शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

...त्यामुळे 'बाशिंग' वाले वाढले; भाजपमध्ये नेत्यांकडून दुर्लक्ष झाल्याचा पार्सेकरांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 15:02 IST

आगामी लोकसभा निवडणुकीत आपली भूमिका काय असेल?

लोकमत न्यूज नेटवर्क, हरमल : भाजपमध्ये सध्या अनेक जण बाशिंग बांधून तयार असल्याचे चित्र आहे. आपल्याला विधानसभा, लोकसभा किंवा अन्य निवडणुकांत उमेदवारी मिळावी, असा त्यांचा आग्रह आहे. अशा अतृप्त आत्म्यांना शांत करण्यासाठी पक्षात योग्य माणसे नाहीत, किंबहुना प्रत्येक जण आपापल्या व्यापात गुंतले आहेत, याची खंत वाटते. यासाठीच शून्यातून पक्षाची उभारणी केली होती का? असा सवाल माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीसाठी मी यत्किंचितही विचार करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आगामी लोकसभा निवडणुकीत आपली भूमिका काय असेल? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता पार्सेकर म्हणाले की, 'भाजपला मी नको होतो, म्हणून पक्ष सोडून बाहेर पडलो. पक्षाने माझे अवमूल्यन केले होते. मी पक्षावर नाराज नसून, पक्ष चालविणाऱ्या व्यक्तींकडून हेतुपुरस्सर हा निर्णय घेतला गेला. त्यामुळे मी नाराज झालो होते. आता पक्षाकडून ऑफर आल्यास मी अवश्य विचार करेन.'

पार्सेकर म्हणाले की, 'काही जण मी ज्येष्ठ झाल्याचे सांगतात. मात्र, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रांत मी कार्यरत आहे, कार्यक्षम आहे. मी आपली बुद्धी आणि आरोग्य शाबूत ठेवले आहे. लोकसभेसाठी मी इच्छुक नाही. राज्यातच, गोमंतकीय जनतेसाठी कार्य करण्याचे माझे प्रयत्न आहेत.'

पार्सेकर म्हणाले की, 'भाजप रुजवण्यात आम्ही अवघ्या नेत्यांसोबत काम केले. पक्ष वाढला. मोठा झाला. मात्र, गेल्या निवडणुकीत पक्षाने 'निवडून येण्याची क्षमता' हा निकष लावला. त्यामुळे त्यावेळी योग्य निर्णय घेण्याची वेळ आली. पक्षाने अन्याय केल्याची चीड होती. खुमखुमी झाली व मी निवडणुकीस सामोरे गेलो. निवडणुकीसाठी माझ्याकडे कोट्यवधी रुपये नव्हते किंवा भाजपच्या उमेदवाराचा पराभव करणे हा मुद्दा नव्हता. मला किती लोकांचे समर्थन आहे, याचे उत्तर देऊ शकलो. जिंकणे या निकषाला प्रत्युत्तर दिले याचे समाधान वाटते.'

ऑफर धुडकावल्या...

'गेल्या निवडणुकीत माझ्यामुळे भाजपाचा उमेदवार पडला याचे दुःख आहे. मात्र, पक्षाच्या धुरिणांनी चुकीचा निर्णय घेतला होता. पक्ष रुजवणारी व्यक्ती असताना मला डावलले याचे दुःख आहे. मी भाजप सोडला. त्याचवेळी आलेल्या मोठमोठ्या ऑफर धुडकावून लावल्या होत्या, असेही पार्सेकर म्हणाले.

ती मला संधी आत्मपरीक्षणाची

पार्सेकर म्हणाले की, 'मुख्यमंत्री पदावर असताना, २०१७ च्या निवडणुकीत मी पराभव चाखला. त्याची कारणे मी त्यावेळी सांगितली होती. आता पुन्हा तसे घडणार नाही. त्या पराभवामुळे आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळाली, पुन्हा निवडून आल्यावरच मनाला संतुष्टी मिळेल.

भाऊ सज्जन व्यक्ती

'आता लोकसभा निवडणुका तोंडावर आहे. केंद्रीय मंत्री श्रीपादभाऊ नाईक ही राजकारणातील सज्जन व्यक्ती आहे. त्यांनी कसलेही गैरकृत्य केलेले नाही. चांगली व्यक्ती निवडून यायला हवी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी पाच वर्षे पंतप्रधानपद भूषवावे, असे माझे मत आहे,' असे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणाले. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा