शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
4
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
5
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
6
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
7
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
8
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
10
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
11
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
12
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
14
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
15
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
16
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
17
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
18
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
19
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
20
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी

सध्या तरी मगो पक्षातच: जीत आरोलकर; भाजपच्या वक्तव्यावर सावध प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 07:53 IST

सर्वसामान्यांपर्यंत विकास पोहोचविण्यावर भर देण्यासाठी प्रयत्नशील

लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : मगो पक्षाच्या चिन्हावर निवडून आलो आहे. मगो सरकारचा घटकपक्ष आहे आणि मी सध्या तरी मगो पक्षातच आहे. निवडणुकीला अजून बराच कालावधी आहे. या काळात काहीही होऊ शकते. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असे मगोचे मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मांद्रे येथील भाजप मेळाव्यात पक्षाध्यक्ष दामू नाईक यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत मांद्रे मतदारसंघ भाजपतर्फेच लढू अशा प्रकारचे वक्तव्य केले होते. त्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आमदार आरोलकर यांनी वरील माहिती दिली. विधानसभा निवडणूक २०२७ मध्ये होणार आहेत. दरम्यानच्या काळात काय होईल, हे सांगता येत नाही; कारण कुठलीही गोष्ट शाश्वत नसते. परिवर्तन हा जगाचा नियम आहे. पुढे काय बदल होतील अथवा होऊ घातले आहेत, हे आताच सांगू शकत नाही. दोन वर्षांत मांद्रे मतदारसंघात जास्तीत जास्त विकासकामे कशी होतील याकडे सध्या तरी मी लक्ष पुरविणार आहे. सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेकडे कसे पोहोचता येईल; त्यांना कशी मदत करता येईल, याचा आम्ही विचार करू. समांतरपणे आपल्या पक्षाचे कामही करणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक पक्षनेतृत्व आपापले काम करीत राहील, असे मला वाटते, असेही आमदार आरोलकर यावेळी बोलताना म्हणाले.

पोटनिवडणुकीपासून कार्यकर्तेच माझ्याबद्दल काय तो निर्णय घेत आले आहेत. सध्या तरी मी मगो पक्षातच आहे. पुढे काय करायचं याचा निर्णय कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच घेतला जाईल, असेही त्यांनी शेवटी सांगितले.

इतर पक्षनेत्यांनी भाजपकडून शिकावे

आमदार आरोलकर म्हणाले, मगो पक्षाची युती भाजपशी आहे. आम्ही त्यांच्याबरोबर सत्तेचे वाटेकरी आहोत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा विकास होत आहे. मांद्रे मतदारसंघावर मुख्यमंत्र्यांचे खास लक्ष आहे. आमचेही त्यांच्याशी घनिष्ट संबंध आहेत. काल पक्षाध्यक्षांनी केलेले वक्तव्य त्यांच्या पक्षाशी निगडित आहे. प्रत्येकाला आपल्या पक्षाचा अभिमान असायलाच हवा. इतर पक्षनेत्यांनीही भाजपकडून शिकण्याची गरज आहे. कोणत्याही पक्षाने सतत आपल्या कार्यकर्त्यांशी संपर्कात असायला हवे. त्यांचे मनोबल वाढवायला हवे. भाजपने बुधवारच्या मेळाव्यात ते केले आहे. आपली मते टिकून ठेवण्याबरोबरच मताधिक्य वाढविण्याची गरज आहे.

'त्यात गैर काय?'

काल मेळाव्यात आपलाच पक्ष मांद्रेत जिंकेल, असा विश्वास पक्षनेतृत्वाने व्यक्त केला. तसे व्यक्त होणे साहजिक आहे. सत्तेवर आपलाच पक्ष यावा, हे स्वप्न बाळगणे अजिबात चुकीचे नाही, असे सांगून आरोलकर म्हणाले, मगो पक्षालाही तसे वाटणे साहजिक आहे. प्रत्येकाला असेच वाटते की, आपला पक्ष बहुमताने पुढे यावा. कालचीही घोषणा त्यातूनच झाली. त्यांनाही वाटते की, मांद्रेत कमळ फुलले त्यात गैर काय? असा सवालही त्यांनी केला.

मात्र मतदानाच्या अंतिम क्षणापर्यंत मतदार निर्णय घेत असतो. कुणाबरोबर जावे, कुणाला मतदान करावे. त्याप्रमाणे कुठे जावे, कुणाबरोबर राहावे याचा योग्य निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. प्रत्येकाने आपला पाया मजबूत करायला हवा. विकासकामे करायला हवीत. तसे झाल्यास आपण निश्चितच निवडून येऊ शकतो. मग कोणताही पक्ष अशा उमेदवाराचा विचार करील, असेही आरोलकर यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण