकार गंभीर नसल्याचा आरोप केला होता त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे भाष्य केले.

या आर्थिक वर्षात साडेचार हजार कोटी रुपयांपर्यंत कर्ज घेण्याची मर्यादा सरकारला आहे. परंतु आम्ही एप्रिल ते जुलै या कालावधीत एकही पैसा कर्ज घेतलेला नाही. - प्रमोद सावंत, मुख्यमंत्री. 

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभाVidhan Bhavanविधान भवन