शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

बांगड्यांची आवक वाढली, पणजीतील मासळी बाजारात खरेदीसाठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 12:23 IST

राज्यात मासेमारी सुरू झाल्याने बुधवारपासून मासळी मार्केटमध्ये मासे विक्रीस येऊ लागले.

पणजी : समुद्रातून मासळीचे ट्रॉलर्स परतल्यामुळे बाजारात मासळीची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्याने माशांचे दर झटकन उतरले आहेत. दोनशे रुपयांना पाच मिळणारे बांगडे आता आठ ते दहा नग अशा स्वरुपात विकले जात आहेत. त्यामुळे खरेदीदारांचीही गर्दी बाजारात दिसू लागली आहे. 

राज्यात मासेमारी सुरू झाल्याने बुधवारपासून मासळी मार्केटमध्ये मासे विक्रीस येऊ लागले. मात्र, खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या ट्रॉलर्स बुधवारी मध्यरात्री तसेच गुरुवारी पहाटे परतल्याने बाजारात मासळीची आवक वाढली. राजधानीच्या मासळी बाजारात वास्कोतील जेटीवरून मासळी दाखल झाली असून यात बांगड्याची आवक मोठी झालेली दिसून आली. स्वस्त झालेली मासळी खरेदी करणाऱ्या ग्राहकांची गर्दी दिसून आली. फार्मोलीनयुक्त मासळीच्या प्रकरणानंतर राज्य सरकारने राज्यात आयात होणाऱ्या मासळीवर पूर्णत: बंदी घातली होती. त्यामुळे गेली दहा-बारा दिवस मासळीचा बाजार ओस पडल्यासारखा दिसत होता. 

1 ऑगस्टपासून मासेमारी सुरू झाल्याने स्थानिक मच्छीमार मासळी बाजारात विक्रीस पाठवू लागले आहेत. सध्या बाजारात बांगडे, सुंगटे, लेपो आणि मुंडुशे माशांची आवक झालेली दिसत आहे. त्यात बांगड्यांची आणि सुंगट्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने त्याचा परिणाम दरावर झाला आहे. मासेमारी बंदीच्या काळात बांगडे दोनशे रुपयांना पाच असे विकले जात होते आता त्याठिकाणी 200 रुपयांना आठ ते दहा नग असे विकले जात आहेत. त्यासचबरोबर सुंगट्याचा ढिग 200 रुपयांना दिला जात होता, त्याऐवजी आता 200 ते 300 रुपये किलो अशा दरात सुंगट्यांची विक्री सुरू आहे. सुंगटे मोठ्या प्रमाणात आले आहेत, त्यामुळे ग्राहकांना खरेदीत मोठी चॉईस राहिली आहे. काहीजण बांगडे, सुंगटे आणि लेपो एकत्रितरित्या खरेदी करत असल्याने आम्ही दरही कमी करून त्यांना देतो. इतरवेळी फक्त सुंगटे खरेदी करणार असेल तर त्याला 300 रुपये किंवा 250 रुपये किलोने विकत असल्याची माहिती एका महिला विक्रेत्यांनी दिली. 

मासळीचे दर

बांगडे - 200 रुपयांना 10 नगसुंगटे - 250 ते 300 रुपये किलोमुंडुशे - 300 रुपये 8 ते 10 (आकारमानानुसार) लेपो - 300 रुपये किलो.

टॅग्स :goaगोवा