शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

बांगड्यांची आवक वाढली, पणजीतील मासळी बाजारात खरेदीसाठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 12:23 IST

राज्यात मासेमारी सुरू झाल्याने बुधवारपासून मासळी मार्केटमध्ये मासे विक्रीस येऊ लागले.

पणजी : समुद्रातून मासळीचे ट्रॉलर्स परतल्यामुळे बाजारात मासळीची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्याने माशांचे दर झटकन उतरले आहेत. दोनशे रुपयांना पाच मिळणारे बांगडे आता आठ ते दहा नग अशा स्वरुपात विकले जात आहेत. त्यामुळे खरेदीदारांचीही गर्दी बाजारात दिसू लागली आहे. 

राज्यात मासेमारी सुरू झाल्याने बुधवारपासून मासळी मार्केटमध्ये मासे विक्रीस येऊ लागले. मात्र, खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या ट्रॉलर्स बुधवारी मध्यरात्री तसेच गुरुवारी पहाटे परतल्याने बाजारात मासळीची आवक वाढली. राजधानीच्या मासळी बाजारात वास्कोतील जेटीवरून मासळी दाखल झाली असून यात बांगड्याची आवक मोठी झालेली दिसून आली. स्वस्त झालेली मासळी खरेदी करणाऱ्या ग्राहकांची गर्दी दिसून आली. फार्मोलीनयुक्त मासळीच्या प्रकरणानंतर राज्य सरकारने राज्यात आयात होणाऱ्या मासळीवर पूर्णत: बंदी घातली होती. त्यामुळे गेली दहा-बारा दिवस मासळीचा बाजार ओस पडल्यासारखा दिसत होता. 

1 ऑगस्टपासून मासेमारी सुरू झाल्याने स्थानिक मच्छीमार मासळी बाजारात विक्रीस पाठवू लागले आहेत. सध्या बाजारात बांगडे, सुंगटे, लेपो आणि मुंडुशे माशांची आवक झालेली दिसत आहे. त्यात बांगड्यांची आणि सुंगट्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने त्याचा परिणाम दरावर झाला आहे. मासेमारी बंदीच्या काळात बांगडे दोनशे रुपयांना पाच असे विकले जात होते आता त्याठिकाणी 200 रुपयांना आठ ते दहा नग असे विकले जात आहेत. त्यासचबरोबर सुंगट्याचा ढिग 200 रुपयांना दिला जात होता, त्याऐवजी आता 200 ते 300 रुपये किलो अशा दरात सुंगट्यांची विक्री सुरू आहे. सुंगटे मोठ्या प्रमाणात आले आहेत, त्यामुळे ग्राहकांना खरेदीत मोठी चॉईस राहिली आहे. काहीजण बांगडे, सुंगटे आणि लेपो एकत्रितरित्या खरेदी करत असल्याने आम्ही दरही कमी करून त्यांना देतो. इतरवेळी फक्त सुंगटे खरेदी करणार असेल तर त्याला 300 रुपये किंवा 250 रुपये किलोने विकत असल्याची माहिती एका महिला विक्रेत्यांनी दिली. 

मासळीचे दर

बांगडे - 200 रुपयांना 10 नगसुंगटे - 250 ते 300 रुपये किलोमुंडुशे - 300 रुपये 8 ते 10 (आकारमानानुसार) लेपो - 300 रुपये किलो.

टॅग्स :goaगोवा