शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

अर्थसंकल्पात फसवे आकडे; सरकारकडे पैसा असताना कर्जे काढण्याची गरजच काय? सरदेसाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2024 10:43 IST

सरकार कर्जे घेत सुटले आहे, अशी टीका सरदेसाई यांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: अर्थसंकल्पात खोटी आणि फसवी आकडेवारी दिलेली आहे. सरकारच्या हातात पैसा असताना कर्जे काढण्याची गरजच का पडली? असा संतप्त सवाल विरोधी आमदार गोवा फॉरवर्ड चे विजय सरदेसाई यांनी केला. विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेच्या वेळी सरदेसाई यांनी सरकारचे वाभाडे काढले.

सरकार कर्जे घेत सुटले आहे, अशी टीका सरदेसाई यांनी केली. ते म्हणाले की, दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत फसवी, गुलाबी चित्रे उभी केली जात आहेत. दरडोई उत्पन्न ७.६४ लाख रुपयांवर पोहोचेल हे कुठल्या आधारावर सांगता? असा प्रश्न त्यांनी केला. गोवा मुक्तीला ६० वर्षे झाली. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ३०० कोटी जाहीर केले होते पैकी १५० कोटी रुपये अद्याप मिळालेले नाही. त राज्य सरकार हे पैसे केंद्राकडून आणण्यात अपयशी ठरले आहे, अशी टीका त्यांनी केली.

सरदेसाई म्हणाले की, गोव्याच्या उद्योगांमध्ये ४३ हजार ७४० गोवेकर आणि ८० हजार ५८८ परप्रांतीय आहे. त गोव्यातील बेरोजगारीचे प्रमाण ९.७ टक्के आहे. हे सरकार २०४७ साली विकसित गोव्याच्या गोष्टी करत आहे. त्यावेळी बेरोजगारीचे प्रमाण किती असेल याची कल्पनाच न केलेली बरी. ते म्हणाले की, 'हॅलो गोयकर, 'मंत्री तुमच्या दारी', 'सरकार तुमच्या दारी, उपक्रम बंद करा. तुम्हाला या कार्यक्रमांदरम्यान ३६० तक्रारी देखील प्राप्त झालेल्या नाहीत. सरकारच्या तक्रार पोर्टलवर ३,५०० तक्रारी आल्या आहेत. तेथे अधिक लक्ष द्या. सरकार दंत महाविद्यालयाचा विस्तार करत आहे, ही चांगली गोष्ट आहे. परंतु जिल्हा रुग्णालये आणि उप आरोग्य केंद्रांमध्ये दंत चिकित्सालयांचाही विस्तार करण्याची गरज आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा मधील स्वयंसेवकांना अजून सरकारने पैसे दिलेले नाहीत. खेळाडू प्रशिक्षक यांना प्रमाणपत्र मिळालेली नाहीत. बक्षिसांची रक्कमही दिलेली नाही, अशी टीका त्यांनी केली.

एजंटांचा सुळसुळाट

केंद्र सरकारकडून प्रकल्प मंजूर करून आणण्यासाठी कन्सल्टंटला तीन टक्के कमिशन दिले जाते. त्यातील दोन वाटा काहीजणांना जातो, असा आरोपही सरदेसाई यांनी केला. हे सरकार एजंट चालवत आहेत. सरकारी कार्यालयांमध्ये एजंटांचा सुळसुळाट झाला आहे हे सत्ताधारी आमदाराने दाखवून दिले आहे त्याची गंभीर दखल सरकारने घ्यायला हवी, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांची कोपरखळी !

विजय सरदेसाई जवळपास विरोधी पक्षनेते झाल्यासारखेच आहेत अशी कोपरखळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मारली. त्यावर सरदेसाई यांची प्रतिक्रिया 'मी वन- मॅन आर्मी आहे', अशी होती.

'प्रवाह'चा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर करणार : मुख्यमंत्री

म्हादईच्या बाबतीत प्रवाह प्राधिक- रणाच्या अधिकाऱ्यांनी तयार केलेला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला जाईल. साधारणपणे ऑगस्ट महिन्यात सुप्रीम कोर्टात या प्रकरणी पुढील तारीख मिळू शकते, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सभागृहात स्पष्ट केले. विजय सरदेसाई यांनी म्हादईच्या बाबतीत सरकार गंभीर नसल्याचा आरोप केला होता त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे भाष्य केले.

या आर्थिक वर्षात साडेचार हजार कोटी रुपयांपर्यंत कर्ज घेण्याची मर्यादा सरकारला आहे. परंतु आम्ही एप्रिल ते जुलै या कालावधीत एकही पैसा कर्ज घेतलेला नाही. - प्रमोद सावंत, मुख्यमंत्री. 

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभाVidhan Bhavanविधान भवन