शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

म्हापसा अर्बन बँकेवर आर्थिक निर्बंध, भागधारक चिंताग्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 12:15 IST

म्हापसा अर्बन बँकेवर लागू केलेले आर्थिक निर्बंध हटवण्यावर तसेच संचालक मंडळाने सादर केलेल्या राजीनाम्यावर अद्यापपर्यंत योग्य निर्णय होत नसल्याने बिकट अवस्थेत सध्या ही बहुराज्य दर्जा असलेली बँक मार्गक्रमण करत आहे.

म्हापसा : म्हापसा अर्बन बँकेवर लागू केलेले आर्थिक निर्बंध हटवण्यावर तसेच संचालक मंडळाने सादर केलेल्या राजीनाम्यावर अद्यापपर्यंत योग्य निर्णय होत नसल्याने बिकट अवस्थेत सध्या ही बहुराज्य दर्जा असलेली बँक मार्गक्रमण करीत आहे. निर्णय होत नसल्याने बँकेच्या तसेच बँकेचा एनपीए (अनुउत्पादक मालमत्ता) वाढत असल्याने भागधारक तसेच ठेवीधारकांची चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. 

म्हापसा शहरातील प्रमुख व्यापारी तसेच उद्योजकांनी म्हापसा अर्बन बँकेची स्थापना १९६६ साली केली. उत्तर गोव्यातील पहिली सहकारी बँक स्थापन करण्याचा मान त्यांना लाभला. स्थापनेनंतर बँकेचे कामकाज वाढत गेले. त्यामुळे जानेवारी १९९८ साली बँकेला शेड्युल्ड बँकेचा दर्जा रिझर्व्ह बँकेने दिला तर तसेच त्याच साली बहुराज्य सहकार बँकेचा दर्जा प्राप्त झाला. एकूण २४ शाखा असलेल्या या बँकेला त्यानंतर खºया अर्थाने परिणाम व्हायला सुरुवात झाले. वितरीत केलेल्या कर्जाची वसुली थकल्याने आर्थिक स्थिती खालवत गेली. सरकारने त्यात हस्तक्षेप करुन बँकेवर २००२ साली प्रशासकाची सुमारे तीन वर्षांच्या कालावधीसाठी नेमणूक केली. त्यानंतर निवडणुकी होवून काही काळ बँकेचे व्यवहार मार्गी लागले. 

मार्गी लागलेल्या व्यवहाराला पुन्हा घरघर लागल्यानंतर रिझर्व्ह बँकेने त्यात हस्तक्षेप करुन जुलै २०१५ साली आर्थिक निर्बंध लागू केले. लागू केलेले निर्बंध मागील साडेतीन वर्षांपासून कायम असल्याने बँकेवर त्याचे विपरीत परिणाम होत चालले आहे. बँकेचा एनपीए वाढत चालला आहे. मागील महिन्यात ४ सप्टेंबर रोजी बँकेचे अध्यक्ष गुरुदास नाटेकर यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळाने आपला राजीनामा सादर केला. दिलेला राजीनामा लगेचच स्वीकारला जाणार अशी अपेक्षा होती; पण ती सुद्धा भंग झाली आहे. त्यानंतर २९ सप्टेंबर रोजी बँकेची आमसभा झाली. किमान सभेनंतर तरी राजीनामे स्वीकारले जातील ही सुद्धा अपेक्षा पंधरवडा होत आला असला तरी ती फोल ठरली आहे. 

सभेनंतर बँकेचे सरव्यवस्थापन शैलेश सावंत यांनी रिझर्व्ह बँकेला पत्र पाठवून राजीनाम्यावर योग्य तो निर्णय घेण्याची मागणी केली होती; पण त्या मागणीचे सुद्धा काहीच करण्यात आले नाही. त्यामुळे भागधारक तसेच ठेवीधारकाच्या चिंतेत भर पडत चालली आहे. परिस्थिती अशीच कायम राहिल्यास वाढणा-या एनपीए मुळे भविष्यात गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागणार असल्याचे त्यांना वाटू लागले आहे. 

यावर लवकरात लवकर तोडगा यावा यासाठी काही भागधारकांनी बँकेला पत्र पाठवण्याची तयारी सुरु केली आहे. एक तर निर्बंध शिथील करावे किंवा ते हटवण्यात यावे नपेक्षा संचालक मंडळाचा राजीनामा स्वीकारून बँकेवर प्रशासकाची नेमणूक करुन बँकेला पुन्हा रुळावर येण्यासाठी पावले उचलण्याची विनंती त्यातून करण्यात येणार आहे. 

टॅग्स :goaगोवाbankबँक