शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
2
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
3
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
4
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
5
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
6
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
7
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
8
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
9
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
10
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
11
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
12
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
13
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
14
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
15
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
16
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
17
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
18
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
19
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
20
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
Daily Top 2Weekly Top 5

फॉर्मेलिनयुक्त मासळीबाबत गोव्यात भीती कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 21:41 IST

गोव्यात मिळणारी मासळी राज्याची गरज भागवण्यास अपुरी असता मासळी आयातीवर बंदी घातल्यास लोकांच्या आवडीच्या व पसंतीच्या अन्नाबाबत ‘दुष्काळ’ निर्माण होईल

राजू नायक

गोव्यात मिळणारी मासळी राज्याची गरज भागवण्यास अपुरी असता मासळी आयातीवर बंदी घातल्यास लोकांच्या आवडीच्या व पसंतीच्या अन्नाबाबत ‘दुष्काळ’ निर्माण होईल अशी भीती निर्माण झाली आहे. कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी यापूर्वीच राज्यात ‘फॉर्मेलिन’ वापरामुळे निर्माण झालेली भीती नाहीशी होईपर्यंत मासळीच्या आयातीवर बंदी लागू करण्याची मागणी केली असून आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी राज्यातील मासळी आयात ‘इन्सुलेटेड’ वाहनांमधूनच होऊ द्यावी, असे म्हटले आहे. सरकार मात्र त्याबाबत कोणतीही भूमिका स्वीकारण्याच्या मन:स्थितीत नाही. मासळीवर बंदी कधी लागू करावी व फॉर्मेलिनवर नियंत्रण कसे ठेवावे, यावर सरकारला निर्णय घेता आलेला नाही.

 

वाचकांना माहीत असेलच की मडगाव शहर- जे मासळीच्या घाऊक आयातीसाठी प्रसिद्ध आहे, तेथे तीन महिन्यांपूर्वी मासळीत फॉर्मेलिनचे अंश सापडल्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ निर्माण झाली होती, ती अजून कायम आहे. फॉर्मेलिन हे रसायन मानवी शरीर जतन करण्यासाठी वापरले जाते व त्या रसायनाच्या सेवनाने कर्करोग होऊ शकतो. फॉर्मेलिनचा वापर मासळी जतन करण्यासाठी केला जात असल्याच्या वृत्तामुळे गोव्यात अनेकांनी मासळी खाणेच सोडून दिले असून बाजारपेठेतही कमी उपस्थिती असते.

 

गेल्या आठवड्यात वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी राज्याला भेट देऊन मासळीची तपासणी करण्यासाठी मडगाव येथे एक आधुनिक प्रयोगशाळा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु त्यासाठी काही अवधी जावा लागणार असून तोपर्यंत आयात संपूर्णत: थांबवावी असे सरदेसाई यांना वाटते. ‘‘लोकांमध्ये विश्वास निर्माण होईर्पयत बाहेरील मासळी बंद करावी,’’ असे ते म्हणाले. एक गोष्ट स्पष्ट आहे की राज्यातील मासळीचे अन्नातील मोठे प्रमाण व पर्यटन व्यवसाय यामुळे गेल्या काही वर्षात मासळीची आयात दुप्पट झाली असून काही व्यापारी निकृष्ट दर्जाचीही मासळी गोव्यात आणीत असल्याचा अंदाज आहे. राज्यात हल्ली कर्करोगाचेही प्रमाण भयानक पातळीवर गेले आहे. त्यामुळेच फॉर्मेलिनच्या प्रश्नावर जनतेमध्ये कमालीचा असंतोष आहे. ज्या मासळीसाठी लोक अव्वाच्या सव्वा दर देतात व जे आमच्या अन्नातील महत्त्वाचा भाग आहे ते दर्जेदार असलेच पाहिजे असे लोक मानतात. सरकारवरही असे दर्जेदार व ताजे मासे पुरविले जाण्यासाठी दबाव वाढत असून सरकारने या बाबतीत हयगय केली तर लोकांचा सरकारवरचा अविश्वास आणखी वाढू शकतो. प्रसार माध्यमांनी तर फॉर्मेलिन प्रकरणात सरकारवर आसूड ओढण्याची कोणतीही संधी गमावलेली नाही.

सबसिडी घेऊनही दर्जेदार मासळीची निर्यातराज्य सरकारचे मच्छीमार खाते मासळी उत्पादन वाढावे यासाठी वर्षाकाठी सबसिडीसाठी १०८ कोटी रुपये खर्च करीत असून त्यातील ८३ कोटी रुपये ट्रॉलरांना डिझेल व इतर पायाभूत यंत्रणेसाठी देत असते. परंतु राज्यातील मासळी उत्पादन कमी होत आहे. २०१४ मध्ये गोव्यात पकडलेली मासळी १२८. १०७ टन होती, ती २०१५ मध्ये १०८. २४ टन बनली व २०१५ मध्ये ती आणखी कमी होऊन १०१. ०५३ टन बनली. परंतु २०१७ मध्ये मात्र त्यात १५ टक्के वाढ झाल्याचे सांगण्यात आले. दुर्दैवाने गोव्यातून ४० टक्के मासळी निर्यात केली जात असल्याने दर्जेदार  व ताज्या मासळीपासून गोवेकरांना मुकावे लागते. २०१६मध्ये गोव्यातून ३८. २०९ टन मासळी निर्यात झाली होती. मासळीचे निर्यातीचे प्रमाण वाढल्यामुळे मच्छीमारमंत्री विनोद पालयेकर यांनी सबसिडीचा पुनर्विचार करण्याचा इशारा दिला होता; परंतु प्रबळ मच्छीमार लॉबीमुळे त्यांना आपला शब्द पाळता आलेला नाही, अशी टीका होते. 

टॅग्स :goaगोवाfishermanमच्छीमारministerमंत्री