शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
2
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
3
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
4
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
5
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
6
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
7
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
8
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
9
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
10
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
11
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
12
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
13
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
14
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
15
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
16
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
17
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
18
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
19
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...

सध्या तरी मगो पक्षातच: जीत आरोलकर; भाजपच्या वक्तव्यावर सावध प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 07:53 IST

सर्वसामान्यांपर्यंत विकास पोहोचविण्यावर भर देण्यासाठी प्रयत्नशील

लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : मगो पक्षाच्या चिन्हावर निवडून आलो आहे. मगो सरकारचा घटकपक्ष आहे आणि मी सध्या तरी मगो पक्षातच आहे. निवडणुकीला अजून बराच कालावधी आहे. या काळात काहीही होऊ शकते. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असे मगोचे मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मांद्रे येथील भाजप मेळाव्यात पक्षाध्यक्ष दामू नाईक यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत मांद्रे मतदारसंघ भाजपतर्फेच लढू अशा प्रकारचे वक्तव्य केले होते. त्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आमदार आरोलकर यांनी वरील माहिती दिली. विधानसभा निवडणूक २०२७ मध्ये होणार आहेत. दरम्यानच्या काळात काय होईल, हे सांगता येत नाही; कारण कुठलीही गोष्ट शाश्वत नसते. परिवर्तन हा जगाचा नियम आहे. पुढे काय बदल होतील अथवा होऊ घातले आहेत, हे आताच सांगू शकत नाही. दोन वर्षांत मांद्रे मतदारसंघात जास्तीत जास्त विकासकामे कशी होतील याकडे सध्या तरी मी लक्ष पुरविणार आहे. सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेकडे कसे पोहोचता येईल; त्यांना कशी मदत करता येईल, याचा आम्ही विचार करू. समांतरपणे आपल्या पक्षाचे कामही करणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक पक्षनेतृत्व आपापले काम करीत राहील, असे मला वाटते, असेही आमदार आरोलकर यावेळी बोलताना म्हणाले.

पोटनिवडणुकीपासून कार्यकर्तेच माझ्याबद्दल काय तो निर्णय घेत आले आहेत. सध्या तरी मी मगो पक्षातच आहे. पुढे काय करायचं याचा निर्णय कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच घेतला जाईल, असेही त्यांनी शेवटी सांगितले.

इतर पक्षनेत्यांनी भाजपकडून शिकावे

आमदार आरोलकर म्हणाले, मगो पक्षाची युती भाजपशी आहे. आम्ही त्यांच्याबरोबर सत्तेचे वाटेकरी आहोत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा विकास होत आहे. मांद्रे मतदारसंघावर मुख्यमंत्र्यांचे खास लक्ष आहे. आमचेही त्यांच्याशी घनिष्ट संबंध आहेत. काल पक्षाध्यक्षांनी केलेले वक्तव्य त्यांच्या पक्षाशी निगडित आहे. प्रत्येकाला आपल्या पक्षाचा अभिमान असायलाच हवा. इतर पक्षनेत्यांनीही भाजपकडून शिकण्याची गरज आहे. कोणत्याही पक्षाने सतत आपल्या कार्यकर्त्यांशी संपर्कात असायला हवे. त्यांचे मनोबल वाढवायला हवे. भाजपने बुधवारच्या मेळाव्यात ते केले आहे. आपली मते टिकून ठेवण्याबरोबरच मताधिक्य वाढविण्याची गरज आहे.

'त्यात गैर काय?'

काल मेळाव्यात आपलाच पक्ष मांद्रेत जिंकेल, असा विश्वास पक्षनेतृत्वाने व्यक्त केला. तसे व्यक्त होणे साहजिक आहे. सत्तेवर आपलाच पक्ष यावा, हे स्वप्न बाळगणे अजिबात चुकीचे नाही, असे सांगून आरोलकर म्हणाले, मगो पक्षालाही तसे वाटणे साहजिक आहे. प्रत्येकाला असेच वाटते की, आपला पक्ष बहुमताने पुढे यावा. कालचीही घोषणा त्यातूनच झाली. त्यांनाही वाटते की, मांद्रेत कमळ फुलले त्यात गैर काय? असा सवालही त्यांनी केला.

मात्र मतदानाच्या अंतिम क्षणापर्यंत मतदार निर्णय घेत असतो. कुणाबरोबर जावे, कुणाला मतदान करावे. त्याप्रमाणे कुठे जावे, कुणाबरोबर राहावे याचा योग्य निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. प्रत्येकाने आपला पाया मजबूत करायला हवा. विकासकामे करायला हवीत. तसे झाल्यास आपण निश्चितच निवडून येऊ शकतो. मग कोणताही पक्ष अशा उमेदवाराचा विचार करील, असेही आरोलकर यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण