शहरं
Join us  
Trending Stories
1
२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा
2
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली?
3
'मोदीज मिशन' पुस्तकातील काही भाग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा; एकनाथ शिंदेंची मागणी
4
Anil Deshmukh: "पोलिसांचे धाडस कसे झाले?" महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर अनिल देशमुख यांची संतप्त प्रतिक्रिया
5
जम्मू-काश्मीर राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर; नॅशनल कॉन्फरन्स 3, तर भाजपचा 1 जागेवर विजय
6
Women’s World Cup 2025: ज्या पावसाने खाते उघडले, त्याने शेवटी वाटही लावली; पाकची विजयाची पाटी कोरीच!
7
चीनचं धक्कादायक कारस्थान उघड, पँगाँग सरोवराजवळ उभारतोय एअर डिफेन्स कॉम्प्लेक्स
8
मोबाईल चार्जरमध्ये लपवलं १५० ग्रॅम सोनं, तेच ठरलं जीवघेणे; युवकाच्या हत्येचा अखेर उलगडा
9
लालबागमधील हल्लेखोर प्रियकरापाठोपाठ ‘त्या’ मुलीचाही मृत्यू, किरकोळ कारणातून गेले दोन जीव  
10
सोन्या-चांदीचे दर कोसळले! सोनं 2,000, तर चांदी 4,000 रुपये स्वस्त; कारण काय..?
11
Maruti CNG Cars: पेट्रोलच्या वाढत्या किमतींनी हैराण झालात? मारुतीच्या 'या' ५ सीएनजी कार वाचवतील तुमचे पैसे!
12
"कोणत्याही देशाच्या दबावाखाली व्यापार करार करणार नाही", पीयूष गोयल यांचे अमेरिकेला खडेबोल
13
IND vs AUS: कोहलीनं फॉर्म परत मिळवण्यासाठी काय करावं? मोहम्मद कैफचा मोलाचा सल्ला! म्हणाला...
14
दहावी पास झालेल्यांसाठी सरकारी नोकरीची संधी! ३९१ कॉन्स्टेबल जीडी पदांची भरती निघाली
15
‘मोबाईल सर्व्हेलन्स’च्या मुद्द्यावरून बावनकुळेंची सारवासारव, व्हॉट्सअप ग्रुप्सबाबत बोलल्याचा दावा
16
१ लाख व्हॉट्सअप ग्रुप, भाजपाची 'वॉर रूम'; कशी चालते यंत्रणा? बावनकुळेंनी सगळेच सांगितले
17
डॉक्टर अवघड शस्त्रक्रिया करत होते. ती ऑपरेशन टेबलवर सनई वाजवत होती, व्हिडीओ व्हायरल
18
"मला न्याय हवाय, पती-मुलाला लोखंडी रॉडने मारहाण..."; भाजपा महिला नेत्याचा रस्त्यावर ठिय्या
19
'All is not well with the UN', संयुक्त राष्ट्र संघाबाबत जयशंकर यांचे मोठे वक्तव्य...
20
Crocodile Torture: वसाहतीत घुसलेल्या मगरीसोबत तरुणांचं अमानुष कृत्य, आरोपींचा शोध सुरू!

आजचा अग्रलेख: दलाल, भिकाऱ्यांची धास्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 08:36 IST

उत्तर गोव्याची किनारपट्टी हा कायम वादाचा विषय असतो.

उत्तर गोव्याची किनारपट्टी हा कायम वादाचा विषय असतो. तसाच तो सरकारी यंत्रणांच्या हितसंबंधांचाही विषय असतो. सध्या पर्यटनमंत्री रोहन खंवटे, कळंगुटचे भाजप आमदार मायकल लोबो आणि पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांची विधाने कुणीही ऐकली, तर कोणती यादवी सुरू आहे ते कळून येते. एकमेकांकडे बोट दाखविणे सुरू आहे. उत्तरेच्या किनारी भागात दलाल आणि भिकाऱ्यांचा उपद्रव वाढलाय, असे मायकल लोबो आणि मंत्री खंवटे हे दोन्ही नेते जाहीर करतात; पण सरकारी यंत्रणांकडून कारवाई होत नाही असे लोकांना वाटते. पोलिसांनी कारवाई करायला हवी असे पर्यटनमंत्री खंवटे सुचवतात, तर केवळ पोलिसांना दोष न देता पर्यटन खातेदेखील कारवाई करू शकते असे उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक स्पष्ट करतात. हा सगळा खेळ, दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप जर पाहिले तर एकूणच सरकार काय करते असा प्रश्न कुणालाही पडेल.

खंवटे व लोबो हे दोन्ही नेते भाजपमध्येच आहेत. मात्र, दोघांमध्येही सुप्त संघर्ष सुरू आहे. त्यात पुन्हा पोलिसांचे सँडवीच होत आहे, असे जाणवते. कळंगुट पोलिसांकडे खंवटे बोट दाखवतात. मायकल लोबो मात्र केवळ पोलिसांना दोष देण्यात अर्थ नाही अशी भूमिका घेतात. लोबो यांचा कळंगुट पोलिसांशी व्यवस्थित सूर जुळला आहे. शेवटी पोलिसांनाही मर्यादा असतात हे मान्य करावे लागेल. सरकारी यंत्रणांनी एकत्रितपणे दलालांविरुद्ध लढा देण्याची गरज आहे. कारवाई मोहीम सुरू होण्यासाठी पर्यटन खाते व पोलिस यंत्रणा यांनी संयुक्तपणे सक्रिय होण्याची गरज आहे. काल खंवटे यांनी पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन व पर्यटन खात्याचे संचालक यांची बैठक घेऊन काही सूचना केल्या आहेत.

कळंगुट कांदोळी- बागा-सिकेरी ही किनारपट्टी म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीला सोन्याची अंडी देणारी कोंबडी असे वाटते. त्यामुळेच दलालांचा सुळसुळाट व उपद्रव वाढला आहे. मध्यंतरी तर काही खंडणीखोरही उभे झाले होते. सरकारच्या वरच्या पातळीवरील काहीजणांचा या खंडणीखोरांशी परिचय होता. मायकल लोबो यांनी व काही रेस्टॉरंट व्यावसायिकांनी आवाज उठविणे सुरू केल्यानंतर मीडियामधून पोलखोल झाली. त्यामुळे सरकारही बिथरले व खंडणीखोर माघारी वळले. त्या खंडणीखोरांना कुणी पुढे काढले होते हे लपून राहिले नाही. आता दलालीचे आरोप, भिकाऱ्यांच्या उपद्रवाचे आरोप सुरू झाले आहेत. लोबो यांच्याकडे बरीच माहिती असते. त्यांनी ती पोलिसांना द्यावी व पोलिसांनी व्यापक कारवाई मोहीम सुरू करावी. मध्यंतरी खंडणी प्रकरणी पोलिसांनी अगदी चपळाईने काहीजणांना क्लीन चिट दिली होती. आता दलालांना क्लीन चिट न देता पोलिसांनी कारवाई सुरू केली तर बरे होईल.

कळंगुटमध्ये सायंकाळी सातनंतर फिरणेही महिलांना असुरक्षित वाटते, असे पर्यटनमंत्री खंवटे यांनी म्हटल्याचे काल प्रसिद्ध झाले आहे. सरकारमधील आमदार, मंत्रीच जेव्हा हताशपणे बोलू लागतात, तेव्हा एकूण सरकारच दलालांचा बिमोड करण्याविषयी नाकाम ठरतेय की काय, असा प्रश्न सामान्य माणसाला पडूच शकतो. ८०-९० च्या दशकात मुंबईवर अंडरवर्ल्डचे राज्य चालायचे, पोलिस दलातीलही काहीजण आतून फितूर असायचे. राजकीय व्यवस्थेमधील काही छुपे रुस्तम अंडरवर्ल्डशी निगडित घटकांना पाठीशी घालू पाहत होते. मात्र, मुंबई पोलिसांनीच शेवटी अंडरवर्ल्डचा खात्मा केला. काहीजण विदेशात पळून गेले. पोलिस कडक राहिल्याने मुंबईत टोळीयुद्धेही जवळजवळ थांबली. गोवा पोलिसांना किनारी भागात अधिक आक्रमक होत दलालांचा बिमोड करून सुरक्षित वातावरण निर्मिती करावी लागेल. यासाठी खंवटे व लोबो या दोन्ही नेत्यांचे पोलिसांना सहकार्य लागेल. किनारी भाग सुरक्षित राहिला तरच पर्यटन वाढेल. 

पर्यटकांनी गोव्याकडे पाठ फिरवू नये म्हणून दलाल व भिकाऱ्यांना रोखावे लागेल. लोबो यांच्या म्हणण्याप्रमाणे खरोखर तीनशे भिकारी कळंगुटसह उत्तरेच्या किनारी भागात फिरत असतील तर ते किळसवाणेच म्हणावे लागेल. किनाऱ्यांवर तसेच रेस्टॉरंट परिसरात फिरणाऱ्या पर्यटकांना भिकाऱ्यांचा उपद्रव होऊ लागला तर गोव्याच्या पर्यटनाचा सर्वांनाच उबग येईल. कळंगुट पंचायत काही महिन्यांपूर्वी डान्स बारविरुद्ध बोलायची. कारवाईची भाषा करायची. आता त्याबाबत कुणी बोलत नाही. आता दलाल सोकावले असतील तर ते सरकारचेही अपयश ठरते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :goaगोवाtourismपर्यटन